पुणे-समीर आशा पाटील या नवोदित तरुण दिग्दर्शकाचे दिग्दर्शन असलेला, नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांची निर्मिती असलेल्या, राजन आमले सहनिर्मिती “चौर्य” सिनेमा ५ ऑगस्टला प्रदर्शीत होतो आहे. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाने शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिला पोहोचल्या . त्यापूर्वीच हा सिनेमा तयार झालेला आहे .
या सिनेमाच्या कथेबाबत सांगायचे झाले तर ,’ एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्याना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयाभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
गायक आदर्श शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि गायिका उर्मिला धनगर यांच्या आवाजात या चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून शंकरराव धामणीकर, विष्णू थोरे आणि समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत.चित्रपटातील तीनही गाणी ही वेगळ्या पठडीतील असून प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडतील असे संगीतकार मयुरेश केळकर याने सांगितले. ऐका आणि पहा हे गाणे …