पुणे- रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली भागातील पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला ‘भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावून आले आहेत. शहरातील विविध भागातून पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. पद्मावती, सहकारनगर भागातून नगरसेवक महेश वाबळे स्वराज प्रतिष्ठान आणि तळजाई ट्रेकरसच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या आणि मदतीपासून वंचित असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मेठतळे, शिखली, कासरूड व हातलोट या गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मुठभर धान्याची मदत दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पूरग्रस्त भागातील मंडळींना जगण्याची नवी उमेद देते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उभा महाराष्ट्र धावून जातो हि महाराष्ट्राची संस्कृती आणि संतांची शिकवण आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी खचून न जाता खंबीरपणे संकटांना तोंड देण्यासाठी छोटीशी मदत मोठा आधार ठरते असे नगरसेवक वाबळे म्हणाले
यावेळी प्रशांत दिवेकर ,हरिष परदेशी ,भानुदास ढोबळे,संध्या नांदे,सारीका ठाकर ,बाबुराव शिगरे व तळजाई ट्रेकरचे सदस्य उपस्थित होते.