प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’

Date:

एकोणीसाव्या शतकात भारतात सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षातून मुलींसाठी शाळा सुरु केली होती, मात्र समाजाच्या मानसिकते मध्ये अजूनही फार बदल झालेला नव्हता अशा परिस्थितीत एका स्त्री ने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले आणि तिच्या पतीने ते पूर्णत्वास नेले. स्त्री शिक्षण म्हणजे व्याभिचाराला निमंत्रण असे समजले जायचे त्या काळात सातासमुद्रापार जाउन डॉक्टरेट मिळविण्यासाठी एका महिनेने आणि तिच्या पतीने म्हणजेच आनंदीबाई आणि गोपाळराव यांनी जो सामाजिक संघर्ष केला त्याची कथा म्हणजे समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट होय.

दहा – बारा वर्षाच्या यमुना साठी  तिचे आईवडील वर संशोधन करत आहेत.  सोमण बुवा यमुनासाठी पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशीचं (ललित प्रभाकर) स्थळ घेऊन येतात. बिजवर असलेल्या गोपाळरावांचा हुंडा, मानपान अशा गोष्टीना विरोध आहे. लग्नासाठी. फक्त त्यांची एक अट असते, ती म्हणजे मुलीला लिहिता वाचता यायला हवं. त्यानंतर गोपळरावाशी लग्न करून यमूना आनंदीबाई गोपाळराव जोशी बनते. यमुनाचे आई वडील मनातून मात्र स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असे मानणारे आहेत यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. मात्र,गोपाळरावांच्या हट्टीपणापुढे त्यांचे काही चालत नाही आणि आनंदीचे प्राथमिक शिक्षण सुरू होते.

दरम्यान गोपाळरावांची अलिबागला बदली होते, येथे  दोघांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू होतो. मात्र, त्याचवेळी गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे  निधन होते. त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा आणि सासूबाई (गीतांजली कुलकर्णी) यांना घरी घेऊन येतात. याच काळात या जोडप्याला मुल होते मात्र आजारपणामुळे ते दगावते, या घटनेतून सावरताना त्या डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात, गोपाळराव त्यांना पाठिंबा देतात मात्र, त्यासाठी या जोडप्याला जो संघर्ष करावा लागतो तो जाणून घेण्यासाठी ‘आनंदी गोपाळ’ बघायला हवा.

या चित्रपटाची कथा वास्तव आहे, चित्रपटात १८६५  ते १८८७  चा काळ दिसतो. मुळातच ही गोष्ट फक्त आनंदीबाईंची नाही, तर ती त्यांना खंबीर आणि अमूल्य साथ देणाऱ्या त्यांच्या पतीची- गोपाळरावांचीही आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या जोडप्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो काहीसा वरवरचा वाटतो. चित्रपटात संवाद चांगले आहे, त्या काळातील बोली भाषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कथेचा वेग मंदावला आहे. मध्यंतरानंतर आनंदीबाईंचा अमेरिकेतील वास्तव्याचा भाग सविस्तरपणे आला असता तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम आहे.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, संतापी वृत्ती, जिद्द हे सारं ललितने चांगले साकारले आहे. भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाई व्यक्तिरेखांच्या जवळ जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे., गीतांजली कुलकर्णी यांची भूमिका लक्षवेधून घेते, इतर कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

हृषीकेश – सौरभ – जसराज यांचे संगीत ही सुद्धा जमेची बाजू आहे, आनंदीबाईंचा प्रवास दाखवणारे  “रंग माळियेला”,नाचरे अवखळ “वाटा वाटा”, स्फूर्तिदायक “माझे माऊली” , शांत भासणारे  “मम पाऊली” आणि शेवटी येणारे  “तू आहेस ना” ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात.

एकंदरीत सांगायचे आजची स्मार्ट स्त्री विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करते. कुटुंब, पाल्यांची जडण-घडण करण्यात तिचा मोठा वाटा आहे. परंतु सुमारे १३० वर्षा पूर्वी स्त्री शिक्षण हा विचार करणे सुद्धा पाप मानले जायचे,अशा काळात गोपाळराव जोशी यांनी पत्नी आनंदीबाईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. या यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

चित्रपट – आनंदी गोपाळ

निर्मिती – . झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स

दिग्दर्शक – समीर विद्वांस

संगीत – हृषीकेश – सौरभ – जसराज

कलाकार – ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण

रेटिंग – ***

-भूपाल पंडित

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....