मुंबई – सरकारविरोधात जनतेच्या मनात असलेला असंतोष लक्षात आणून देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यात सर्व स्तरावर अराजकता माजली असुन कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, कोरोना रुग्णांत झालेली वाढ, उपाययोजना करण्यात सरकारला आलेलं अपयश, मंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप, राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेला भ्रष्टाचार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे झालेले आरोप, या सर्व घडामोडींची माहिती देऊन महाविकास आघाडी सरकारला नैतिकता राहिलेली नाही, या सरकारला फक्त सत्ता टिकवायची आहे, या सर्व बाबी राज्यपाल महोदयांच्या कानावर घातल्या.
यावेळी दरेकरांनी हे तीन चाकांच, भांबावलेलं सरकार आहे, कोणताही निर्णय घेत नाही, केवळ सरकार कसं टिकवायचं हाच त्यांचा एकमेव हेतू आहे, अशी टिकाही केली.
अनेक राज्यात कोरोना संपुष्टात आला असताना, अर्थव्यवस्थेला परत चालना मिळाली असताना, महाराष्ट्रात मात्र राज्य सरकार कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी चाचपडत आहे, राज्य सरकारच्या कारकीर्दीत सर्व स्तरावरील व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार बघितलेलं नाही, सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्यास हे सरकार तयार असून यातुन सत्तारुढ पक्षांची लाचारी समोर आलेली आहे, अशी घणाघाती टीकाही दरेकरांनी केली.