Home Blog Page 296

SC ची ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबली:आता शुक्रवारी सुनावणी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम

मुंबई-महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी नियोजित केली. या निर्णयामुळे आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला असून, राज्यातील निवडणुकांवर अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान ठामपणे सांगितले की, अनेक नगरपरिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे आणि निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू असल्याने आणखी वेळ देणे अयोग्य आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पार गेल्यामुळे उमेदवार निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांठिया आयोगापूर्वीच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते आणि त्या काळातील कायदा सर्वोच्च न्यायालयानेच निश्चित केला होता, अशीही आठवण याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला करून दिली. त्यामुळे या टप्प्यावर बदल करणे योग्य नाही आणि वेळ वाढवून घेण्यामागे हेतुपुरस्सर विलंब दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगानेही सुनावणीत बाजू मांडताना सांगितले की, न्यायालयाने जर आज कोणताही निर्णय दिला तर आयोगाला नव्या आरक्षण वर्गवारीनुसार पुढील प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे स्पष्ट निर्देश मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, निवडणुका केवळ न्यायालयाने दिलेल्या अंतिम आदेशानुसारच पार पडतील आणि कोणतीही तातडीची भूमिका आज जाहीर करणे शक्य नाही. अखेर न्यायालयाने सर्वांचे मुद्दे ऐकून सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ठेवली आणि तोपर्यंत सर्व पक्षकारांनी संबंधित माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश दिले. आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे राजकीय वातावरण आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मागील सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यासाठी काही काळ थांबण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी सुनावणीपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही हे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल बॉडीजचे नोटिफिकेशन अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानुसार, निवडणुकीची सध्याची प्रक्रिया आहे तशीच सुरू राहील, पण त्याचे निकाल जाहीर होणार नाहीत. या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही. पण ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यावर मात्र निवडणुकीचे नोटिफिकेशन जाहीर होणार नाही. या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख झाला नाही. पण महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन आले नसल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ असा होतो की, यापुढे जिल्हा परिषदेचे नोटिफिकेशनही निकालापर्यंत जाहीर होणार नाही.

या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीत संताप व्यक्त केला होता. त्यात कोर्ट म्हणाले होते की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटले होते की, बांठिया आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती, त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात. म्हणजेच, ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे. परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली.

या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केले नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, आमचा आदेश अगदी सरळ होता, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो. न्यायमूर्ती जॉयमला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला. राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आज पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे.

सध्या न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक ठरणार आहेत. न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते, बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असते, यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील, हे अवलंबून आहे. सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.

औंध, बोपोडी परिसरातील वाहतूक व्यवस्था दुर्लक्षितअतिरिक्त पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे-औंध रोड, बोपोडी, खडकी स्टेशन परिसरात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. या परिसरातील वाहतुकीचे नियोजन व्यवस्थितपणे केलं जात नाही त्यामुळे भविष्यात हा रस्ता मृत्यूचा सापळा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वतीने आपण वाहतूक सुरळीत करावी व लोकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करणारे पत्र आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांना दिले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे संघटक शेलार उपस्थित होते.मनोज पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करत याबाबत ठोस उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. याच आशयाचे पत्र सोमवारी महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनाही माने यांनी दिले. या पत्राद्वारे त्यांना ही कामे तातडीने हाती घेण्याची विनंती केली.
त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने दिलेल्या सूचना
१. चंद्रमणी नगर ते खडकी स्टेशनपर्यंत नव्याने रस्ता तयार करणे अतिशय आवश्यक आहे.
२. ⁠पाटील कॅाम्प्लेक्सच्या समोर रस्ता ओलांडण्याची सोय आणि बॅरिकेटींग. तसेच दोन्ही बाजूंना स्पीडब्रेकरची व्यवस्था.
३. ⁠गणेश मंदिर येथे तातडीने स्पीडब्रेकरची दोन्ही बाजूंना सोय करणे.
४. ⁠औंधरोड- सांगवी नवीन पुलाला ॲप्रोच रस्ता तयार करणे
५. ⁠खडकी रेल्वेस्टेशन येथील दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल
६. ⁠रेल्वेस्टेशनचे नवीन गेट केवळ शंकर मंदिरासमोर खुले करून तेथेच पार्किंग व्यवस्था करणे. आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या.


मुख्य निवडणूक आयोग’ निवड प्रक्रियेतून, न्यायसंस्थेला वगळणाऱ्यांनी, न्यायसंस्थेच्या अनादराचे आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी वर करणे अतार्किक व हास्यास्पद..!

‘त्रिसदस्य समितीतुन’ मुख्य न्यायाधीशांना का वगळले(?) याचे सत्ताधाऱ्यांनी ऊत्तर द्यावे..!

पुणे :
मुख्य न्यायाधीशांच्या शपथ विधी’ला ऊपस्थित राहू न शकल्याने भाजप नेते ‘विरोधीपक्ष नेते राहुलजी गांधी’ यांचेवर ‘न्यायसंस्था व संविधाना’प्रती अनादर केल्याचा तथ्यहीन व हास्यास्पद आरोप करीत असुन, सत्ताधारी नेते हेच् सर्वप्रथम नैतिक संकेत पाळत, ‘न्यायसंस्थेचा व विरोधीपक्ष नेत्या’चा किती आदर करतात(?) याचे प्रथम आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली.
या पुर्वीच्या ‘मुख्य न्यायमूर्तींच्या शपथविधी समारंभास’ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वेळोवेळी उपस्थित राहिलेले आहेत, या कडेही त्यांनी लक्ष वेधले.
त्यांचे अनुपस्थितीचे समर्थन करत नाही, मात्र काही व्यक्तिगत समस्येमुळे ते उपस्थित राहू शकले नसतील, असे सांगत या अनुपस्थितीचे राजकारण करणाऱ्या ‘सत्ताधारी भाजप नेत्यांना’ काँग्रेस ने फैलावर घेतले.
देशाच्या लोकशाही मार्गाचा पाया असलेल्या ‘मुख्य निवडणूक आयोगाची’ निवड करणाऱ्या, ‘पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते व (न्यायसंस्थेचे प्रतिनिधी नात्याने) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा “त्रिसदस्य निवड समितीतुन” सरन्यायाधीशांना वगळुन, ‘सत्तापक्षाचे पंतप्रधान’ असताना देखील, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहां’ना का घेतले (?) याचे सत्ताधाऱ्यांनी ऊत्तर द्यावे, मगच राहुल’जीं वर टिका करावी..अन्यथा न्यायसंस्थेवर व त्यांच्या अधिकार – निर्णयावर टिका करणाऱ्या व दबाव आणणाऱ्या ‘सत्ताधारी भाजप’ला विरोधी पक्ष नेत्याच्या अनुपस्थिती बद्दल विचारण्याचा नैतिक अधिकार नाही असे ही काँग्रेस वरींष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. सदर चे बिल पास करताना ज्या सत्ताधारी पक्षाने लोकशाहीचा गाभा असलेल्या संसदीय चर्चेला तिलांजली देली व शेकडो खासदारांचे मनमानी पद्धतीने निलंबन करून हुकूमशाही पद्धतीने सदरचे विधेयक पास केले व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवड समितीत घेतले व त्यांचेच् हाता खाली काम केलेल्या सहकार खात्याचे सचिव राहिलेल्या  ज्ञानेश कुमार (गुप्ता) ना मुख्य निवडणूक आयोग नेमून त्यांचे मार्फत निवडणूक यंत्रणेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करुन जनतेच्या लोकशाही व संविधानीक हक्कांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सत्ताधारी नेत्यांना व प्रवक्त्यांना, विरोधीपक्ष नेत्यांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.
तसेच “संविधानीक संस्थांची स्वायत्तता व लोकशाही मुल्याचे रक्षणा” बाबत सार्वजनिक जीवना (Public Domain) मध्ये येणाऱ्या अनेक बाबींची नोंद न्यायालयाने (सुमोटो) स्वतःहून घेण्याचे अधिकार ही ‘भारतीय राज्यघटनेने’ न्यायसंस्थेस दिले असल्याचे व न्यायसंस्थेकडून तशी अंमलबजावणीची अपेक्षा असल्याचे काँग्रेस वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदन म्हंटले आहे.

पुणे जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश अपात्र विद्यार्थ्यांना,स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर ‘Sent Back’ टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

त्याअनुषंगाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृह गृहपालांशी संपर्क करून दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘Sent Back’ चा पर्याय निवडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी

पुणे दि. 25 : डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलन २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत ३१ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ७७ पदके जिंकत २८६ गुणांसह देशात चौथे स्थान पटकावले. तसेच राज्यातील १३ क्रीडापटूंनी चौथे स्थान मिळवत भक्कम कामगिरीची नोंद केली.

रायपूरमध्ये पार पडलेल्या २७ व्या AIFSM 2024 मधील ८ व्या स्थानावरून महाराष्ट्राने यंदा थेट ४ थ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या यशात राज्यातील ४ वन प्रशिक्षण संस्था आणि २ वन अकादमींतील प्रशिक्षणार्थींचा मोलाचा वाटा असून त्यांनी एकूण २७ पदके मिळवली. विविध ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये—धावणे, लांब पल्ला, रिले, मॅरेथॉन, लांब उडी, रेस वॉक, आलाफेक, भारोत्तोलन आणि पॉवरलिफ्टिंग—यामध्ये प्रशिक्षणार्थींनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली.

एकूणच, महाराष्ट्र वन विभागाच्या प्रशिक्षणार्थींच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र वन विभाग शिक्षण आणि प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक व प्रशिक्षण संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत

  • व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

पुणे दि. 25 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) वितरण तात्पुरते स्थगित असले तरी, इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू असून लाभार्थ्यांना देण्यात येणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात आहे. सप्टेंबर 2025 अखेर होल्ड किंवा ब्लॉक केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज थांबले असल्याच्या प्रसारित बातम्यांवर स्पष्टीकरण देताना महामंडळाने स्पष्ट केले की, नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रीयेतील काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र, व्याज परतावा आणि बँक मंजुरीसंबंधित प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे.

अशा गैरव्यवहारांना आळा बसावा म्हणून महामंडळाने खाते प्रमाणिकरण( Account Validation) प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. एजंटमार्फत दाखल झालेली संशयित प्रकरणे तात्पुरती ब्लॉक करण्यात आली आहेत. अशा लाभार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, एकाच मोबाईल क्रमांक किंवा लॉगिनद्वारे केवळ एकच अर्ज दाखल करता येईल.

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रियेमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण केल्यानंतर शक्य तितक्या लवकर नवीन पात्रता प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे करण्यात आले असून ‘‘टीईटी’ चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने परिषदेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत गोपनीयरित्या प्रश्नसंच तयार करून तज्ञांमार्फत स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात. तयार केलेल्या संचांपैकी यादृच्छिकपणे प्रश्नसंच निवडून गोपनीय मुद्रणालयाकडे दिला जातो. गोपनीय मुद्रणालयामार्फत प्रश्नपत्रिका छापून वर्गखोलीनुसार पाकिटे तयार करून केंद्रनिहाय बॉक्समध्ये सिलबंद पॅकिंग केले जाते. सदर बॉक्सेस सिलबंद गाड्यांमार्फत जिल्हा कस्टडीमध्ये पाठविले जातात. जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कस्टडी ही शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालय असते अथवा सी.सी.टी.व्ही. व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असते. गोपनीय मुद्रणालयाकडून आलेल्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स हे सिलबंद गाडीतून आले असल्याची व बॉक्सेस व्यवस्थित सिलबंद असल्याची खातरजमा करूनच जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याच्या उपस्थितीत, कस्टडीमध्ये सदर साहित्य घेतले जाते.

परीक्षेच्या दिवशी जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करूनच झोनल ऑफिसरकडे केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांचे बॉक्स दिले जातात. झोनल ऑफिसर कस्टडी ते केंद्रावर सदर बॉक्सेस पोहोच करतांना या प्रवासाचेही चित्रिकरण केले जाते. केंद्रावर सदर बॉक्सेस मधून प्रश्नपत्रिकांची ब्लॉक निहाय पाकिटे काढून, ब्लॉकमध्ये सिलबंद पाकिटे वाटली जातात. उमेदवारांच्या, परीक्षार्थीच्या समोर सदर पाकिटे उघडली जातात. याच पद्धतीने या परीक्षेच्यावेळीही कार्यवाही झालेली आहे.

राज्यभरातून कोणत्याही ठिकाणाहून प्रश्नपत्रिकांची गाडी सिलबंद नसल्याबाबत अथवा गोपनीय प्रश्नपत्रिकांचे बॉक्सेस अथवा पाकिटे सिलबंद नसल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. अथवा असे निदर्शनास आले नाही. म्हणजेच गोपनीय मुद्रणालय ते परीक्षा केंद्र हा प्रश्नपत्रिकांचा प्रवास अत्यंत काटेकोरपणे झालेला दिसून येत आहे. या कोल्हापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज उपरोक्त नमूद कार्यपद्धतीनुसार झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असेही श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे : सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य आशीर्वाद देण्यासाठी प्रथम पुण्यात येत आहेत. त्यांच्या सिद्धी साधनेच्या महाआशीर्वादाचा लाभ पुणेकरांना मिळावा यासाठी विश्व धर्म चेतना मंच,पुणे, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने ‘सिद्धी साधनेचा महाआशीर्वाद’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता, वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम, कोंढवा रोड, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक उत्तम बाठिया व सुमित चंगेडिया यांनी दिली आहे.

यावेळी सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरूदेव यांचे व्याख्यान देखील होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोफत पासची व्यवस्था करण्यात आली असून ते कार्यक्रमस्थळी (स्वागत कक्ष येथे )दिले जाणार आहेत. या दिव्य सोहळ्याचा जास्तीत जास्त पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. सविता सिंह भूषविणार अध्यक्षपद

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाची होणार सांगता

पुणे : स्त्रियांच्या साहित्यावर सातत्याने अभ्यास करणारी साहित्यिक व सांस्कृतिक संस्था असा लौकिक संपादन केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता 41व्या स्त्री साहित्य संमेलनाने होत आहे. संमेलन रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध कवयित्री, समीक्षक, विचारवंत डॉ. सविता सिंह भूषविणार आहेत.

संमेलन सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या, ज्येष्ठ कवयित्री अध्यक्ष अंजली कुलकर्णी व कार्यवाह शलाका माटे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिकांच्या कलाकृतींचा रसास्वाद मांडणाऱ्या ‌‘सप्तधारा‌’ या ग्रंथाचे प्रकाशन साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग व संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या वेळी ज्येष्ठ लेखिकांचे प्रातिनिधीक सत्कार तसेच वार्षिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हे. वि. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात डॉ. दीपक शिकारपूर आणि डॉ. सुजाता महाजन यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी डॉ. प्रांजली देशपांडे संवाद साधणार आहेत.

प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉ. ह. वि. सरदेसाई पुरस्काराने प्रा. डॉ. आशालता कांबळे यांना गौरविले जाणार आहे.

तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यप्रेमी भगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनतर ज्येष्ठ लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी शैला मुकुंद संवाद साधणार आहेत.

‌‘गोष्टीवेल्हाळ तात्या‌’ या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांचे अभिवाचन अक्षय वाटवे आणि सहकारी करणार आहेत. संमेलनाच्या समारोप समारंभास डॉ. कीर्ती मुळीक असणार आहेत.

संमेलन सर्वांसाठी खुले आहे.

डॉ. सविता सिंह यांच्याविषयी ..

डॉ. सविता सिंह यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए., एम.फिल., पी. एच.डी. केली आहे. मॉन्ट्रियाल (कॅनडा) येथील मॅकगिल विद्यापीठात त्यांनी साडेचार वर्षे संशोधन आणि अध्यापनाचे काम केले. ‌‘भारतात आधुनिकतेचा विमर्श‌’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सध्या त्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रोफेसर आणि स्कूल ऑफ जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीजच्या संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय हर्बर्ट मारक्यूस सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सदस्या आणि को-चेअर आहेत.

प्रकाशित कविता संग्रह : अपने जैसा जीवन, नींद थी और रात थी, स्वप्न समय, खोई चीज़ों का शोक.

द्विभाषिक काव्यसंग्रह : रोविंग टुगेदर (इंग्रजी-हिंदी) आणि ज स्वी ला मेजों दे जेत्वाल (फ्रेंच-हिंदी).

राजकीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात रियलिटी अँड इट्स डेप्थ : ए कन्वर्सेशन बिटवीन सविता सिंह अँड रॉय भास्कर प्रकाशित.

आधुनिकता, भारतीय राजकीय सिद्धांत आणि भारतातील नारीवाद अशा विषयांवर तीन मोठ्या प्रकल्पांवर त्यांचे काम सुरू आहे.

पुरस्कार : हिंदी अकादमी आणि रजा फाउंडेशन व्यतिरिक्त महादेवी वर्मा पुरस्कार. युनिस डी सूजा अवॉर्ड आणि केदार सन्मान.

पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवेसाठी तत्पर-उदयन माने

दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिशनच्याअध्यक्षपदी उदयन माने; सचिवपदी मनीष दीडमिसे

पुणे: बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी उदयन माने, उपाध्यक्षपदी तनुज नगरानी व नीरज सिंग, सचिवपदी मनीष दीडमिसे, तर खजिनदारपदी मुरली रमणी यांची निवड झाली आहे. २०२५-२०२७ या कालावधीसाठी ‘प्रॉप’च्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून ऍड. महेश यादव (प्रॉप ग्रोथ), दिनेश राठी (प्रशिक्षण व मेंटरशिप सर्कल्स), विक्रम मलिक (बिझनेस एक्स्चेंज व क्रॉस सेल), सारंग मद्रेवार (क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम), रवींद्र यादव (डिजिटल, पीआर व मीडिया) आणि प्रीत कोहली (इव्हेंट्स, एंगेजमेंट व नेटवर्किंग) यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष दर्शन चावला, संस्थापक अध्यक्ष किशन मिलानी, खालिद मेनन सल्लागार मंडळात, तर ‘एनएआर इंडिया’चे चेअरमन रवी वर्मा मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील.

उदयन माने म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी ‘प्रॉप’ ही संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स-इंडियाशी संलग्नित आहे. पुणे हे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेले शहर आहे. त्यामुळे रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणित सदस्यांची डायरी आणि घर खरेदी-विक्री प्रक्रियेत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी जनजागृती सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विकसक, कायदा विशेषज्ञ आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल.”

‘प्रॉप’चे सर्व सदस्य ‘रेरा’ नोंदणीकृत असून त्यांनी ‘रेरा’ परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. हे सर्व सदस्य विविध शहरांत रिअल इस्टेट सेवा देण्यास सक्षम आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे सदस्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींची ओळख होते. तसेच ‘नरडेको’ आणि ‘क्रेडाई’ यांच्याशी असलेल्या द्विपक्षीय संलग्नतेमुळे उद्योगातील समन्वय आणि धोरणात्मक संवाद अधिक मजबूत झाला आहे, असेही उदयन माने यांनी नमूद केले.

‘प्रॉप’चे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेटमार्फत (आयआयआरई) सदस्यांसाठी विशेष कौशल्य-वृद्धी कार्यक्रम राबवले जातात. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर व सुबद्ध निराकरण करण्यासाठी ‘प्रॉप’ने स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा देखील विकसित केली आहे. पारदर्शक व्यवहार, माहितीपूर्ण ग्राहक व प्रशिक्षित रिअल इस्टेट सल्लागार तयार करण्यासह ग्राहकांचा विश्वास दृढ करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे दर्शन चावला यांनी सांगितले.

अमृतांजन हेल्थकेअरचा ग्राहकांचा आवडता पिवळा बाम पुन्हा तयार होणार!

गेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजनचा पिवळा बाम म्हणज अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहेभारतीयांच्या घरी रात्री पलंगावर हा बाम हमखास आढळतो. प्रवासातही हा बाम वापरणारी अनेक मंडळी दिसून येतातघरातील कुणालाही डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास झाल्यास एका हातातून दुसया हातात प्रेमाने दिलेला हा बाम आश्वासक स्पर्शाने आधार देतोशांत आणि सुखद सुगंधाने वेदनेपासून आराम मिळतोकित्येक वर्षांच्या आधारामुळे आणि  या बामच्या अस्तित्वामुळे अनेकांच्या सुंदर आठवणी तयार झाल्या आहेतअमृतांजन हेल्थकेअरचा पिवळा बाम अनेकांच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला आहेहा विश्वास गेल्या १३० वर्षांतील कधीही  डगमगलेल्या खात्रीचे प्रतीक आहे

जुन्या आठवणींना उजाळा देत अमृतांजन हेल्थकेअरने आपल्या लोकप्रिय आणि आयकॉनिक पिवळ्या बामला पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले आहेक्लासिक काचेच्या बाटलीतील पिवळा बाम लोकांना सर्वात जास्त आवडतोपिवळ्या बामचि पुनरावृत्ती अविस्मरणीय असावी याकरिता प्रत्येक बाटलीत २५ टक्के अतिरिक्त बाम देण्यात आला आहेअमृतांजनच्या विश्वासावर आणि आरामदायी उपचारांवर पिढ्यानपिढ्या जपलेले ग्राहक उत्तरोत्तर वाढत राहतील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

बाजारात पिवळा बाम परत येत असल्याची माहिती सर्व ग्राहकांना पोहोचवण्यासाठी अमृतांजनने दोन नव्या जाहिरातींची निर्मिती केली आहेशारीरीक वेदना कार्यालयीन ठिकाण, प्रवास ते अगदी साध्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कामकाजांत व्यत्यय आणतातदैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणाया वेदनांवर अमृतांजनचा पिवळा बाम लोकांना सहज मुक्त करतोवेदनेच्या भागावर बाम लावताचक्षणी लोकांना नैसर्गिकरित्या झटपट दिलासा मिळतोबामचा वापर केल्यानंतर लोकांना त्या क्षणांचा पूरेपूर आनंद घेता येतोअमृताजनंच्या या बामची ही किमया दोन्ही जाहिरातींमध्ये प्रभावीपणे मांडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमृतांजनचा पिवळा बाम औषधाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील विश्वासार्ह सोबती म्हणून वावरला आहेया बामच्या वापराने अनेकांना पिढ्यानपिढ्या आराम मिळाला आहेआता हा बाम जुन्या आकर्षक काचेच्या बाटलीत शक्तीशाली जाहिरातींसह पुन्हा सर्वांसमोर येत आहेनव्याने सादर झालेला हा बाम वेदनाशमनाचे आश्वासन पाळतोअमृतांजन कंपनी आपल्या ग्राहकांना शाश्वत आराम देण्याची आधुनिक काळाची जबाबदारी पार पाडत मूल्यांच्या अपेक्षाही पूर्ण करते.

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीएससंभू म्हणाले, ‘‘गेल्या शतकांहून अधिक काळ भारतातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या रोजच्या वेदना निवारण क्षणांसाठी अमृतांजन बामवर विश्वास ठेवला आहे१८९३ मध्ये पहिल्यांदा अमृतांजन वेदनाशमन बामचे बाजारात अनावरण झाले होतेगेल्या अनेक वर्षांच्या काळात अनेक घरांत पिढ्यानपिढ्या अमृतांजनच्या पिवळ्या बामचे अस्तित्व टिकून आहेआता बाजारात पुन्हा उपलब्ध होताना ग्राहकांना अपेक्षित गोष्टींची पूर्तता केली आहेग्राहकांना अजून चांगला आराम मिळेल, अगोदरपेक्षा जास्त बाम वापरता येईल तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग राहील याकडे आम्ही लक्ष दिले आहेकाचेच्या बाटलीत मिळणारा हा पिवळा बाम केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नसून, आमची १३० वर्षांची अविरहित वचनबद्धताही दर्शवतेगेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी दर्शवलेली काळजी आता अजूनच सक्षम झाली आहे.’’

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्रीमणीभगवतीश्वरन म्हणाले, हा पिवळा बाम ग्राहकांसाठी औषधोपचारांसह ओळख आणि विश्वासाही भावना आहेप्रत्येक कुटुंबासाठी या बामसोबत एक आठवण जोडलेली आहेया पुनप्रेक्षणाने आम्ही नवीन आठणी निर्माण करु इच्छितोबामसाठी काचेच्या बाटल्यांचे वेष्टन हे जबाबदारीक आणि भावनिक निर्णयात्मक पाऊल आहेअमृतांजन आपल्या मूळ तत्त्वांशी पुन्हा जोडला गेला आहेनव्या पिढ्यांसाठीही हा बाम प्रभावी आणि महत्त्वाचा ब्रँण्ड राहील याची खात्री आहे.

बाजारात पिवळा बाम पुन्हा उपलब्ध करुन देत अमृतांजनने ग्राहकांच्या वेदनाशमनाची आणि आरामाची परंपरा कायम ठेवली आहेही अखंड परंपरा यापुढेही प्रत्येक घरात कायम राहील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व ‘नेट-झिरो’साठी पुढाकार,आरती अहिवळे यांची माहिती

0

 ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व ईपीडी ग्लोबल यांच्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

पुणे: शाश्वत विकास, पर्यावरणाचे संवर्धन, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह २०७० पर्यंत भारताने ठेवलेले ‘नेट-झिरो’चे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हरित व पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणेस्थित ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व नॉर्वेस्थित ईपीडी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे,” अशी माहिती ग्रीन सोल्यूशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे दिली.

ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ( एन्व्हायर्नमेंटल प्रॉडक्ट डिक्लेरेशन-ईपीडी) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला. ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन आणि ‘ग्रीनएक्स’चे सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते. तीन वर्षांकरीता हा करार झाला असून, भारतीय उद्योगसमूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबलमार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल करणार आहे. संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज त्या उत्पादनावर, तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

आरती भोसले-अहिवळे म्हणाल्या, “या सहकार्यातून ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे. यामुळे देशभरात पर्यावरणीय उत्पादन विस्ताराला गती मिळणार आहे. शाश्वत विकास, पर्यावरणीय पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण अहवाल व मानदंड यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्र येत आहेत. या उपक्रमातून भारतात अधिक जबाबदार, हरित आणि नवोन्मेषी उद्योगसंस्कृती घडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रीनएक्सने गेल्या काही वर्षांत रसायने, अभियांत्रिकी, धातू, अन्न उद्योग अशा विविध क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक व्यवसायांसोबत ईपीडी प्रकल्प राबविले आहेत. ईपीडी ग्लोबलसोबतचा करार भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा उपलब्ध करून देईल आणि प्रमाणपत्रांच्या खर्चात सुमारे ७० टक्के घट होईल.”

सागर अहिवळे म्हणाले, “भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांचे जागतिक बाजारातील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. ईपीडी असलेली उत्पादने जगभरात अधिक प्राधान्याने स्वीकारली जात आहेत. त्यामुळे भारतीय एमएसएमई उत्पादकांना निर्यात वाढविण्यास आणि चांगला दर मिळविण्यास याचा मोठा फायदा होईल. पारदर्शकता वाढवणे, शाश्वततेकडे वाटचाल सुलभ करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार स्वतःला सिद्ध करणे, हा या सहयोगाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या ईपीडी अनिवार्य नसली तरी पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे त्यावर भर देत आहेत. आगामी काळात हा आवश्यक निकष ठरणार आहे.”

ही भागीदारी भारतासह संपूर्ण प्रदेशातील शाश्वतता क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब वेगवान करणे, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. भारताच्या २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ ध्येयाच्या पूर्ततेसाठीही ही भागीदारी अर्थपूर्ण योगदान देणार आहे. पुणे, मुंबई, गुजरात आणि दुबई येथे ग्रीनेक्सची कार्यालये असून, देशातील इतर प्रमुख १० पेक्षा अधिक औद्योगिक शहरांत विस्तार करण्यात येणार आहे. १०० पेक्षा अधिक पर्यावरणीय सल्लागार, तसेच या प्रक्रियेशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे,” असे सागर अहिवळे यांनी नमूद केले.

भारतीय उद्योगांना पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलसोबत झालेला हा करार महत्वाचे पाऊल ठरेल. भारतात आमच्या सेवा विस्तारण्यासाठी ‘ग्रीनएक्स’च्या स्वरूपात एक विश्वासू सहकारी आम्हाला मिळाला आहे. या दोन्ही संस्थांची भागीदारी भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.

– हॅकॉन हाऊआन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ईपीडी ग्लोबल नॉर्वे

बासरी, हार्मोनियम, रुद्र वीणा वादनाचा नादमधुर त्रिवेणी‌ संगम

‘त्रिवेणी‌’ मैफलीतून साधला सुमधुर संगीत योग

ऋत्विक फाऊंडेशनतर्फे विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन

पुणे : हार्मोनिमय वादनातून साकारलेले नादमधुर सूर, रूद्र वीणेतून निर्मित झालेले धीरगंभीर स्वर आणि नादमाधुर्य दर्शविणारे बासरीचे सुमधुर गुंजन यातून एका अनोख्या संगीत योगाची पर्वणी रसिकांना मिळाली.

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍आयोजित ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमात हार्मोनियम वादक मिलिंद वासुदेव, भारतातील पहिल्या रुद्र वीणा वादक ज्योती हेगडे यांच्यासह प्रसिद्ध बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांची सांगीतिक मैफल रंगली. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ येथे या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

मिलिंद वासुदेव यांनी हार्मोनियम वादनातून मधुवंती रागाचे माधुर्य साकारताना सुरुवातीस धृपद अंगाने आलाप, जोड आलाप आणि जोड झाला सादर करत मध्यलय रूपकमधील एक गत तसेच मध्यलय तीन तालातील एक गत घेऊन अतिद्रुत तीन तालामध्ये झाला सादर केला. या सादरीकरणात पारंपरिक पद्धतीची वाट न चोखाळता मिलिंद वासुदेव यांनी धामा या वाद्याबरोबर जोड आलाप आणि जोड झालाचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले. त्यांना आशय कुलकर्णी (धामा आणि तबला), स्वरा किरपेकर (तानपुरा), नचिकेत हरिदास (स्वरमंडल) यांनी समर्पक साथसंगत केली.

भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील पहिल्या रुद्र वीणा वादक म्हणून ख्याती प्राप्त विदुषी ज्योती हेगडे यांनी रुद्र वीणा या प्राचीन वाद्याचे वैशिष्ट्य सांगून वादनाची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर दुर्गा सादर केला. रुद्र वीणेतून साकारणाऱ्या धृपद शैलीच्या सूरांशी तादात्म्य होताना रसिकांना अद्‌भुत ध्यानावस्थेची अनुभूती आली. ज्योती हेगडे यांनी वीणा वादनाची सांगता चौतालमधील बंदिशीने केली. अनुजा बोरुडे-शिंदे यांनी पखवाजवर दमदार साथ करत मैफलीत रंग भरले.

विख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या बासरी वादनाची सुरुवात राग बागेश्रीने केली. सुरुवातीस पखवाजच्या साथीने त्यांनी तंत्रकारी अंगाने सुरेल बासरी वादन केले तर तबल्याच्या साथीने वादन करताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी गायकी अंगाने बासरी वादन करून दोन्ही शैलींवरील प्रभुत्व दर्शविले. बागेश्री रागाचे सौंदर्य उलगडताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी बडे गुलाम अली खान यांचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या जागांचे मोहक दर्शन घडविले. कार्यक्रमाची सांगता करताना पंडित पन्नालाल घोष यांनी आपल्या बासरी वादनातून अजरामर केलेल्या बंदिशीचे स्वर्गीय स्वर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीतून प्रभावीपणे उमटले. ऋषिकेश जगताप (तबला), मोहित पुराणकर (बासरी), ऋग्वेद जगताप (पखवाज) यांनी आपल्या प्रभावी साथीतून मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली.

रसिकांनी या तिनही वादकांना भरभरून दाद देत मैफलीचा स्वराविष्कार अनुभवला.

कलाकारांचे स्वागत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌च्या संचालिका चेतना कडले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.

‘यहा भैय्या का राज चलता है’, म्हणणाऱ्या रिक्षाचालकाने हात जोडून मागितली माफी, म्हणतो ‘माननीय राजसाहेब…’

0

कान पकडून मागितली माफी
ठाणे -ठाण्यामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला होता. यावेळी त्याने “ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” अशा शब्दांत आव्हान दिलं होतं. इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा असणाऱ्या रिक्षाचालकाने किरकोळ वादातून वाद घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण तापल्यानंतर त्याने आता मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली ठाण्यात पोखरण रोड नं. 2, गांधीनगर येथील अनिल वाइन्स समोर रविवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने, जो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते त्याने राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबद्दल अयोग्य व अभद्र भाषा वापरली.

⁠”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है”, ⁠”इधर कोई भी मराठी आया तो उसकी…”, अशा शब्दांत त्याने धमकावलं होतं. गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून परप्रातींयाने दारु पिवून धुडगूस घातला होता.ठाण्यातील गांधीनगर परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. ठाणे गांधीनगर पोखरण रोड नंबर 2 येथील घटना आहे.

रिक्षाचालकाने अखेर मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. रिक्षा चालकांचं नाव शैलेंद्र यादव आणि राकेश यादव आहे. शैलेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे तर राकेश यादव हा आरोपी फरार आहे.मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षाचालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली. मात्र मनसैनिक अजूनही संतापले असून याला मनसे स्टाईल उत्तर देण्यावर ठाम आहेत.”मी विनंती करत आहे आणि सर्वांची माफी मागत आहे. मी काल गांधीनगर येथे शिवसेना कार्यालयासमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आली असता त्याच्याशी वाद झाला. यावेळी मराठी आणि भैय्या असा वाद झाला. माझ्या तोंडून माननीय राजसाहेब आणि अविनाश जाधव साहेब यांना शिवी दिली. यासाठी मी हात जोडून माफी मागत आहे,” असं तो माफी मागताना म्हणाला आहे.