पुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या पुढाकाराने दिवा प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने गरजूंना अन्न पुरविणाऱ्या उपक्रमाने आज महिनापुर्तीनंतरही वाटचाल अविरत सुरु ठेवली .लोकांना खायला नाही , लॉकडाऊन मुळे काम करता येत नाही ,चरितार्थ चालविता येत नाही ,हातावर पोट असल्याने ज्यांची जीवनयात्रा खडतर बनू पाहते आहे अशा असहाय्य बनलेल्या भुकेल्या पोटाला थोडाफार आधार मिळावा ,आणि अशा अडकलेल्या गोरगरिबांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होईल अशा भावनेने मानकर आणि त्यांच्या मित्र परिवाराने कोरोना मुळेअडचणीत सापडलेल्या कुटुंबाना सहाय्य करणे सुरु ठेवले आहे. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आपण हि सेवा अविरतपणे सुरु ठेवू असा निर्धार मानकर यांनी केला आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन दोन हजार अन्नाची पाकिटे मानकर यांचे कार्यकर्ते मोटार सायकलवरून गरजूंच्या दारापर्यंत पोहोचवीत आहेत . सुरुवातीला नारायण पेठेत भाजीपाला ,धान्य आणले जाते तिथे शिजवून पाकिटे बनवून तिथून ते टेम्पोने पौड रस्त्यावर पोहोचविले जातात .तिथून मग कार्यकर्ते मोटार सायकलवर जाऊन गरजूंच्या दारापर्यंत पोहोचवीत आहेत .