पुणे-पंतप्रधान मोदी यांना विरोधासाठी विरोध करणे हा एकमेव अजेंडा विरोधकांचा आहे . याखेरीज त्याच्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. कसबा विधानसभा मतदार संघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर जंगली महाराज रस्त्यावरील प्रचार कार्यालयात डॉक्टरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला उपस्थित राहून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.विजया रहाटकर यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षात देशाची कशी प्रगती झाली आहे व पुन्हा देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी का आवश्यक आहेत हे सांगितले. मी माझ्या भाषणात गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पुणे शहर आणि जिल्ह्याचा विकास मी पालकमंत्री म्हणून कसा केला याची विस्तृत माहिती सांगितली.यावेळी डॉ. शरद बुटाला, डॉ.मानसी जाधव,डॉ अभिजित सोनावणे,मनीषा सोनावणे,डॉ विजय घोगरे, डॉ गणेश वाघ, डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.करमरकर यांच्यासह डॉक्टरांच्या विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचा महिला मेळावा, डॉक्टरांचा मेळावा,वकिलांचा मेळावा संपन्न
महिला मेळाव्यास आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले , महापौर मुक्ताताई टिळक , भाजपच्या महिला शहर प्रमुख शशिकला मेंगडे , युवा नेत्या स्वरदा बापट, शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव , वैशाली नाईक , संगीता आठवले , त्याचप्रमाणे भाजप , शिवसेना ,आरपीआय आणि अन्य घटक पक्षाच्या महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
विरोधकांकडे धोरण नाही आणि नेता नाही असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या , जनतेसमोर मांडण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्याचा केवळ विरोधासाठी विरोध आहे. विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही . म्हणूनच देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. हे सरकार सक्षम आणि मजबूत असावे यासाठी बहुमताने सरकारला निवडून द्या केवळ पुण्यात नाही तर राज्यात आणि देशात जास्तीतजास्त जागा आपणास मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयन्त करा असे आवाहन त्यांनी केले. महिलांसाठी सरकारने अनेकविध योजना आणल्या आहेत त्याची माहिती घरोघरी पोचवा असे त्या म्हणाल्या.
आरपीआयच्या नेत्या आठवले ताई म्हणाल्या , समाजातील गरीब, शेतकरी , कष्टकरी, अशा विविध घटकासाठी सरकारने योजना आणल्या आहेत त्याची ही माहिती महिलांनी स्वतः करून घ्या आणि इतरांना सांगावी . राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणा असे त्यांनी सांगितले.
महापौर टिळक यांनी सांगितले की , गेल्या पांच वर्षात मोदी सरकारने केवळ महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या नाहीत तर जगात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला आपणाला संधी द्यायची आहे.
दरम्यान न्यायालयातील वकिलांशी गिरीश बापट यांनी संवाद साधला .पुणे सत्र न्यायालयाशी निगडित रस्ता , पाणी अशा प्रश्नांवर आम्ही तोडगा काढला असला तरी इतरही काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत.बांधकाम विभाग, महानगरपालिका, राज्य शासन यांच्या समन्वयातून मी या समस्या मार्गी लावेन, असे आश्वासनं त्यांनी यावेळी दिले. तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण सक्रीय प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. यावेळी ॲड. एस.के जैन, ॲड. एन.डी पाटील,ॲड.शिरीष शिंदे, ॲड.सत्यजित तुपे, ॲड. राणी कांबळे,ॲड. इशानी जोशी, ॲड.अनिरुद्ध पायगुडे, ॲड.पांडुरंग ढोरे, ॲड.पंडित धुमाळ,ॲड. अमर जाधव, ॲड.सी.व्ही जोशी, ॲड. जावेद खान आदी उपस्थित होते.