राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. याबाबत नुकताच महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून आता त्यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवरून आता माझी सुरक्षा कमी करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून सांगितल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.