Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती हे सरकारचे धोरण

Date:

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर संसदीय मंत्री बापट यांची स्पष्टोक्ती

पुणे : “शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्त करणे हे आमच्या सरकारचे धोरण आहे. त्यासाठी आम्ही उपाय योजना आखत आहोत. शेतकर्‍यांना कायमस्वरुपी कर्जातून मुक्तता मिळावी, या दृष्टीने राज्य सरकारने गांभीर्याने विचार केला असून त्यासाठी मास्टर प्लॅनही तयार केला असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी मंत्री बापट म्हणाले की,  काही दिवसापूर्वी शेतकर्‍याच्या कर्जमुक्तीचा राज्यात प्रयोग झाला होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, ही आमचीच मूळ मागणी होती. मात्र मागील कर्जमाफीचा अनुभव लक्षात घेता ज्यांचे सातबारे कोरे झाले त्यांच्या सातबाऱ्यावर पुन्हा वित्तीय संस्था आणि सावकारांचे कर्ज चढले. म्हणून शेतकरी कर्जात का बुडतो याचा सखोल अभ्यास आमच्या सरकारने केला. यांवर पायाभूत सुविधांचा अभाव हे प्रमुख कारण आमच्यासमोर आले. म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचनाचा उपक्रम राबविला. या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पिकाला हमीभाव  देणे यांसारख्या उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून आम्ही कडधान्यांचे उत्पादन तिप्पटीने वाढविले.

एकीकडे उत्पादन वाढत असताना उत्पादनावर आधारित खर्चाला हमीभाव मिळाला पाहिजे असे आम्हाला वाटते. केवळ कर्जमाफीतून कर्जमुक्ती होत नाही. जर शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जातून मुक्तता द्यायची असेल तर सिंचन, वीज, बी-बियाणे, बाजारपेठ या सगळ्याचा विचार करून  शेतकर्‍याला मदत केली पाहिजे. मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी हा विचार केला. म्हणूनच मागील वर्षी दुष्काळ असूनही २२ हजार कोटी रुपये दुष्काळ, शेतकरी, नापीकी,अतिवृष्टी  निवारण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगत ते म्हणाले की,  कर्जमुक्ती हा केवळ एका राज्याचा विषय नाही . मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केंद्राच्या मदतीने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यासाठी एक पॅकेज दिले होते. मात्र त्यांचा तो प्रयोग फसला, आजही या भागातील शेतकर्‍याच्या आत्महत्याचा प्रश्न जैसे थे आहे. एखाद्या गोष्टीचा मूलभूत विचार करून त्याच्यासाठी दीर्घकालीन विचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, त्याच दृष्टीकोनातून आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ आज घोषणा करून शेतकरी कर्ज मुक्त होणार नाही. याची आम्हाला जाणीव आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उत्तर प्रदेशमधील कर्जमाफ़ीबद्द्ल बोलताना मंत्री बापट म्हणाले की, प्रत्येक राज्याचा विषय वेगळा आहे. उत्तर प्रदेश मध्ये ४० टक्क्यांहून अधिक भाग सिंचनाखाली आहे. तर  महाराष्ट्रात हे प्रमाण जेमतेम १६ टक्के आहे. महाराष्ट्रातील इतक्या वर्षाचा दुष्काळ, नापिकी आणि सिंचनाच्या अभावामुळे कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक आहे. शेती आणि उत्पादनाच्या बाबतीत दोन राज्यांची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे असतात, ते वेगळ्या पद्धतीने सोडवावे लागतात. आमचे सरकार शेतकऱ्याला बांधील असून यासाठी कर्जमुक्ती दिशेने दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी आम्ही करत आहोत. अधिवेशनात हा विषय विरोधकांनी लावून धरला आहे. येणार्‍या काळात चर्चेद्वारे हा प्रश्न सुटेल आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल असा आशावादही मंत्री बापट यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...