Home Blog Page 3013

विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा- उषा टिळेकर

0
पुणे : “विद्यार्थ्यांतील कला-गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम होत असतात. त्याचा फायदा करून घेत विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अनेक संधी आहेत,” असे प्रतिपादन सासवड येथील गुरुकुल अकॅडमीच्या संचालिका उषा टिळेकर यांनी केले.
केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात ‘ग्रॅव्हिटी २०१९’ या राज्यस्तरीय परिसंवाद आणि विज्ञान संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उषा टिळेकर बोलत होत्या. याप्रसंगी अभियांत्रिकी तज्ज्ञ श्रीरंग घडियालजी, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, सौ. सुनंदा जाधव, संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय  संचालिका हर्षदा जाधव, संचालिका विभावरी जाधव, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, यंत्र अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख डॉ. बी. एम. शिंदे, समन्वयिका प्रा. प्रतिभा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीरंग घडियालजी म्हणाले, “उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी संशोधन व प्रकल्पांवर आधारित कौशल्य आत्मसात करण्यावर लक्ष द्यावे. आपल्या संशोधनाचे पेटंट करावे. समाजातील समस्या सोडविणारे आपले संशोधन असले पाहिजे.”
‘ग्रॅव्हिटी’ महोत्सवात अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, स्थापत्यकला, व्यवसाय शिक्षण या शाखेच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी २७ वेगवेगळ्या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या महोत्सवात पाचशे पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्स सहभागी झाले. राज्यभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याण जाधव, डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुनगंटीवार आणि लोढा यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार

0

मुंबई-मुंबई. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून जगातली सर्वात मोठी सरदार पटेल यांची मूर्ती बनवून पद्मभूषण राम सुतार यांनी जगातील भारताचा गौरव वाढवला आहे. सुतार हे ‘भारताचे कोहिनूर’ आहेत आणि आपल्याला सर्वांना त्यांचा जाहीर सत्कार करण्याची संधी मिळाली ही गर्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे वित्त आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असे वक्तव्य विश्व प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण सुतार यांचा सन्मान करताना केले. सुतार यांचा मुंबईच्या ५० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुनगंटीवार आणि भाजपचे वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुतार यांना सरस्वती देवीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसिद्ध पुस्तक ‘परमवीर’च्या लेखिका श्रीमती मंजू लोढा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

मकर संक्रातीच्या मुहूर्तावर हा सत्कार समारंभ ‘लोढा वर्ल्ड टॉवर’मध्ये आयोजित करण्यात आला होता. जगातील सर्वात मोठी मूर्ती निर्माण करणाऱ्या राम सुतार यांचा सत्कार ‘वर्ल्ड टॉवर’ बिल्डींगमध्ये होत आहे, ही एक अद्भुत गोष्ट असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. आपल्या सत्कार प्रसंगी पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांनी सरदार पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती आणि आपल्या सर्व रचनांचं श्रेय भारतीय संस्कृती आणि परंपरेला दिलं. या समारंभात आमदार लोढा म्हणाले की, जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार हे सरळ, सामान्य असूनही महान आणि उच्च व्यक्तिमत्वाचे धनी आहेत, यांचा सत्कार आमच्या सर्वांच्या हातून होत आहे. ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

या कार्यक्रमात ५०हून अधिक देशातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे चेअरमन केवल हांडा आणि राजेंद्र जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. लोढा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली डॉ. द्वारकानाथ कोटणीस रिसर्च ब्यूरो आणि लाडले इन्फो यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कला-संस्कृती समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले-आमदार भाई जगताप

0

पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या  साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले . दलित पँथरच्यावतीने  पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉल मध्ये पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती अभिवादन सभेत ते बोलत होते . या अभिवादन सभेस दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे , नगरसेविका लता राजगुरु , दादासाहेब सोनवणे ,  सुरेश केदारे , बाळासाहेब पडवळ , अमित जावळे , भीमराव जाधव , सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

आमदार भाई जगताप यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी शोषित पिढीत व कामगार चळवळीसाठी मोठा सामाजिक लढा दिला . त्यांनी पँथर्सचा दरारा निर्माण केला होता . त्या माध्यमातून त्यांनी दलित , कामगार चळवळीला न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्यांची कार्याची महती या समाजात टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचे आंबवडे येथील स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , दलित पँथरची स्थापन नामदेव ढसाळ यांनी संघर्षातून झाली आहे . देशातल्या गोरगरीब , कष्टकरी जनता व दलित बांधवाना न्याय देण्याचे काम नामदेव ढसाळ यांनीदलित पँथरच्या चळवळीतून केले . समाजातील तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला . त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा पँथर्सच्या भूमिकेतून काम करू लागला . त्यातुन समाजाला न्याय मिळवून देऊ लागला .

यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले . परंतु आताचे राज्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायला निघाले आहेत , परंतु दलित पँथर हे कदापिही होऊ देणार नाही . दलित पँथर समाजातील लोकांना त्यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतच राहिल.

या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व अभिवादन सभेचे प्रास्ताविक  दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम  यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार दलित पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी मानले . 

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल

0
मुंबई :राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर  स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचे शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडीओ उपलब्ध असणार आहेत. तसेच या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.
या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल,असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेसी, ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, मराविम सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संकटांना सामोरे जाणे यातच खरे शौर्य – मधुसूदन सुर्वे

0

‘यशस्वी’ संस्थेच्या शौर्य चक्र विजेत्यांशी थेट संवाद*

 पुणे : संकटांना घाबरून न जाता धैर्याने त्याला सुमारे जाणे यातच खरे शौर्य असते, असे मत शौर्य चक्र विजेते  मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  ‘वुई सॅल्यूट रिअल हिरोज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना   ते  बोलत  होते. यावेळी बोलताना  ते म्हणाले कि, सीमेवर  देशरक्षणासाठी लढत असताना शत्रूच्या  रूपात स्वतःचा मृत्यू समोर असताना देखील  भारतीय सैनिक आपल्या कर्तव्यापासून तसूभरसुद्धा ढळत नाही, उलट त्या क्षणी त्याच्यात जास्त प्रमाणात बळ संचारते आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊनही आपले देश रक्षणाचे कार्य सैनिक करत असतो,विद्यार्थी मित्रांनो अगदी त्याचप्रमाणे शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही आपल्या नोकरी व्यवसायात एखाद्या संकटाला सामोरे जाल तेव्हा तुमचा सामोर भारतीय सैन्याचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शौर्य दाखवा, शुरपणा अंगी बाणवा तरच तुम्ही तुमच्यातील उत्तम जगाला देऊ शकाल. यावेळी त्यांनी मणिपूर येथील ऑपरेशन इफाजत च्या वेळेस आंतकवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या प्रसंगाची आठवण सांगत आपल्या लष्करी जीवनातील विविध रोमहर्षक अनुभव सांगितले. त्यांचे हे अनुभव ऐकून विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले.    यावेळी यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ  मॅनेजमेंट  सायन्सचे   संचालक डॉ.मिलिंद मराठे, ‘यशस्वी’संस्थेचेअधिष्ठाताडॉ.राजेंद्र  सबनीस,   राष्ट्रीय सैनिक प्रांताध्यक्ष प्रताप भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स यांच्यातर्फे सायट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर

0

सायट्रॉनच्या विकास व्यवस्थापनात व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स संयुक्तरीत्या सहभागी; सदनिकांसाठी नावनोंदणी 18 जानेवारीपासून सुरू; दोन टॉवर्समध्ये मिळून 1 2 बीएचकेच्या 258 सदनिका;470 चौरस फूट व 656 चौरस फुटांची वापरता येण्याजोगी जागा; सर्वसमावेशक किंमत – 1 बीएचकेः 30.5 लाख रु. आणि 2 बीएचकेः 42.30 लाख रु.

 पुणे: व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (बीएसइ स्क्रिप VASCONEQ) आणि मनीषा कन्स्ट्रक्शन्स या पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन नामवंत व विश्वासार्ह कंपन्यांनी वाघोली येथे होणाऱ्या त्यांच्या सायट्रॉन या गृहप्रकल्पाची घोषणा आज येथे केली. व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स या दोन्ही कंपन्या सायट्रॉनच्या विकास व्यवस्थापनात संयुक्तरित्या सहभागी असणार असून त्यातील सदनिकांच्या नावनोंदणीचे कामकाज येत्या 18 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. सायट्रॉनच्या फेज-2’मध्ये दोन टॉवर्समध्ये मिळून 258 सदनिका असतील. बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या 1 2 बीएचके स्वरुपाच्या या सदनिकांमधील वापरता येण्याजोगे क्षेत्रफळ अनुक्रमे 470 चौरस फूट व 656 चौरस फूट असणार आहे. 1 बीएचके सदनिकेची सर्व कर व शुल्कांसहीत किंमत 30.5 लाख आणि 2 बीएचके सदनिकेची किंमत 42.30 लाख रुपये असेल. वातानुकूलित क्लब हाऊस, अत्याधुनिक जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची जागा, पार्टी लॉन, स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि बहुउद्देशीय हॉल अशा काही उत्तमोत्तम सुविधा या प्रकल्पात उपलब्ध असतील.

 नव्या प्रकल्पाविषयी माहिती देताना मनीषा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक अभिषेक खिंवसरा म्हणाले, ‘’पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन्स हे नाव गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दबदबा राखून आहे. पुण्यात आमच्या कंपनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे केली आहेत. व्हॅस्कॉन इंजिनिअर्सशी आमचा सहयोग हाही पूर्वीपासूनचा आहे. सायट्रॉन प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि ग्राहकांना उत्कृष्ट सदनिका देण्यास कटिबद्ध आहोत.’’

 व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘’सायट्रॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. यापूर्वी सायट्रॉनच्या पहिल्या फेजला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आमचा हुरूप वाढून आम्ही दुसऱ्या फेजची निर्मिती करीत आहोत. गेली तीन दशके आमच्यासमवेत असणाऱ्या ग्राहकांचे आम्ही आभार मानतो. यापुढेही त्यांच्या पैशाचा मोबदला पुरेपूर देण्यासाठी आम्ही आमच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये प्रस्थापित निकष राबवून त्यांना संपूर्ण समाधान देऊ.’’सायट्रॉन हा गृहनिर्माण प्रकल्प पाच एकर जागेत सामावला आहे. तीन फेजमध्ये तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या फेजचे काम पूर्ण होऊन 2017 मध्ये तो ग्राहकांना वितरीत करण्यात आला. दुसऱ्या फेजचे काम 18 जानेवारी 2019 रोजी सुरू होईल. तिसऱ्या फेजचे काम काही काळाने हाती घेण्यात येईल.

वाघोली हा भाग पुणे-नगर महामार्गावर असून खराडी आयटी हबपासून जवळ आहे. या ठिकाणी रिअल इस्टेट, मूलभूत सोयी-सुविधा आणि शैक्षणिक संस्था यांचा जलद विकास झालेला आहे. एकेकाळी हा भाग औद्योगिक स्वरुपाचा होता, मात्र आता गुंतवणूकदार व ग्राहक या दोघांच्या प्रतिसादांमुळे येथे निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहे. वाघोली हा भाग नगर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असून येथून विमानतळ, पुणे रेल्वे स्थानक, सोलापूर महामार्ग आणि शिक्रापूर-चाकण रस्ता येथे सहजरित्या जाता येते. परवडणारे दर, सामाजिक सोयी-सुविधा आणि आयटी उद्योगांची नजीकता या वैशिष्टयांमुळे वाघोली परिसरात विकसक, गुंतवणूकदार व घर खरेदी करणारे ग्राहक यांचा नेहमीच राबता असतो.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.विषयी:व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये व्हॅस्कॉनचा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही इपीसीच्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे इपीसीपध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे व्हॅस्कॉनने ठरविले आहे.

 

मनीषा कस्ट्रक्शन्सविषयी:

मनीषा कन्स्ट्रक्शन्सचे नाव ग्राहकांमध्ये दर्जेदार बांधकाम आणि विश्वासार्हता यांमुळे प्रस्थापित झाले आहे. पूर्ण बांधिलकी, ग्राहक केंद्रित धोरण, नावीन्यपूर्ण कल्पना आणि व्यावसायिक कौशल्याद्वारे अनेक वर्षांपासून ही कंपनी ग्राहकांना सेवा देत आहे. गेल्या काही दशकांमध्ये  मनीषा कन्स्ट्रक्शन्सने अनेक महत्त्वाचे टप्पे ओलांडले, अनेक ठिकाणी यश मिळविले आणि शेकडो ग्राहकांना समाधान दिले आहे. स्थावर मालमत्ता, मॉल आणि मल्टीप्लेक्स, आतिथ्य आणि आयटी आणि व्यावसायिक क्षेत्रांत या कंपनीचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. लोकांच्या जीवनशैलीला अनुसरून योग्य ते बदल घडविण्याची या कंपनीची मानसिकता आहे. त्यामुळेच हा उद्योगसमूह उच्च  जीवनशैलीच्या सध्याच्या युगामध्ये अग्रभागी आहे.

५५ विद्यार्थ्यांनी केले ; रंगतदार तबलावादन…

0

पुणे-भारतीय शास्त्रीय संगीतात तालाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. नुकतीच दि १३-१-१९ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात व्यास मंदिर ,सदाशिव पेठ इथे जेष्ठ तबलावादक तालभूषण पं नचिकेत मेहेंदळे यांच्या ‘मधुमती संगीत विद्यालया’ तर्फे तबलावादन मैफल सादर झाली.

प्रथम कार्यक्रमाची सुरुवात निवेदिता मेहेंदळे यांनी रचलेल्या ‘देवी शारदे’ या सरस्वतीस्तवनाने झाली .तन्मयी मेहेंदळे हिने गाऊन  केली.यावेळी तन्मयी यांना तबला सांगत नचिकेत मेहेंदळे यांची लाभली .तसेच यावेळी  १६ मात्रांच्या तीनतालात सिद्धी कराडकर ,विश्वक्सेन होसूर ,सौमित्र देवधर ,अमेय मराठे ,अथर्व जोशी,ओंकार जोशी यांसह एकूण ३३ विद्यार्थ्यांनी ४ गटात सामुहिक वादन केले या मध्ये कायदे ,रेले ,परण ,चक्रधार, मुखडे तुकडे यांचे दमदार सादरीकरण झाले.या वेळी संपतलाल गादिया यांच्या तर्फे पं. नचिकेत मेहेंदळे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार सुनीत भावे यांचाही सत्कार करण्यात आला.

त्यानंतर ताल झपताल मध्ये मानस भावे ,कैवल्य देशपांडे ,रिषभ खळदकर ,कुणाल निरगुडकर ,पंचम परदेशी ,सोहम जोशी यांनी सामुहिक वादन करून रसिकांना जागीच खीळवले.त्यानंतर रमेश मंगळूरकर यांनी तीनतालात स्वतंत्र तबलावादन केले.त्याला जोडून तन्मयी मेहेंदळे हिने निघालो घेऊन दत्ताची पालखी हा अभंग सादर केला .त्यानंतर तीनतालात अतिशय अभ्यासपूर्ण वादन सिद्धेश साठे आणि ओंकार देवकुळे यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.

त्यानंतर वाजवण्यास अतिशय अवघड असा १५ मात्रांच्या पंचम सवारी तालात मेहुल गादिया आणि निखील बोऱ्हाडे यांनी वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर हेमंत गोडबोले आणि हृषीकेश खाडे यांनी तीनतालात वादन सादर केले.त्यात रेलेत तुकडे मुखडे परण पेशकार सादर केले.सर्व विदयार्थ्यांना लेहेर्याची साथसांगत हार्मोनियमवर पं प्रमोद मराठे यांचे शिष्य , देवेंद्र देशपांडे यांनी केली.या मैफलीचे सूत्रसंचालन तन्मयी मेहेंदळे यांनी केले.या मैफलीस सुनीत भावे, जेष्ठ उद्योजक संपतलाल गादिया,जेष्ठ तबला वादक पं.विजय दास्ताने यांची विशेष उपस्थिती लाभली .मैफलीची सांगता पसायदानाने झाली.

लायन्स व्याख्यानमालेचे रविवारी विजय कुवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
डॉ. नरेंद्र जाधव, स्वामी ज्ञानवत्सल गुंफणार पहिले पुष्प
पुणे : दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स डिस्ट्रिक्ट 3234 डी 2, लायन्स इनोव्हेशन फोरम, आकुर्डी येथील सूर्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ’देणे लायनीझमचे-लेणे व्याख्यानमालेचे’ या लायन्स व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या पुष्पाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा रविवार, दि. 20 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. व्याख्यानमालेच्या या पहिल्या पुष्पात केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. नरेंद्र जाधव व अहमदाबाद येथील अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे परमपूज्य स्वामी ज्ञानवत्सल यांचे व्याख्यान होणार आहे.
डॉ. जाधव ’भारतीय अर्थव्यवस्था : आजची व उद्याची’ यावर, तर स्वामी ज्ञानवत्सल ’सुखाची परिभाषा आणि जीवनाची श्रीमंती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन्स रमेश शहा यांनी यावर्षी ’मिशन इनोव्हेशन’ या घोषणेद्वारे समाजहितासाठी अनेक नाविन्यपूर्ण सेवाप्रकल्प सादर केले असून, त्याला समाजाच्या सर्वच स्तरातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ’लायन्स व्याख्यानमाला’ हा त्यातीलच एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. यापुढे प्रत्येक वर्षी ही लायन्स व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा, जितो पुणे व विश्वकर्मा विद्यापीठ या संस्था या उपक्रमासाठी सहयोगी आहेत. शारदोत्सवाचा उपक्रम असणारी ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली असणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक लायन प्रकाश नारके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन रमेश शहा, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन दिलीप निकम, लायन शाम खंडेलवाल उपस्थित होते.

‘ सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान ‘ विषयावरील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

0
‘ महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार ‘ 
पुणे :इनो सोलर एनर्जी प्रा.लि. आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित ‘सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान ‘ या विषयावरील चर्चासत्राला सोमवारी, दि. १४ जानेवारी रोजी चांगला प्रतिसाद मिळाला.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज च्या सुमंत मुळगावकर सभागृहात हे चर्चासत्र झाले.
स्टिफन थिएरफेल्डर ( मुख्य कार्यकारी अधिकारी,रेफूसोल, जर्मनी ),हरप्रीत सिंग धीर ( रेफूसोल, साऊथ एशिया बिझनेस हेड ), महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष संजय कुलकर्णी ,उपाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी ,उन्मेश जगताप (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) उपस्थित होते.अश्वीनी जगताप यांनी स्वागत केले .
इनो सोलर एनर्जी प्रा.लि. प्रामुख्याने ऐनर्जी सेव्हिंग आणी सोलर एनर्जी मध्ये कार्यरत आहे व रेफुसोल, जर्मनी बरोबर त्यांनी सेल्स आणी सर्व्हीसचा करार केला आहे. कंपनी पुण्यामध्ये अद्ययावत सर्व्हीस व टेस्ट सेंटर आस्थापीत करणार आहे, अशी माहिती उन्मेश जगताप,  (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) यांनी दिली.
स्टिफन थिएरफेल्डर ( मुख्य कार्यकारी अधिकारी,रेफूसोल, जर्मनी ) यांनी ‘ रेफूसोल ‘ अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाने तयार झालेल्या इन्व्हर्टरची माहिती दिली . ते म्हणाले , ‘भारताला सौरऊर्जेचे वरदान असून गुणवत्तापूर्ण जर्मन इन्व्हर्टर वापरले तर या सौरऊर्जेचा परिणामकारक वापर भारतीयांचे जीवन बदलून टाकेल ‘
हरप्रीत सिंग धीर ( रेफूसोल, साऊथ एशिया बिझनेस हेड ) म्हणाले ,’सौरऊर्जेच्या दूरगामी वापरासाठी गुणवत्तेची हमी देणारी उत्पादने वापरणे हितकारक असते . त्यात तडजोड केली की नंतर ग्राहकालाच त्रास होतो . ‘
संजय कुलकर्णी म्हणाले ,’सौरऊर्जेचे महत्व महाराष्ट्राला पटले असून आगामी काळात महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार आहे . सौर ऊर्जेचे महत्व आणि किफायतशीरपणा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे . ‘ या चर्चसत्राला सौर ऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

एम . सी . इ . सोसायटीमधील ‘ जॉब फेअर ‘ ला मोठा प्रतिसाद

0
पुणे :
असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘ आयोजित ‘मेगा जॉब फेअर ‘ ला चांगला प्रतिसाद मिळाला .
 एम . सी . इ . सोसायटी (पुणे कॅम्प ) येथे हा उपक्रम पार पडला . ६० कार्पोरेट कंपन्या यात सहभागी झाल्या . ११०० युवक -युवतींनी नोंदणी केली ,मुलाखतीनंतर १६० जणांना ऑफर लेटर देण्यात आले . तर ६०० जणांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवडण्यात आले .
एम . सी . इ . सोसायटी  च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी उद्घाटन केले . दक्खन मोमीन जमात ‘ या संघटनेने संयोजनात सहकार्य केले .   ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘  चे संचालक डॉ . आर . गणेसन यांनी स्वागत केले .असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्सचे  इफ्तिकार शेख ,रज्जाक शेख उपस्थित होते .

शिवसेनेचे साखर संकुलसमोर ‘रसवंती आंदोलन’

0
पुणे:- बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज दिनांक 15 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासून  माजलगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी रसवंती आंदोलन सुरु केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना 15 दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज दिनांक 15 जानेवारी मंगळवार पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावचे शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे, रमेश सर, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदीसह शिवसैनिक शेकडो शेतकऱ्यांनी ‘रसवंती आंदोलन’ आजपासून सुरु केले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा तालुकाप्रमुख जाधव यांनी साखर आयुक्तांना दिला आहे.

पालिका आयुक्तांच्या चारचाकी गाडीला ट्रिपल सीटचा दंड-कारभार पुण्याच्या पोलिसांचा

0

पुणे-पुणे पोलीस हल्ली ‘वाटमारी ‘ वरून प्रचंड बदनाम होत आहेत . पुणे पोलिसांची कधी झाली नव्हती एवढी बदनामी आता वाहनचालकांकडून दंड वसुलीच्या कारभारामुळे होते आहे.त्यात पोलिसांचा आणखी एक अजब कारभाराची भर पडली आहे . पोलिसांनी  चक्क चारचाकी गाडीला ट्रिपल सीटची पावती फाडली आहे. हा सर्व प्रकार निगडी मधील सूरज स्वीट येथे घडला असून ही चारचाकी गाडी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या एम. एच-१४ सी.एल १५९९ चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीटचा दंड ठोठावला आहे. यासाठी त्यांना २०० रुपडे दंड आकारण्यात आला. परंतु चारचाकी गाडीला ट्रिपल सीट दंड कसा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही एक अक्षम्य चूक असून वाहतूक पोलिसांनी ती मान्य केली.महानगर पालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच-१४ सी.एल १५९९ हा असून सारखाच नंबर एका दुचाकीचा आहे. वाहतूक पोलिसांना सीरियल क्रमांकात डी.एल च्या जागी चुकून सी.एल लिहिले होते. त्यामुळेच आयुक्तांच्या गाडीला पावती फाडली गेली. हा सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिली असून ती चूक दुरुस्त करून घेतली जाईल असं सांगितलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

0
जुन्नर /आनंद कांबळे 
   जुन्नर तालुक्यातील   वारूळवाडी ते गुंजाळवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केले नाहीत ते लवकरात लवकर बुजवावेत यासाठी वरूळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून गर्दी करून सार्वजनिक रस्त्यामध्ये ठाण मांडून लोकांना जाण्या येण्याचा रस्ता अडवून लोकांची गैरसोय केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या सह५० ते ६० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके गुंजाळवाडीचे उपसरपंच श्रीकांत वायकर,तालुका युवक अध्यक्ष सुरज वाजगे ,
तानाजी वारुळे,वरूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य भाऊ वारुळे, विपुल फुलसुंदर, वरून भुजबळ, पप्पु नायकोडी,राहुल गावडे,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे५० ते ६० कार्यकर्ते यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम३४१ ,१४३,१४७,मपोकाक१३५,सह क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ नुसार दि.१३रोजी सायं गुन्हा दाखल केला आहे याबाबत पो. शिपाई रमेश इचके यांनी फिर्याद दिली आहे.
   याबाबत जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी म्हटले की, रस्ताच्या दुरावस्थेमुळे गुंजाळवाडी येथील दोन जण अपघात होऊन जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत या घटने मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यात आंदोलनाबाबतचे रितसर पत्र देण्यात आले आहे. आंदोलकांनी कोणतेही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा उद्रेक केलेला नाही. गुन्हे दाखल होण्याच्या बाबत राजकीय दबाव दिसून येत असल्याचे वाजगे यांनी म्हटले.

लहानपणाच्या आठवणी आणि कुटुंबांना जोडणारा एक विशेष फेस्ट पुणे स्ट्रीट फेस्ट

0
पुणे– हसते- खेळते लहानपण आणि बालपणच्या आठवणी नेहमीच सर्वांसाठी खास असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. अश्याच बालपणीची आठवणींना उजाळा देत  गंगाधम टॉवर्स येथे माईंड व्हेंचर्स आंतरराष्ट्रीय पुणे स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित केला आहे. हे फेस्टिव्हल यावर्षी गंगाधम चौक, मार्केट यर्ड येथे आयोजित होणार असुन फेस्टिव्हलचे हे तिसरा वर्ष आहे.

या स्ट्रीट फेस्टमध्ये लहान मुलांसाठी बर्याच प्रकारच्या खेळांचे आयोजन केले गेले आहे, ज्यात जिप जॅम अॉन सायकल, पेप्पी जुम्बा बीट्स, हॉपस्कॉचिंग, ड्रम सर्किल, विशाल साप-सीढ़ी, स्व निर्मित अॅडवेंचर, कॅनवास स्प्रे आदिंचा समावेश असेल.

‘पुणे स्ट्रीट फेस्टिवल’ हा लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बनविलेला  एक विशेष स्ट्रीट अनुभव आहे, ज्यात सर्व माता-पिता आपआपल्या मुलांसोबत सहभागी होतील हा अनुभव त्यांच्यासाठी निश्चीतच संस्मरणिय ठरेल. येथे आयोजित पारंपरिक आणि लहानपणीचे खेळ, ड्रम, संगीत, नृत्यकला आणि अॅडवेंचर सारख्या गोष्टी मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास देखील करतात. या वर्षी हा स्ट्रीट फेस्टिव्हल जवळपास १ किलोमीटर वर्गक्षेत्रात असेल, ज्यात गंगाधाम चौक आणि वर्धमान पूरा सोसाइटी देखील आहे. मागिल दोन सत्रांमध्ये  २००० पेक्षाही अधिक लोकांनी या फेस्टमध्ये सहभाग घेतला होता.  रोशन शेट्टी येथे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील.
माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनलचे संस्थापक लकी सुराना द्वारा आयोजित या फेस्टिव्हलला राउंड टेबल इंडिया आणि अर्ली चाइल्डहुड असोसिएशन ने देखील सहयोग दिला आहे. माइंड व्हेंचर्स इंटरनॅशनल ने अधिकारी, प्रशासन, वाहतुक पोलिस आणि विभिन्न स्थानीक लोकांसोबत भागीदारी केली आहे.
कधी: रविवार, २० जानेवारी २०१९
वेळ: सकाळी ७ वाजता सुरू
प्रवेश: सर्वांसाठी विनामूल्य 
9822268298 / 98237 66614

महाराष्ट्र सायबर व ‘ॲम्बिस’प्रणालीस हरियाणा शासनाचा राष्ट्रीय डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी पुरस्कार

0

मुंबई : हरियाणा शासनातर्फे गुरुग्राम हरियाणा येथे झालेल्या ‘डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘स्मार्ट पोलिसिंग एनिशिएटीव्ह’ या गटात महाराष्ट्र शासनाच्या ‘ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) या प्रणालीस आणि महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास व प्रशिक्षणातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोन पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

गुडगाव (हरियाणा) येथे आज झालेल्या परिषदेत महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार महाराष्ट्र सायबर टीमने स्वीकारले.  यावेळी झालेल्या परिसंवादात ‘नाविन्यपूर्ण संकल्पनेतून प्रशासन’ या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सिंह यांनी सहभाग घेत महाराष्ट्र सायबरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित परिसंवादात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग, डाटा सेंटर आणि नवीन तंत्रज्ञान’ या विषयावर श्री. ब्रिजेश सिंह यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरची स्थापना केली आहे. याद्वारे राज्यातील पोलीसांना सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्य केले जाते.  गुन्हेगारांचा संपूर्ण डेटा एका ठिकाणी रहावा, गुन्हेगारांच्या ठशांची माहितीचे डिजिटल संकलन व्हावे, जेणेकरून गुन्ह्यांची उकल जलदगतीने होईल, यासाठी ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे सुमारे साडेसहा लाख बोटांचे ठसे डिजिटल स्वरुपात साठविले आहेत. त्याचबरोबर तळहातांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ व चेहरा यांचे बायोमेट्रिक नोंद ठेवण्यात आली आहे. सीसीटीएनएस, सीसीटीव्ही आदी यंत्रणांबरोबर ही यंत्रणा जोडण्यात  येणार आहे. पोलीस स्टेशन स्तरापर्यंत ‘ॲम्बिस’  प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन  इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘ॲम्बिस’   प्रणालीस व महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र सायबर चमूतील  पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे ,अविनाश सरवीर, सुरेश मुदगून कार्यालय अधीक्षक प्रविण शिखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, श्रीमती रुपाली गायकवाड, संदीप जाधव, पोलीस हवालदार जालिंदर जगताप, पोलीस शिपाई नवनाथ देवगुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.