राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

Date:

  • राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मानवतेच्याही मानबिंदू – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
  • राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक श्रध्देचे आणि विश्वासाचे प्रतिक- पालकमंत्री जयंत पाटील
  • सोलापूर विद्यापीठात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व अध्यासन होणार– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सांगली, दि. 2, : देशात ज्या कर्तुत्चवान महिला होऊन गेल्या त्या नामावलीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नेहमीच श्रेष्ठ आहे. त्या सामान्य कुटुंबातून आल्या आणि राज्यकर्त्या झाल्या. त्यांनी समाजातील गरीब वर्गाला आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी राज्यकारभार केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी केले.

            राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन समाजासाठी क्रांतीदर्शी असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभे केलेले त्यांचे स्मारक समतेचे व न्यायाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

            यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारांचा वारसा घेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यात आणि राज्यात आपण काम करत आहोत असे सांगून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेले त्यांचे स्मारक हे श्रध्देचे आणि विश्वासाचे प्रतिक असल्याचे सांगितले.

            सांगली शहरात रघुवंश सोसायटी, शाहूनगर,‍ विजयनगर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलसहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटीलउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार श्रीनिवास पाटीलमहापौर दिग्वीजय सुर्यवंशीआमदार अरूण लाड, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षे दिक्षीत गेडाममहानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस,      उपमहापौर उत्तम पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार सदाशिव पाटील, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, उत्तमराव जानकर, प्राध्यापक यशपाल भिंगे, उस्मानाबादच्या सक्षना सलगर,  महानगरपालिकेचे पदाधिकारीआजी व माजी नगरसेवकनागरिक उपस्थित होते.

            राजमाता जिजाऊराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दिली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले,  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरयांनी शेतीउद्योगाबरोरबच विणकामालाही चालना दिली. घाटधर्मशाळामंदिरे यांची निर्मिती केली. आपल्या राज्यात अनेक जाती धर्माचे लोक सलोख्याने रहावेत यासाठी त्यांनी अखंडपणे कटाक्ष पाळला. राजमाता अल्यिादेवी होळकर यांच्या जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पतीसासरे यांच्या निधनानंतरही त्या डगमगल्या नाहीत. जेंव्हा राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेंव्हा त्यांनी सामान्य माणसांसाठी राज्य चालविले आणि आदर्श पध्दतीने राज्यकारभार केला. त्यांचा आदर्श घेवून सर्वांनी वाटचाल करावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत आदर्श राज्यकारभार केला. त्यांचे जीवन समाजासाठी अत्यंत क्रांतीदर्शी आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने केलेले त्यांचे स्मारक समतेचे आणि न्यायाचे प्रतिक आहे. पतीच्या निधनानंतर मिळकतीवरचा पहिला अधिकार हा त्याच्या विधवेचा असेल तसेच विधवेला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे हे त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय अत्यंत क्रांतीकारी आहेत.  मंदिरेधर्मशाळापिण्याचे पाणी यासाठी त्यांनी देशभरात आदर्श काम केले. त्या मानवतेच्याही मानबिंदू आहेत. त्यांचा आदर्श घेवून सरकार काम करीत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहेअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            पालकमंत्री जयंत पाटील म्हणालेअहिल्यादेवी होळकरांनी हजारो ऐतिहासीक स्थळेमंदिरेघाट यांच्या जीर्णोध्दारासाठी आपला खजिना वापरला. आदर्श ग्रंथालय उभे केले. लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी आपल्या राज्यात न्याय व्यवस्थाही उत्तम ठेवली. नेहमी समाजाच्या हिताचाच विचार केला. आपली जनता सुखीसमाधानी आणि सुरक्षित रहावी यासाठी कटाक्षाने निर्णय घेतले.  देशात अनेक महिला राज्यकर्त्या झाल्या त्यामध्ये दोन राजमाता मान्यता पावल्या त्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाने जगाला आदर्श घालून दिला. त्यांचा आदर्श घेवूनच महाराष्ट्राचे शासन काम करीत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांचे प्रश्न लवकराच सुटतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  महाराष्ट्रात ज्यांच्या नावे विद्यापीठे आहेत त्यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येणार असल्याचे सांगून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे अध्यासनही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेले स्मारक अप्रतिम असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणालेमहानगरपालिकेने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे महाराष्ट्रातील आदर्श स्मारक असून त्यांच्या नावाला साजेशे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील सर्व जाती घटकांच्या विकासासाठी काम केले. शेतकरीविधवागोरगरीबतरूण यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी राज्यकारभार केला. धनगर समाजातील मुले प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात यावीत यासाठी या स्मारकाच्या ठिकाणी अभ्यासिका व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

            सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेकोरोना संकटामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आला असला तरी धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे आर्थिक निधी देण्यासाठी शासन प्रयत्न करेलअसे सांगून आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानासाठी अधिकचा निधी देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सोलापूर विद्यापीठात 14 कोटी 50 लाख रूपये खर्चाचे उभारण्यात येत असलेले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम निविदा प्रक्रियेमध्ये असल्याचे सांगितले.

            महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी  महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांचे स्मारक सर्व घटकांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            माजी मंत्री महादेव जानकर म्हणालेसमता प्रस्थापित करण्यासाठी जातीय सलोखा आवश्यक आहे. धनगर समाजाच्या आर्थिकसामाजिकराजकीय उन्नतीसाठी सर्व घटकांनी मदत करणे आवश्यक असल्याचे सांगून आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजना धनगर समाजालाही लागू कराव्यात अशी मागणी केली.

            माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाचे प्रश्न एकदिलाने सोडविणे आवश्यक असून धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती सोडविण्यासाठी आरक्षणउद्योग व्यवसायाला उर्जितावस्था देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

            प्रा. यशपाल भिंगे यांनी होळकर शाहीने अत्यंत कर्तबगार महिला राज्यकर्त्या दिल्या आहेत. यामध्ये तुळसाबाईभिमाबाईराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही त्यातील ठळक उदाहरणे आहेत. लोकसेवेचे व्रत घेवून अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे राज्यकारभार केला. त्यांच्या राजवटीचे समन्वय हे सर्वात मोठे वैशिष्ठ होते.

            नगरसेवक विष्णू माने यांनी प्रास्ताविक करताना धनगर समाजासाठी आरक्षणवसतिगृहेपशुपालनासाठी गायरानमेंढपाळावरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदामहाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावे महामंडळ व त्यासाठी निधी आदि मागण्या केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टची भेट

ऐल्फा  च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील जोग महाराज व्यायामशाळेला...

लॉरिट्झ नुडसेनने 50 GW सौर क्षमता सक्षम असल्याचे सिद्ध केले.

जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये आपल्या भूमिकेचे केले समर्थन युटिलिटी स्केल सोलर फार्म्सपासून घरांना प्रकाश देणाऱ्या रूफटॉप सिस्टीम्सपर्यंत लॉरिट्झ नूडसेन सौर घटक उत्पादन संयंत्रांना केटरिंगसह, ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी आपला सात दशकांचा वारसा - स्वच्छ ऊर्जेचा लाभ बाजारपेठेतील समुदायांपर्यंत पोहोचविण्यास मदत करत आहे मुंबई, : आपल्या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल तंत्रज्ञानाने संपूर्ण भारत आणि जागतिक बाजारपेठेत 50 GW पेक्षा जास्त सौरऊर्जेची क्षमता निर्माण केल्याचे भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने आज जाहीर केले आहे. केवळ सौरऊर्जा क्षमता निर्मिती नाही तर त्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, व्यापक उपलब्धता, कारखाने, शेत, घरे आणि सेवा उपलब्ध न होणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचणे, राष्ट्रीय ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक विस्ताराला समर्थन देण्यासाठी सौर ऊर्जा सक्षम करण्यावर हा महत्त्वाचा टप्पा स्पष्टरित्या लक्ष केंद्रित करतो. भारताचा सौर प्रवास आता मोठ्या युटिलिटी पार्कपुरता मर्यादित राहिलेला नाही. पीएम-कुसूमद्वारे सिंचनाची उर्जा, पीएम सूर्य घर अंतर्गत कुटुंबांना सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत - पारंपारिक ग्रीडच्या आवाक्याबाहेरील समाजापर्यंत खात्रीशीर वीज पर्याय उपलब्ध करून देणे, हे देखील दिसत आहे. हे परिवर्तन अत्यंत वेगाने झाले आहे. भारताने सातत्याने सौर ऊर्जा क्षमतेत वाढ केली असून, सध्या स्थापित अक्षय्य ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा जवळपास ५५% इतका आहे आणि ही क्षमता 154 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. दोन समांतर मार्गांनी हा विस्तार होतो आहे: एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील युटिलिटी प्रकल्प, जे ग्रीडची क्षमता वाढवून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतात; आणि दुसरे म्हणजे डिस्ट्रिब्युटेड प्रकल्प, ज्यांचा थेट आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडतो. लॉरिट्झ नुडसेन ही कंपनी युटिलिटी-स्केल पॉवर प्लांट्स, कमर्शियल अँड इंडस्ट्रिज आणि निवासी क्षेत्र अशा तीन विभागांमध्ये कार्यरत आहे. प्रगत AC सोल्युशन्स, DC स्विचगिअर, स्मार्ट मीटरिंग आणि क्लाउड-आधारित रिमोट मॉनिटरिंग सोल्युशन्स कंपनी पुरवते, ज्यामुळे सौर ऊर्जा यंत्रणा सुरक्षित, विश्वसनीय आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी सक्षम राहतात.या क्षमतेचा पाया भारतातील विद्युत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात असलेल्या सात दशकांहून अधिक काळातील अनुभवावर आधारलेला आहे. कंपनीने 2,350 हून अधिक सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य केले आहे, 350 हून अधिक EPC कंपन्या व 300 ​​हून अधिक डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे, तर 300 हून अधिक सिस्टम इंटिग्रेटर्सना प्रशिक्षण दिले आहे; अशा प्रकारे या क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेली स्थानिक क्षमता निर्माण केली आहे. लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेश कुमार म्हणाले: “जेव्हा एखादा शेतकरी डिझेलवर आधारित सिंचनाचा वापर सोडून देतो किंवा एखाद्या कुटुंबाला विजेचा खात्रीशीर पुरवठा मिळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ऊर्जा संक्रमण सुरू होते. 50 गिगावॅटच्या टप्प्याचे महत्त्व केवळ त्याच्या विस्तारामध्येच नाही, तर त्याचे फायदे किती व्यापकपणे जाणवतात यातही आहे. सौर पायाभूत सुविधा विश्वसनीय, सहज उपलब्ध आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी तयार केल्या जातील, हे सुनिश्चित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.” भारताची सौर परिसंस्था जसजशी विस्तारली आहे, तसतशी तिची तांत्रिक गुंतागुंतही वाढली आहे. उच्च क्षमता, बदलती ग्रिड गतिशीलता आणि विकेंद्रित वीज निर्मिती मॉडेलच्या वाढीमुळे अधिक प्रगत, विशिष्ट वापरासाठीच्या विद्युत उपायांची गरज वाढत आहे. वीज निर्मितीपासून ते वहन आणि ग्रीडमधील एकत्रीकरणापर्यंतच्या संपूर्ण सौर मूल्य साखळीला लॉरिट्झ नुडसेन समर्थन देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हा बदल दिसून येतो, ज्यात मध्यम-व्होल्टेज सोल्यूशन्स, एसी आणि डीसी स्विचगियर सोल्यूशन्स, सॉफ्टवेअर आणि सेवांसह नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवीकरणीय ऊर्जेतील ही वाढ देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण देखील वाढवते आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2026 या काळात भारताच्या सौर उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे देशाचे आत्मनिर्भरत्व अधिक मजबूत झाले. गरजांनुसार तयार केलेल्या मजबूत, भविष्यासाठी सज्ज विद्युत प्रणालींनी उत्पादन सुविधा सुसज्ज करून लॉरिट्झ नुडसेनने या उत्क्रांतीला पाठिंबा दिला आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट जीवाश्म-इंधन-विरहित क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, आता संक्रमणाच्या प्रमाणावरून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जेणेकरून ऊर्जेची उपलब्धता केवळ विस्तारितच नव्हे, तर तिचे समान वितरणही सुनिश्चित होईल. या प्रवासात लॉरिट्झ नुडसेनची भूमिका त्यांच्या मूळ उद्देशाशी ठामपणे जोडलेली आहे: अशी एक विद्युत पायाभूत रचना उभारणे, ज्यामुळे सौर ऊर्जा विश्वसनीय आणि सहज विस्तारण्यायोग्य बनेल, तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासातील प्रत्येक स्तरावर ती सुलभतेने उपलब्ध होईल.

मुठा प्रदूषणावर विधानपरिषदेत आवाज; आरएमसी धोरण सभागृहासमोर मांडावे – डॉ. नीलम गोऱ्हे

आमदारांना त्रैमासिक माहिती द्यावी मुंबई.दि.१: पुणे शहरातील रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी)...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलतीला मंजुरी

पुणे-: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...