Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा शक्ती लावेल; फडणवीसांचा दावा

Date:

नवी दिल्ली-लोकसभेची निवडणूक भाजप-शिवसेना युतीमध्ये आम्ही लढणार आहोत. जे लोकं सध्या आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडणूक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे खासदार निवडणून आणण्यासाठी त्याचा वापर करू, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला आहे.

ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.राज्यातला संत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे आहेत. राज्याचे भवितव्य अवलंबून असणारी सर्वोच्च न्यायालयाची उद्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या याचिकेवर उद्या म्हणजेच 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, आता ती सुनावणी लांबणीवर पडली असून, उद्याची सुनावणी आता 12 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे, त्यावर फडणवीस बोलत होते.

राज्याचे अधिकार सचिवाकडे दिल्यानंतर विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहे त्यावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरीता डॉयलॉगबाजी करण्यात येते. याआधीच्या सरकारमध्ये देखील सचिवांना ते अधिकार होते. याआधी आमच्या सरकारमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत.

हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णय प्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे, असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, ही राज्यातच नाही तर देशात परंपरा आहे. हे सरकार जनतेचे असून, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जनतेचे लोकंच महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतली.

राज्यात सत्ता स्थापन होऊन महिन्यापेक्षा अधिकचा झाला असून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नये असे सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नसून, तुमच्या विचाराआधी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

मी रिकामा टेकडा नाही

पुढे पत्रकारांनी शिंदे आणि ठाकरे एकत्र यावे यावर प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की, कोण काय म्हणतोय याला राजकारणात महत्व नाही, परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व आहे. हा काय बोलता, तो काय बोलता यावर उत्तर देण्याइतका रिकामा टेकडा मी नाही.

हे अजितदादांचे कामच आहे

पुढे फडणवीस म्हणाले की, अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत आहेत. ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना हे बोलणे स्वभाविकच आहे. त्यांना हे विसरावे लागेल की, 30-32 दिवस त्यांच्या काळातही पाचच मंत्री होते. राजकारण हे बोलावेच लागते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...