Home Blog Page 1314

यांना केवळ गुजरात ला सर्वाधिक मोठं करायचंय ? जितेंद्र आव्हाड

पुणे- हिंदू -मुस्लीम , सवर्ण – बहुजन आणि बहुजानात देखील मराठा -कुणबी अशा विविध धर्म ,जाती पातीत देशाचे विघटन होण्याचा प्रयत्न जोमाने होत असताना अशा प्रयत्नाना हाणून पडून देश एक संघ ठेवायचा असेल तर धर्म , जाती पतीच्या भिंती ओलंडून मानवतेच्या मार्गाने एकजूट राहून देश मजबूत राहू शकतो असे असताना आता प्रांत वाद देखील सुरु झाल्याने चिंतेचे विषय समोर येऊ लागले आहेत .महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली.त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विमानतळावरील एका फलकाचा फोटो काढून ट्वीट केले आहे .इतर राज्यांचे उद्योग पळविल्यावर #GujratMeansGrowth हे बोलणं फार सोपं आहे.. असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली. तेवढ्यावर न थांबता त्यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणा तसेच सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

कर्नाटकातील मराठी भाषक 865 मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नाहीत. त्यातच महाराष्ट्रातील काही गावांनी गुजरात, तेलंगणामध्ये जाण्याचा ठराव केला आहे. ही परिस्थिती एकीकडे असताना पालघर जिल्ह्यावर गुजरातकडून अन्याय सुरू आहे. पालघरला मंजूर झालेले कोस्टल गार्ड गुजरातने पळवून नेले. गेल्या सहा महिन्यांपासून गुजरातची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील गावांवर वळली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली गुजरातने चालवल्या आहेत. सीमावर्ती तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई या गावात असलेला सीमादर्शक दगड सुमारे 150 मीटर महाराष्ट्राच्या बाजूला आतमध्ये सरकवून गुजरातने आपली हद्द वाढवली. त्यामुळे नवा संघर्ष उद्भवला आहे.

मराठा समाज हा मागास आहे की नाही याचा अहवाल गोखले इन्स्टिट्युट, फडणवीस सांगणार तसाच देणार हे सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट-अजय शिंदे

पुणे- मराठा समाज हा मागास आहे की नाही याबाबतचा अहवाल गोखले इन्स्टिट्युट फडणवीस सांगणार तसाच देणार हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट वाटत नाही काय ? असा सवाल मनसे चे नेते अजय शिंदे यांच्या कडून करण्यात आला आहे , सरकार हवे तसाच अहवाल घेणार नाही कशा वरून…? असा स्पष्ट सवाल त्यांनी केला आहे . या संदर्भात अजय शिंदे यांनी असे म्हटले आहे कि,’
सर्व्हेण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज या संस्थेची शाखा म्हणजे गोखले इन्स्टिट्युट या गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठ्यांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या नागपूरमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीत काल परवाच घेण्यात आला. हा निर्णय उपमुख्यमंत्री यांच्या दबावाखाली घेण्यात आल्याची चर्चा आहे,आणि असा आरोप आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लोरकर यांनी यापूर्वीच केला आहे.

विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला मंगळवारी मुख्यमंत्री उत्तर देणार होते. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष न्या. सुनील शुक्रे यांनी आयोगाची तातडीची बैठक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात घेतली व आपल्या पहिल्याच बैठकीत हे सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्याचा निर्णय घेतला ,तसेच त्यासाठी लागणारी प्रश्नावलीही तयार करण्यात आली. हे सर्वेक्षण कुटुंबनिहाय होणार आहे. या कामासाठी गोखले इन्स्टिट्यूटतर्फे नवीन सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे (केले जाणार आहे केले नाही). यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्याला आयोगाने परवानगी दिली आहे. या सर्व प्रक्रियेवर आयोगाचे नियंत्रण असेल वगैरे
राज्य सरकारची मराठा आरक्षण बाबत झालेली गोची आणि सरकार करत असलेली चाल ढकल बघता सरकार च्या मराठा आरक्षणा बाबतच्या भूमिके संधर्भात संशयाचे वातावरण जनतेत आहे हे स्पष्ट आहे, खर तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी या आंदोलनाच्या सुरवातीस “सरकार आरक्षण देणार नाही ” हे वास्तव सांगितल होतेच .
अशा परिस्थितीत आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता, असा आरोप केला होता . हे बघता सरकारला मराठा समाज हा मागास आहे की नाही या बाबतचा अनकुल अथवा प्रतिकूल असा अहवाल अशी संस्था च देऊ शकते जीची मान सरकारच्या हातात आहे.
गोखले इन्स्टिट्युट ची शिखर संस्था असणारी भारत सेवक समाज या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार सुरू आहे.आणि या बाबतच्या अनेक तक्रारी सरकार दरबारी आहेत . मनसे ने देखील याबाबत सरकारी खात्या कडे तक्रारी केल्या आहेत त्या मुळे प्रमुख पदाधिकारी कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत अशा परिस्थितीत सरकार म्हणेल तोच अहवाल देण्या साठी संस्थेवर दबाव असणार हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे . प्रतिकूल किंवा अनुकूल कोणा साठी हा प्रश्न आहेच अशा परिस्थितीत सदर काम गोखले इन्स्टिट्युट लाच मिळावे या साठी उपमुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करीत असतील तर संशयाचे ढग अधिक गडद होतात.
कारण प्रश्न निर्माण होतो सदर संस्था खरे वास्तव मांडणार की उपमुख्यमंत्री सांगतील ते मांडणार ?

“अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोमवारी प्रदान करणार

पुणे – भारताचे पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी हे प्रखर राष्ट्रप्रमी तसेच संवेदनशील मनाचे कवीही होते. भारत वर्षाचे राजकारणी कमी अन सुसंस्कृतिक दूत म्हणून अधिक अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची जगभरात अन जनमानसात ओळख आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे त्यांचे पुण्याशी एक वेगळे नातं होते. अशा अटलजींच्या स्मृती चिंरतन ठेवण्याच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करते, यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डी. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार आहे, अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, यंदाचे वर्ष हे अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून स्व. अटलजींच्या जयंतीदिनी म्हणजे २५ डिसेंबरला हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, बालगंर्धव रंगमंदीरात सायं. ५ वाजता होणा-या समारंभारत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित रहाणार आहेत. अटलजींनी अनेक सभा पुण्यात गाजवल्या आहेत. पण त्याच बरोबर अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाचेही कार्यक्रम याच पुण्यात त्यांच्या हस्ते झाले आहेत. त्यांनी प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेतही केलेली भाषणे आजही पुणेकरांच्या स्मरणात आहेत, याशिवाय गदिमा व सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, सुवर्ण महोत्सव याच सांस्कृतिक राजधानीत स्व. अटलजींच्या विशेष उपस्थित साजरा झाला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्व. अटलजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने स्व. अटलजींच्या स्मृती जागवणारा त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित कार्यक्रम “आओ फिरसे दिया जलाएँ” पुरस्कार वितरणानंतर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून कार्यक्रमाचे संहिता ज्येष्ठ पत्रकार व्यासंगी विजय कुवळेकर यांनी लिहिली आहे. दृकश्श्राव्य, संगीत, नृत्याविष्कार असा हा कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभानंतर हा कार्यक्रम होणार आहे.

स्व. अटलजींच्या निधनानंतर संस्कृती प्रतिष्ठानने त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन गौरवण्यास सुरुवात केली. पुरस्कारचे हे पाचवे वर्ष असून पहिला पुरस्कार विद्यावाचस्पती डॉ, शंकरजी अभ्यंकर यांना देण्यात आला. त्यानंतर डॉ. शां. ब. मुजुमदार, जेष्ठशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथजी माशेलकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्काराचे किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे मानकरी आहेत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, मानपत्र, स्मृती चिन्हं, शाल आणि श्रीफळ असे आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलजींच्या जीवन प्रवास आणि कवितांवर आधारित संवाद पुणे निर्मित हा कार्यक्रम आओ फिरसे दिया जलाएँ सादर करण्यात येणार आहे, यात दृकश्राव्य कार्यक्राबरोबरच हिंदी नाट्य चित्रपट अभिनेते मनोज जोशी हे अटलबींच्या निवडक कवितांचे वाचन करतील. पार्श्वगायिका बेला शेंडे आणि अभय जोधपूरकर हे स्वरबद्ध गाणी सादर करतील तर सुखदा खांडकेकर आणि नुपूर दैठणकर या नृत्याविष्कार सादर करतील, या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी करणार आहेत, कार्यक्रमाचे संयोजन व नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे.

तसेच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कलांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. शिल्पकला, चित्रकला, रंगावली, कैलीग्राफी, फोटोग्राफी अशा विविध कलेच्या संगमेतून अटलजींचे स्मरण” अटलपर्व ” या भव्य प्रदर्शनीतून होणार आहे, याचे उद्घाटन प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंगसांडभोर यांच्या उपस्थित होणार आहे, दिनांक २५ डिसेंबर सकाळी ११ वाजता हे उद्घाटन होणार आहे. अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

0

नवी दिल्लीदि. २०: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रवींद्र सभागृहात वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

‘रिंगाण’ या कादंबरीविषयी

‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ साठी पुरस्कार जाहीर झाला. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वातही घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो…. या विस्थापितांच्या दु:खांची तीव्रता या कादंबरीतून वाचकांपर्यत पोहोचवली आहे. केवळ तेवढ्यापुरती ही कादंबरी मर्यादित राहत नाही, तर माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री.अभिराम भडकमकर, डॉ. संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण १२ मार्च २०२४ रोजी कमानी ऑडिटोरियम येथील आयोजित कार्यक्रमात होणार असल्याची माहिती सचिव के. श्रीनिवासराव यांनी दिली.

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबईदि.२० :राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा़ असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत

या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ४ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा

पुणेकेंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक (Pune) 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दिनांक 27 डिसेंबरला शिवनेरीपासून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातून हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. राष्ट्रवादी (Pune) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाची सांगता सभा होणार आहे.

या सभेला महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशातील सर्व घटकांतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्या नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यावर खासदारांचे निलंबन केले जाते, हे दुर्दैव आहे, असेही कोल्हे म्हणाले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे, दि. २०: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.

या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

पुणे- पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ( Pune) पत्नी माधुरी उर्फ अनिला  अनिल शिरोळे यांचे आज (दि.20) दिर्घकालीन आजाराने पुण्यात सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.त्या शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कोविड व्हेरियंट जेएन १ च्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

0

नागपूर दि. 20 : कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले. 

कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन 1 या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन 1 या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन 1 व्हेरियंट झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात 3.3 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण सध्या 27.1 टक्के पर्यंत गेले असून जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. फ्रान्समध्ये 20.1 टक्के, अमेरिका 14.2 टक्के, सिंगापूर 12.4 टक्के, कॅनडा 6.8 टक्के, युनायटेड किंगडम 5.8 टक्के, स्विडन येथे 5 टक्के येवढे आहे. देशात 19 डिसेंबर 2023 पर्यंत 2 हजार 311 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 2 हजार 41 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहेत. तामिळनाडू 14 तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत. याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार-सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मिलिंद एकबोटे,धीरज घाटे, सुनिल देवधर आणि एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार यांची उपस्थिती

पुणे, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल.

या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो,असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांचा दंड

0

नवी दिल्ली- नवीन दूरसंचार विधेयक 2023 बुधवारी, 20 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक अंतिम पुनरावलोकनासाठी राज्यसभेकडे पाठवण्यात आले आहे. या विधेयकात बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

बिलामध्ये टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना सिम कार्ड देण्यापूर्वी बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यास सांगितले आहे.

हे विधेयक सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेण्यास, व्यवस्थापित करण्यास किंवा निलंबित करण्यास अनुमती देईल. म्हणजेच युद्धसदृश परिस्थितीत गरज भासल्यास सरकार दूरसंचार नेटवर्कवरील संदेश रोखू शकणार आहे.

विधेयक दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणार्‍या 138 वर्ष जुन्या भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा घेईल. याशिवाय हे विधेयक भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933 आणि टेलिग्राफ वायर्स कायदा 1950 ची जागा घेईल. ते ट्राय कायदा 1997 मध्ये सुधारणा देखील करेल.

परवाना प्रणालीत बदल होणार
या विधेयकामुळे परवाना प्रणालीतही बदल होणार आहेत. सध्या सेवा पुरवठादारांना विविध प्रकारच्या सेवांसाठी वेगवेगळे परवाने, परवानग्या, मंजुरी आणि नोंदणी घ्यावी लागते. अशाप्रकारचे 100 हून अधिक परवाने आणि नोंदणी दूरसंचार विभागाने जारी केलेले आहेत.

जिओ, एअरटेल, स्टारलिंक यासारख्या कंपन्यांना फायदा
या विधेयकात दूरसंचार स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे सेवा सुरू होण्यास वेग येईल. रिलायन्स जिओ, भारती एअरटेलचे OneWeb आणि एलोन मस्कच्या Starlink सारख्या कंपन्यांना नवीन बिलाचा फायदा होणार आहे.

प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी ग्राहकाची संमती घेणे आवश्यक
ग्राहकांना वस्तू आणि सेवांसाठी जाहिराती आणि प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी त्यांची संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात असेही म्हटले आहे की दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीला ऑनलाइन यंत्रणा तयार करावी लागेल, जेणेकरून वापरकर्ते त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतील.

बिलाच्या नवीन आवृत्तीमधून ओव्हर-द-टॉप सेवा वगळल्या
या विधेयकात ई-कॉमर्स, ऑनलाइन मेसेजिंग यासारख्या ओव्हर-द-टॉप सेवांना दूरसंचार सेवांच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी जेव्हा दूरसंचार विधेयकाचा मसुदा सादर करण्यात आला, तेव्हा त्यात ओटीटी सेवांचाही समावेश करण्यात आला होता. याबाबत इंटरनेट कंपन्यांनी मोठा गदारोळ केला होता. त्यानंतर ओटीटीला या विधेयकातून वगळण्यात आले आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत दीड लाख नागरिकांची भेट ; शालेय विद्यार्थी आणि युवकांची संख्या लक्षणीय

पुस्तकांची विक्री जोरात सुरू असल्याची संयोजकांची माहिती

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत दीड लाख नागरिकांनी भेट दिली असून, यामध्ये युवक – युवतींची संख्या लक्षणीय आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील प्रकाशकांच्या स्टॉलवर विविध प्रकारची पुस्तके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या स्टॉलवर सरासरी ५० हजार रुपयांची पुस्तक विक्री होत असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी बुधवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठे आणि पांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, भाजप नेते माधव भांडारी, प्रसेनजीत फडणवीस, ॲड. मंदार जोशी आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर, साधारण दीड लाख नागरिकांनी भेट दिली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा वाढणार आहे. शनिवारी आणि रविवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रदर्शन रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या महोत्सवात २८ हजार शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारी पुस्तके आवर्जून पाहत आहेत. त्याचप्रमाणे महाराजांवरील माहिती प्रदर्शनालाही भेट देत असल्याचे पांडे यांनी सांगितले.पुणे पुस्तक महोत्सवात साधारण २५० स्टॉल्स आहेत. यातील साधारण २०० स्टॉल्सवर सरासरी ५० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री होत आहे. त्यामुळे दिवसभरात साधारण १ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यास, आतापर्यंत साधारण चार कोटी रूपयांपेक्षा अधिकची पुस्तकांची विक्री झाली आहे. या आकडा वाढण्याचीही शक्यता आहे, असे पांडे आणि मराठे यांनी सांगितले.
डॉ. सदानंद मोरे यांचा सन्मान
मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या विद्यापीठाची घोषण करण्यात आली आहे. या निमित्ताने पुणे पुस्तक महोत्सवात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, बागेश्री मंठाळकर, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते.

पुणे शहरात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन होणे ही अत्यंत चांगली बाब आहे. या निमित्ताने लोकांना विविध प्रकाराची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळते. या महोत्सवाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करायला हवे. असे उपक्रम यापुढील काळातही पुणे शहरात व्हायला हवेत.

  • डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक

भारतात हार्डवेअर क्रांतीची गरज-मृत्यूंजय सिंग


एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चीनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपोली असल्याचे चित्र होते. परंतू कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. तरी देखील भारतात साॅफ्टवेअर प्रमाणे हार्डवेअर क्षेत्रातही क्रांती आवश्यक आहे, असे मत ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मृत्यूंजय सिंग यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी, ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृष्ट प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात एआयसीटीईचे चेअरमन टी.जी. सितारामन यांनी देखील मार्गदर्शन केले.पुढे बोलताना मृत्यूंजय सिंग म्हणाले की, सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे म्हणत त्यांनी कौतुकही केले.    यावेळी संजीव कुमार यांनी देखील विद्यापीठाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद-स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विकसीत भारत@२०४७ या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या कल्पना ऐकवताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते.

अमिषा पटेल, जतिन खुराना आणिअँजेला क्रिसलिंझकीस्टारर “तौबा तेरा जलवा” चा ट्रेलर रिलीज


अमीषा पटेल, जतिन खुराना आणि अँजेला क्रिसलिंझकी स्टारर ‘तौबा तेरा जलवा’ 5 जानेवारी, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. आगामी चित्रपट ‘तौबा तेरा जलवा’ हा सिनेमा कथाकथनाच्या क्षेत्रात एक गेम चेंजर ठरणार आहे.
‘तौबा तेरा जलवा’च्या ट्रेलरमध्ये भावनांच्या थरांनी भरलेले, अनपेक्षित कथानकाचे ट्विस्ट आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे वचन देणारे वैविध्यपूर्ण उपकथानक छेडछाड करते. गाझियाबाद, सिकंदराबाद आणि मुंबईच्या दोलायमान लोकलच्या विरूद्ध सेट केलेला, हा चित्रपट शकील खानच्या छायांकनाच्या लेन्सद्वारे प्रत्येक स्थानाचे सार सुंदरपणे सामील करतो.

या सिनेमॅटिक प्रयत्नात, जतीन खुराना पश्चिम उत्तर प्रदेशातील एक जबरदस्त आणि प्रभावशाली व्यावसायिक व्यक्ती, रोमी त्यागीच्या शूजमध्ये उतरतो. त्यागी, एक माणूस ज्याच्या निर्भयतेला परमात्म्याशिवाय कोणतीही सीमा माहित नाही, त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर मनापासून मोहित आहे, शक्ती आणि अहंकाराच्या गुंतागुंतांना मूर्त रूप देतो.

तथापि, प्रतिभावान अमीषा पटेलने चित्रित केलेल्या लैलाच्या प्रवेशासह कथानक एक वेधक वळण घेते, ज्यात त्यागी आणि रिंकूचे जीवन विस्कळीत होते, मोहक अँजेला क्रिस्लिंझकी यांनी लिहिलेले. रिंकू, परीकथांवर विश्वास ठेवणारी, तिच्या मोहक राजकुमाराची वाट पाहत आहे आणि या भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या टक्कर प्रेम आणि नातेसंबंधांच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देणारी परिवर्तनाची वावटळ निर्माण करते.

दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांचे सर्जनशील पराक्रम, विक्रम मॉन्ट्रोजच्या चित्तथरारक संगीत रचनांसह, एका तल्लीन आणि आकर्षक सिनेमॅटिक अनुभवासाठी स्टेज सेट करते. शिवाय, राजेश शर्मा, नीरज सूद, अनिल रस्तोगी आणि एहसान खान यांसारख्या कलागुणांचा समावेश असलेले कलाकार, चित्रपटात चित्रित केलेल्या बहुआयामी पात्रांना सखोलता आणि सत्यता देतात.

बहुप्रतीक्षित रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपट रसिकांमध्ये उत्साह वाढत चालला आहे. प्रेक्षक आतुरतेने जतीन खुराना यांनी रोमी त्यागी या पश्चिम उत्तर प्रदेशातील उद्योगपतीची भूमिका साकारली आहेत आणि त्यांचे पात्र ‘तौबा तेरा जलवा’च्या मनमोहक कथानकाशी कसे गुंफले आहे हे पाहण्याची आतुरतेने अपेक्षा आहे.

प्रेम, आत्म-शोध आणि जीवनातील अनपेक्षित वळणांच्या गुंतागुंतीची माहिती देणारे अनोखे कथन सादर करून, तौबा तेरा जलवा स्क्रीनवर कृपा करण्यासाठी सज्ज असताना भावनिक रोलरकोस्टरसाठी तयार व्हा. 5 जानेवारी, 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होत असताना जतीन खुराना यांचे जबरदस्त रोमी त्यागीमध्ये झालेले उल्लेखनीय परिवर्तन पाहण्याची संधी गमावू नका.

आकाशदित्य लामा दिग्दर्शित आणि मदनलाल खुराना आणि नरेश बन्सल यांच्या श्रीराम प्रोडक्शन आणि व्हिक्टोरियस एंटरप्रायजेसच्या प्रतिष्ठित बॅनरखाली निर्मित. तौबा तेरा जलवा 5 जानेवारी, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. हे रोमँटिक ड्रामा उत्तर प्रदेशच्या दोलायमान टेपेस्ट्रीच्या विरोधात सेट केलेल्या भावना, उच्च-व्होल्टेज ड्रामा आणि अनपेक्षित ट्विस्ट यांचे एकत्रित मिश्रण दर्शवते.

राजगडावर ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ उत्साहात साजरा

पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन ;  ३५७ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन किल्ले राजगड उत्सव – वर्षे ४३ वे

पुणे : किल्ले राजगड येथे पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर  असा ढोल ताशांच्या गजरात निघालेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा…मर्दानी खेळ …छत्रपती शिवरायांचा जयघोष … अशा उत्साही वातावरणात आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खुर्द येथील खंडोबाचा माळ व गडावरती थाटात साजरा करण्यात आला .
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले होते. वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन झाले. पाल दरवाज्यावर पालखीचे पूजन करण्यात आले. 
या प्रसंगी पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे,  संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, सतीश सोरटे, सुरेश परदेशी व शिवप्रेमी उपस्थित होते.  जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय, पुणे .यांनी प्रथोमोपचार सेवा व रुग्ण वाहिका सेवा दिली. पुणे महानगरपालिका सायकल क्लब या उत्सवात मध्ये सहभागी झाला होता.

पालखीचे आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रवी रोकडे, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाल वेशभूषेत राजवीर पायगुडे, तसेच मंदार राजवाडे, विकास रोकडे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते.

उत्सवाच्या पूर्वसंध्येला किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हंडे महाराज यांच्या मठात मॉसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खंडोबा मालावर शिव पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी वेल्हा पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. वसंतराव प्रसादे, सुर्यकांत भोसले, संजय दापोडिकर, अरविंद महाराज, रोहिदास हंडे महाराज , इंदुबाई बापू शिर्के, बाळकृष्ण महाराज दसवडकर, ह.भ.प दिनकर वालगुडे, नाना शिर्के, अंकुश कुळे, अनंता रेणुसे, विठ्ठल दर्डिगे , दशरथ भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ दर्डिगे , रामभाऊ दर्डिगे, पांडुरंग दर्डिगे, रामचंद्र पोळ, शिवाजीराव पोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
सायली गोडबोले-जोशी यांनी राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर केला. आग्र्याहून सुटका या विषयी व्याख्यात्यांची  व्याख्याने झाली. यावेळी माधव जगताप, रणजीत पठारे यांनी गडावरील सुधारणा, सुविधा व सुरक्षा या बाबत आढावा  घेतला. राजगडावरील पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या सदरेचा लवकर लोकार्पण सोहळा करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे वीरेंद्र सिंह ठाकूर, योगेंद्र भालेराव, मंगेश राव,  अभिजित पायगुडे, पांडा मोरे,  शशी रसाळ, निलेश बारावकर, गणेश बोरकर, संजय शेंडकर, सुनील तोंडे, सचिन गोळे,  गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर,  प्रशांत पायगुडे,  अमित दारवटकर, सचिन यादव,  अभिजित गोखले,  मोहोन देढे, विवेक नाकोड, शुभम शिंदे, महेश कदम, सचिन पिसाळ, प्रमोद साबळे, प्रियंका दापोडीकर, समृध्दी कुलकर्णी, आत्मज हळंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पहिले.