नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा देशात फैलाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात संक्रमाची आकडेवारी पाहता ती वाढून आता 362 झाली आहे. तर वाढत्या आकडेवारीमुळे अख्खा देश लॉकडाउनच्या दिशेने जात असताना दिसून येत आहे. आतापर्यंत 14 राज्यांच्या 287 शहरांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.
सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात लॉकडाउन
महाराष्ट्रात 13 शहरांमध्ये हा लॉकडाउन लागू केला जात आहे. यामध्ये कोरोनाग्रस्त ज्या ठिकाणी सापडले त्या पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण, अहमदनगर, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश सरकारने भोपाळ, जबलपूर, सिवनी, बालाघाट, नरसिंहपूर, रीवा, बैतूल, ग्वाल्हेर, उज्जैन आणि छिंदवाडा अशा 9 जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध जारी केले. तर उत्तर प्रदेश सरकारकडून गाझियाबाद, गौतमबुद्ध नगर(नोएडा) आणि लखनऊ या तीन जिल्ह्यांत लॉकडाउन घोषित करण्यात आला. कोरोना व्हायरस 23 राज्यांमध्ये पोहोचले आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात सापडली आहेत. तर झारखंड, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नगालँड, मणीपूर, त्रिपुरा, मिझोरम या ठिकाणी एकही कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. कोरोनाचे 90% रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी 7% रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
मुंबई, पाटणा आणि सुरतमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील मुंबईत 63 वर्षीय व्यक्तीचा, सुरतमध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा तर बिहारची राजधानी पाटण्यात 38 जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि पाटण्यात निधन झालेल्या कोरोनाग्रस्तांना मधुमेह आणि इतर आजार सुद्धा होते. तर सुरतमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाला किडनीचा विकार होता. देशभर आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी 6 पीडित मधुमेही होते.
53 कोटी लोकसंख्या घरात
राज्य | जिल्हे | लोकसंख्या कोटींमध्ये |
राजस्थान | 33 | 7.95 |
उत्तराखंड | 13 | 1.17 |
पंजाब | 22 | 3.05 |
ओडिशा | 30 | 4.71 |
पश्चिम बंगाल | 23 | 10.09 |
दिल्ली | 11 | 1.93 |
तेलंगणा | 31 | 3.53 |
बिहार | 38 | 12.85 |
आंध्र प्रदेश | 13 | 4.98 |
छत्तीसगड | 28 | 3.22 |
एकूण | 242 | 53.48 |