पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, रमेश बागवे, कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, नितीन परतानी, शशिकांत बिबवे, हेमंत राजभोज, दिपक ओव्हाळ, सुमित डांगी, प्रकाश पवार, सुरेखा खंडागळे, अंजली सोलापूरे, ज्योती परदेशी, ॲड. राजश्री अडसुळ, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, वैशाली रेड्डी, अनिस खान,रफिक शेख, सुजित यादव आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले ‘‘देशाला संगणक युगाची सुरुवात राजीव गांधीजींनी करून दिली. पूर्वी फोन लावण्यासाठी देखील तासंतास उभे रहावे लागायचे परंतु राजीव गांधी यांनी टेलिफोनमध्ये क्रांती करून जागोजागी पीसीओ व एसटीडी बूथ चालू केले ज्यामुळे तरुणांना व अपंगांना रोजगार मिळाला भारताला खऱ्या अर्थाने २१ व्या शतकाकडे नेण्याचे काम हे राजीव गांधी यांनी केले यामध्ये त्यांना सॅम पित्रोदा यांनी मोलाची मदत केली. अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडून सर्वांसाठी दर्शनाची व्यवस्था करणारे व त्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी शिलन्यास केला. असे भारतरत्न राजीव गांधी यांना मी अभिवादन करतो.”
यानंतर कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार व अॅड अभय छाजेड यांनी आपल्या भाषणात राजीव गांधी यांच्या कार्याचा गौरव केला.