पीएमआरडीएच्या ६६ हजार कोटीच्या आराखड्याने पुणेकरांची होईल वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता-गिरीश बापट
पुणे-
शहर आणि परिसराचा वेगाने होणारा विकास पाहता भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ६६ हजार कोटी रुपयांचा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता होईल, नागरिकांचा वेळ वाचेल, इंधनाचा अपव्यय होणार नाही, मानसिक त्रास कमी होईल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किफायतशीर व सुरक्षित होईल असा विश्वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ औंध-खडकी-बोपोडी परिसरात प्रचार ङ्गेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. बापट बोलत होते. आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, कार्तिकी हिवरकर, परशुराम वाडेकर, मधुकर मुसळे, अमित मुरकुटे, मुकेश गवळी, चिंतन शहा, अनिल भिसे, सोनाली भोसले, आण्णा आठवले, उमेश गवळी, रवी सोनावणे, मोहन गवळी सहभागी झाले होते.
औंध येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. स्पायसर कॉलेज, भाऊ पाटील रस्ता, एलफीन्स्टन मार्ग, बोपोडी,आकाशदीप सोसायटी, राम मंदिर, दर्गा वसाहत, गवळी वाडा, खडकी बाजार, खडकी स्टेशन, खडकी चौपाटी या परिसरात प्रचार फेरीचे नागरिकांना उत्साहात स्वागत केले.
बापट म्हणाले, ‘पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचा विस्तार हडपसरपर्यंत करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या मार्गांच्या विस्तार करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांत मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात येणार आहे. लाइट रेल्वे, पुणे रेल्वे स्टेशनवरचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांची रचना यांसह अने मु‘य रस्त्यांचे रूंदीकरण, उड्डाणपूल, ग‘ेड सेपरेटर, बीआरटीचे सक्षमीकरण, रिंग रोड, एचसीएमटीआर, पीएमपीचे सक्षमीकरण, एक हजार बसेसची खरेदी, विमानतळांना जोडणारे मार्ग आदी प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या दोन हजार चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा आराखडा करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे.’
बापट पुढे म्हणाले, ‘शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांबाबत आणि वाहतूक सुधारणेसाठी गेल्या ३४ वर्षांत १३ आराखडे करण्यात आले. परंतु सत्ताधारी कॉंग‘ेसच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सर्वच आराखडे कागदावरच राहीले. युतीने सत्तेत आल्यानंतर पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे. मेट्रोच्या कामाला गती, ई बसेसची खरेदी, एचसीएमटीआर प्रकल्पाला गती, विविध ठिकाणी उड्डाणपूल, रिंग रोड, मोठ्या रस्त्यांची विकासकामे सुरू झाली आहेत. या प्रकल्पांना आगामी काळात अधिक गती देणार आहोत.’
बापट पुढे म्हणाले, ‘शहराबाहेरील १२८ किलोमीटरचा बाह्य रस्ता, शहरातील ६० महत्त्वाच्या रस्त्यांना आणि उपनगरांना जोडणारा ३६ किलोमीटरचा एचसीएमटीआर प्रकल्प, अकरा हजार कोटी रुपये खर्च करून पिंपरी स्वारगेट व वना ज रामवाडी मेट्रो प्रकल्प, सहा हजार कोटी रूपयांचा हिंजवडी शिवाजीनगर २३ किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प, पुणे मुंबई अंतर ३४ मिलिटात कापण्यासाठी हायपरलूप प्रकल्प, दोन्ही मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, शहर परिसरात ११० किलोमीटरचे बीआरटीचे जाळे, बससेवा सक्षमीकरणासाठी ५०० ई बसेस आणि ८४० सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात वाढविणे, पब्लिक बायसिकल शेअरिंग, पुरंदर येथे येत्या पाच वर्षांत छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे.’
काश्मिरी पंडितांचा महायुतीला पाठिंबा
पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट (पुणे), श्रीरंग बारणे (मावळ), शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर) आणि कांचन कुल (बारामती) यांना काश्मिरी पंडितांनी पाठिंबा जाहीर केला असल्याचे पत्र आशुतोष राझदान यांनी दिले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सर्वाधिक फटका काश्मिरी पंडितांना बसला. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सुरक्षित भारताचे वचन दिले आहे. घटनेतील ३७० आणि ३५-अ या कलमांबाबत भाजपने सुस्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही भाजपसह घटक पक्षांच्या महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोपरा सभा व चाय पे चर्चा या कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. असे राझदान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.