पुणे – विधानसभेची आगामी निवडणूक गेल्या पाच वर्षातील सरकारचा कारभार, भ्र्रष्टाचार, चुकीची आर्थिक धोरणे, विकास यापेक्षाही काँग्रेसच्या गावोगावच्या बूथ कार्यकर्त्यांसाठी ही वैचारिक लढाई आहे. मतदार यादीपासून ते मतदारसंपर्क, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे बूथव्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यासाठी ही निर्धार कार्यशाळेचे आय़ोजन केले आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्या, बूथ कार्यकर्त्यांना देऊन प्रशिक्षित करून आगामी निवडणूक प्रत्येक बूथवर लढवू या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील प्रत्येक विभागातील निवडक कार्यकर्त्यांसाठी“निर्धार” या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन पुण्यात केले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अन्य राष्ट्रीय चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी वांशी रेड्डी, संपतकुमार, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश सरचिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे समन्वयक अभय छाजेड यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी तिरंगी सुती हार व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केल्यावर पृथ्र्वीराज चव्हाण यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन केले.
काँग्रेस पक्षातील नव्या तरूण बूथकार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला निवडणूक, त्यातील सूक्ष्म व्यवस्थापन आणि तंत्राबद्दल प्रशिक्षित करून प्रत्येक बूथवर निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ही कार्यकर्त्या प्रशिक्षणाची संकल्पना राहुल गांधी यांनी मांडली, असे सांगून चव्हाण म्हणाले, बूथ कार्यकर्त्यांना मतदारयादी, मतदारांशी संपर्क, त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांची महिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे, संपर्क ठेवणे आणि त्यांचे मतदान पक्षाला करून घेणे ते शेवटी मतमोजणी पर्यंत बूथ कार्यकर्त्याने करावयाच्या कामाची सखोल महिती सतत देत रहाणे आवश्यक आहे. अशा कार्यकर्त्यांशी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणा-या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करण्याची ही तयारी म्हणजे पशिक्षणासाठी प्रशिक्षक तयार करण्यासाठीची कार्यशाळा आहे.
सध्या सत्तेचा नंगा नाच सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस पक्षाचा कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यात येत आहे. निवडणुकीत हे सर्व मुद्दे असतीलच पण ते बूथ कार्यकर्त्यांलाही मतदारांच्या घरी जाऊन त्यांना सांगता येणे गरजेचे आहे. कारण ही निर्णायक लढाई असून समाजाच्या भवितव्यासाठीच्या या लढाईतील शिलेदार म्हणून या वर्गातील प्रशिक्षणार्थींची निवड झाली आहे. आपण बथपर्यंत प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करून ही वैचारिक लढाई जिंकू असा विश्वास चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला.
या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सचिन राव म्हणाले, काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला असला तरी आजही पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे. या कार्यकर्त्यांशी संपर्क करणे, त्यांच्या सोबत बैठक घेणे, त्यांना लागणा-या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करणे, त्यांना योग्य सूचना देणे किंवा त्यांच्याकडचे अनुभव जाणून घेणे अशी कामे या वर्गातील प्रशिक्षित कार्यकर्त्यांना करायची आहे. या प्रशिक्षणासाठी आलेले सर्व जण पक्षाचे काम म्हणून नव्हे तर बूथ कार्यकर्त्यांप्रती आपले असलेले कर्तव्य बजावण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपतकुमार यांनी सांगितले की, आज लोकशाहीवादी काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. यातून पक्षाला उभारी देण्यासाठी बदलत्या युगात आलेले निवडणूक व्यवस्थापन, बूथ व्यवस्थापन, ईव्हीएमचे तंत्र या सगळ्याची महिती कार्यकर्त्याला असणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. यातून मतदारांपर्यंत पोचून त्यांचे मत काँग्रेसपक्षाकडे आणणे आपले सर्वांचे अंतिम धेय्य आहे.
अभय छाजेड म्हणाले, आजच्या परिस्थितीत जातीयवादी शक्तींविरूद्ध कार्यकर्त्यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निव़णुकीतील परभावानंतर मलूल झाला कार्यकर्त्याला पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठीही कार्यशाळा आहे. या दोन दिवस चालणा-या कार्यशाळेतील कार्यक्रमांची महिती प्रदेश काँग्रेसचे अमर खानापुरे यांनी दिली. या कार्यशाळेत गुजरातचे उत्तम परमार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, सचिन सावंत असे मान्यवर काँग्रेसची वैचारिक बैठक, भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी धोरणे, कायदासुव्यवस्था आणि बूथ कार्यकर्ता अशा विषयांवर महिती देणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षणार्थींमध्ये याच विषयावर ग्रुप डिस्क्शन होणार आहे.