मुंबई-आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ‘आप’ मुंबईतर्फे त्यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंची त्यांनी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.अरविंद केजरीवाल म्हणाले, उद्धव ठाकरेंना भेटण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. कोरोनाची लाट थोपावताना आम्हाला एकमेकांचे मार्गदर्शन झाले.

अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ह्यांचा मुंबई दौरा सुरू असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना चहा-पाण्यासाठी आमंत्रण आले होते, हे आमंत्रण स्वीकारत केजरीवाल यांनी त्यांची आज भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत चर्चाही झाली मात्र, काय चर्चा झाली याची ठोस माहिती समजू शकली नाही.अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. कलिना सांताक्रूझ येथील जनरल एव्हीएशन टर्मिनल येथे आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने त्यांच्या आगमनानिमित्त भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांचे स्वागत केले.

या प्रसंगी त्यांच्या सोबत आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, उपाध्यक्ष संदीप कटके, द्विजेंद्र तिवारी, पायस व्हर्गिस, आम आदमी पार्टी मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.