पुणे- शहर आणि देशभर स्वछतेला प्राधान्य देणारे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण असताना ,संपूर्ण शहरात स्वच्छतागृहांची प्रचंड मोठ्ठ्या स्वरूपात कमतरता स्पष्ट दिसत असताना महिला बाल कल्याण समितीने आजवर गेल्या वर्षभरातअसंख्य सुलभ शौचालये पाडण्याचे प्रस्ताव मंजूर केल्याचा धक्कादायक आरोप केला जातो असून आता ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या पाक्षिक सभेत नगरसेवक राजेश बराटे यांनी 2 सुलभ शौचालये पाडण्याचे प्रस्ताव दिले आहेत . सुलभ शौचालये हि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सोयी साठी केली असताना हि शोचालये पाडण्यासाठी मात्र त्यांनी आता घरोघरी शौचालये आहेत . यांची गरज नाही असे कारण देऊन हा प्रस्ताव दिला आहे. मात्र घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी शु आणि सु कुठे करायची ? हा प्रश्न पुण्याच्या महापालिकेने कायमच अनुत्तरीत ठेवला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधील गोसावी वस्ती आकाश मित्र मंडळ तसेच याच प्रभागातील विकास मित्र मंडळ येथील सुलभ शोचालये पाडण्यासाठी 2 प्रस्ताव नगरसेवक बराटे यांनी दिले आहेत . या शौचालयांचा आजूबाजूच्या लोकांकडून गैरवापर होतो . रात्रीच्या वेळी मद्यपी कडून त्याचा गैरवापर होतो .आणि येथून जवळ असलेल्या बिजले चौक आणि मावळे आळी चौकात सुलभ शौचालये आहेत त्यांचा मात्र व्यवस्थित वापर होतो .प्रत्येकाच्या घरी शोचालये देखील आहेत त्यामुळे यांची गरजा उरलेली नाही ती पाडावीत असे या प्रस्तावात म्हटले आहे.
हिल व्ह्यू पार्क ,कार डेपो येथील शौचालय पाडण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त महापालिका यांनी दिला आहे . त्याबाबत जागा पाहणी करण्याचा निर्णय गेल्या सभेत घेण्यात आला होता . हा प्रस्ताव हि आता पुन्हा या सभेत मान्यतेसाठी येतो आहे.
शौचालये पाडण्यामागचे गूढ
खरे तर शहरातील काही शौचालयांचा गैरवापर काही समाज कंटक करीत असतात याबाबतची माहिती अनेकांना असते पण त्यावर कारवाई करण्यास आणि शौचालये स्वच्छ ठेवण्यास कोणीही पुढे येताना दिसत नाही .
तर काही शौचालये गरज असताना गैरवापर नसताना,योग्य वापर असताना हि केवळ आजू बाजूच्या कोणाच्या तरी इमारतीच्या आड येतात ,दुकानांची किंमत कमी करतात अशी शौचालये महापालिकेत कोणाला तरी हाताशी धरून पाडण्याचा घाट घालण्यात येतो किंवा महापालिकेशी संबधित लोक बेनामी बिल्डर असतात ते हि अशी कारस्थाने करतात . वास्तविक पाहता लाईट , स्वच्छता, ठेवून ये जा करणाऱ्या स्त्री -पुरुषांना स्वच्छता गृहांची नितांत गरज पुण्यात आहे .
या पार्श्वभूमीवर आजवर या समितीत येणारे असे प्रस्ताव कायम संशयाच्या भोवऱ्यात कोणाच्या हित संबधातून येत असतात असा आजवर कायम आरोप होत आलेला आहे.