मिडीयाला राणे म्हणाले ,तुम्हाला माझी मुलेच दिसतात काय ?
शिधा मिळाला नाही टीका करतात तर विरोधकांनी शिधा द्यावा
पुणे-५६ आमदारांतील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत. ते सुद्धा लवकरच प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरचं काही आहे. त्यांचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा असे नव्हते,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणेंनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील 10 लाख नोकऱ्यांचा पहिला टप्पा पार केला आहे, असे नारायण राणेंनी म्हटलं.
राणे म्हणाले की, आता उद्धव ठाकरे यांचे राजकारण फक्त आणि फक्त मातोश्रीपुरते मर्यादित आहे. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. शिवसेना आणि त्यांचा गटही संपला आहे. त्यांचे आमदार 56 वरून सहा ते सातवर आले आहेत. तेही ऑन दी वे आहेत. ते कोणत्याही वेळी भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा राणे यांनी केलाय.
त्यांचा स्तर घसरला
नारायण राणे म्हणाले, काही लोक टिंगल टवाळी करतायत. मिमिक्री करतायत. यांचा कसला बालेकिल्ला? जे बोलत आहेत. त्यांचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरलेला नाही. ज्या पक्षातील हे लोक आहेत. त्या पक्षाच्या लोकांनी तपासले पाहिजे. त्यांचा स्तर घसरला आहे.
माझीच मुलं दिसतात का?
राणे पुढे म्हणाले की, तुम्हाला भास्कर जाधव यांची भाषा आवडते, पण फक्त माझी मुलेच दिसतात का? माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिले तर ते दिसते, पण बाकीचे लोक काय बोलतात हे मीडियाला दिसत नाही का? माझ्या मुलांविषयी बोलायला मी इथे आलो नाही, असा त्रागाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
रेशन मिळाली नसल्याची टीका करतायत. वाईट वाटत असेल तर आता विरोधकांनी शिधा द्यावा. विरोधकांना घर बसल्या काही काम उरले नाही. ते फक्त टीका करत आहेत.
– नारायण राणे, केंद्रीय मंत्री