पुणे : पाकिस्तानहुन येऊन पुणे पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झालेल्या 17 नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार हेमंत निकम, डॉ.युधिष्ठिर लालजी, वीरेंन्द्र कुकरेजा, डब्बू आसवानी, बाळासाहेब रुणवाल आदी उपस्थित होते.
हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.
सिंधी समाजातील 22 जण पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झाले होते. त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व देण्यात आले. सिंधी समाजातील संत युधिष्ठिर लालजी, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, डब्बू आसवानी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, तहसीलदार हेमंत निकम, ‘मेरे अपने’ संघटनेचे बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाज बांधव या वेळी उपस्थित होते.
सिंधी समाजाला गेल्या काही वर्षापासून भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. परंतु 2016 मध्ये याबाबत कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सिंधी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर तातडीने दखल घेत सिंधी समाजातील लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. यावेळी सिंधी समाजाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.