पुणे-प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षात आणि शासनस्तरावर योग्य स्थान तर आपण देवूच पण सार्वजनिक स्तरावर काम करताना कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आपण विशेष काळजी घेवू अशी ग्वाही आज येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना दिली .
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेअशोक चव्हाण यांचा काँग्रेस भवन येथे सत्कार शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते .
प्रास्ताविकपर भाषण करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रात
महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर व सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर
पहिल्यादांच अशोक चव्हाण साहेब पुणे शहरामध्ये आले. पुणे शहरामध्ये यामुळे
चैतन्य पसरले असून प्रामाणिक कार्यकर्ता आज या ठिकाणी आपल्या सत्कारासाठी
उपस्थित आहे. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी
प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले अशा सर्व सामान्य कार्यकर्त्याला आपण महामंडळ व
समित्यांमध्ये योग्य ते स्थान देवून त्यांचा सन्मान करावा. अशी मी आपणास विनंती
करतो.’’
सत्काराला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘‘महाविकास
आघाडीचे हे सरकार शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरीनेच काँग्रेसच्या
पाठिंब्यामुळे आले आहे. भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव
पचवता आला नसून आजही देवेंद्र फडणवीस यांना सप्नामध्ये आपण मुख्यमंत्री होणार
असे मुंगेरीलाल के हसीन सप्ने पडत आहेत. याच भाजपाने देशामध्ये एन.आर.सी. व
सी.ए.ए. च्या माध्यमातून जाती धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्माची बाजू घेत आहे असे चित्र निर्माण करीत आहे. परंतु
काँग्रेस पक्ष हा हिंदू – मुस्लिम, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक या सर्वांना बरोबर
घेऊन जाण्याचे काम करतो. भाजपच्या या जातीयवादी भूमिकेच्या विरोधात काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यांमध्ये जावून त्यांची भूमिका सर्वांपर्यंत पोहचविण्याची
आवश्यकता आहे.’’
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये काम केले,
येणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रामाणिकपणे काम करून
पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितल्याप्रमाणे
प्रामाणिक कार्यकर्त्याला महामंडळ व समित्यांमध्ये सामावून घेण्याचे काम मी नक्कीच
करीन तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्याला गेल्या ५ वर्षामध्ये सरकारी यंत्रणेकडून जो काही
त्रास झाला याची जाणीव देखील मला आहे त्यामुळे मी आज तुम्हाला हे नक्की सांगेन
काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागून देणार नाही.’’
यावेळी माजी आमदार मोहन जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, रोहित टिळक, संजय
बालगुडे, गटनेते अरविंद शिंदे, नीता रजपूत, अमीर शेख, कमल व्यवहारे, दत्तात्रय
बहिरट, कैलास कदम, सुजित यादव, भुंजग लव्हे, सोनाली मारणे, विशाल मलके,
साहिल केदारी, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, लताताई राजगुरू, चंदूशेठ कदम, चाँदबी
नदाफ, प्रकाश पवार, भुषण रानभरे, शिलार रतनगिरी, यासीन शेख, अनिस खान,
बाळासाहेब अमराळे, राजेंद्र शिरसाट, अण्णा राऊत, सचिन आडेकर, प्रविण करपे, सतिश
पवार, सुनिल घाडगे, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, मीरा शिंदे, सुरेखा खंडागळे,
विठ्ठल थोरात, रवि पाटोळे, द. स.पोळेकर, दिपक ओव्हाळ, बाबा नायडू, मुन्नाभाई
शेख, सादिक कुरेशी, राजू शेख, बबलू सैय्यद, राहुल तायडे, विजय वारभुवन, नरेंद्र
व्यवहारे, गौराव बोराडे, राजेंद्र पेशने, हेमंत राजभोज, सुरेश कांबळे, कल्पना भोसले,
संगिता क्षिरसागर, सुनिल थोरात, अमर मांडलिक, सुंदर ओव्हाळ आदी उपस्थित होते.