पुणे-मॉब लिंचिंग द्वारे हत्या करणारी संघी मानसिकता मुळासह नष्ट करण्यासाठी काँग्रेसला सत्ता सोपवा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.
महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ , खड्डा झोपडपट्टी, जुना बाजार परिसरात आयोजित सभेत जावेद बोलत होते.
येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे, मोदी सरकारने आर्थिक निर्णय या परिस्थितीस कारणीभूत आहेत.बेरोजगारी वाढत चाललीय, आहे त्यांचे रोजगार बंद होत आहेत. व्यापारी, उद्योजक दुकाने, कंपन्या बंद करत आहेत.फसव्या घोषणा करून सत्तेवर आलेले हे भाजप सरकार, धार्मिक तेढ वाढवून, मुख्य प्रश्नापासून जनतेला दूर नेत आहेत. एमआयएम सारखे कट्टरवादी पक्ष भाजपलाच मदत करत आहेत, त्यामुळे त्यांच्या ईडीची धाड पडत नाही, असे स्पष्टीकरण जावेद यांनी दिले.मंगळवार पेठेतील जुना बाजार, खड्डा झोपडपट्टी मध्ये आयोजित या सभेत बोलताना महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी भाजप प्रणित महायुतीवर चौफेर हल्ला चढवला.
अल्पसंख्याक लोकांना मुद्दामहून लक्ष्य केले जात असून, त्यांच्या प्रगतीची कवाडे भाजप सरकारने बंद केली आहेत, असे सांगून ते पुढे म्हणाले की, बहुसंख्यांकांचे राजकारण खेळून भाजप सरकार सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. संविधान बदलण्यासाठी भाजप आणि संघ सतत प्रयत्न करत आहेत. आपल्या कॅन्टोन्मेंट मधील सर्व समस्या जैसे थे असून, भाजप आमदार भ्रष्टाचाराच्या चिखलात आकंठ बुडाले आहेत.
या सभेस शहर काँग्रेसचे रोहित टिळक, मेघालय काँग्रेस नेत्या जरीना हेफ्तेलॉंग, सुनिल आहेर, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक अविनाश बागवे, , यासर बागवे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी, लता राजगुरू, गुरुद्वारा ट्रस्टचे भोलसिंग अरोरा, आमिर शेख, हाजी नदाफ, नदीम मुजावर, फय्याज शेख, अजीम गुडाकुवाला, वाल्मिकी जगताप, चांदबी नदाफ, बबलू सय्यद, मुन्नाभाई शेख, मौलाना निझामुद्दीन, अस्लम बागवान, विशाल ताडे, व इतर मान्यवर कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.