पुणे, : बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकमंडळाच्या (बालभारती) वतीने गेल्या ५० वर्षातील वाटचालिचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. त्यातकॉफीटेबलबुकची निर्मिती करण्यात येईल. हे कॉफीटेबल बूक मराठी व इंग्रजी भाषेत असेल. तसेच एकमाहितीपटही करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली. त्यांच्याअध्यक्षतेखाली बालभारती नियामक मंडळाची 228 वी सभा झाली. तितहा निर्णय झाला.
येथील बालभारतीच्या कार्यालयात शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बालभारती नियामक
मंडळाची सभा पार पडली. यावेळी शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, पाठ्यपुस्तक मंडळाचेसंचालक सुनिल मगर, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक एन.के. जरग, पाठ्यपुस्तक नियामक मंडळाचेनियंत्रक व्ही.व्ही.गोसावी यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्री. तावडे यांच्या हस्ते अल्पदृष्टी विद्यार्थ्यांच्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या
मोठ्या आकाराच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
मंडळाच्यावतीने शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. मात्र अल्पदृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हीपुस्तके वाचताना अडचण येते. याचा विचार करुन राज्यातील अल्पदृष्टी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यपाठ्यपुस्तक मंडळाच्या (बालभारती) वतीने मोठ्या आकाराच्या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.
एथ्री आकारातील ही पुस्तके अल्पदृष्टी विद्यार्थ्यांना वाचता येतील. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पुस्तके अत्यंतउपयुक्त ठरणार आहेत.या सभेत बालभारतीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दलची व कामकाजाविषयीचर्चा झाली. तसेच विविध विषयांवर शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी संबंधितांना सूचना केल्या.सभेनंतर शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या हस्ते बालभारतीच्या आवारात वृक्षा रोपण करण्यात आले.राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन श्री.तावडे यांनी केले.