पुणे– ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने बालेवाडीतील संकुलामध्ये, ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनच्या महात्मा गांधी सेंटर्स अँड क्रिएटिव्ह डिझाइन प्रमुख प्रा. कीर्ती कुमार त्रिवेदी आणि सेंट्रल गांधी स्मारक निधीच्या विश्वस्त डॉ. शोभा सुपेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकतेच महात्मा गांधी सेंटर ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यूजचे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांचे चरित्र व शिकवण याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व शांत जीवन रुजवण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
या निमित्त बोलताना, जीआयआयएस इंडियाच्या ऑपरेशन्सचे संचालक राजीव बन्सल यांनी सांगितले, “जगभरातील सध्याच्या वातावरणामध्ये ग्लोबल इंडियन महात्मा गांधी सेंटर फॉर युनिव्हर्सल व्हॅल्यूज (एमजीसीयूव्ही) अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या अभ्यासक्रमातील विशिष्ट उपक्रमांमार्फत, आम्हाला सलोख्याच्या, शांततामय व वांशिक समानता राखण्यास विद्यार्थ्यांना उत्तेजन देतील, अशा शैक्षणिक पद्धती व प्रकल्प यांना चालना देणे शक्य आहे. जगभर शांततेचे दूत ठरू शकतील, असे योग्य समतोल साधणारे जागतिक नागरिक निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
जीआयआयएसच्या नऊ जेम्स टीचिंग मेथडॉलॉडीपैकी एमजीसीयूव्ही हे एक जेम आहे. महात्मा गांधी यांनी ज्या प्रकारे अहिंसा, सत्य, प्रेम व दया यांचा मार्ग पत्करला, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच ही मूल्ये रुजवण्याचे जीआयआयएसचे उद्दिष्ट आहे.
या वेळी उपस्थित असणाऱ्या प्रिन्सिपल सविंदर कौर रूपराय यांनी सांगितले, “महात्मा गांधी अंगिकारलेली मूल्ये प्रत्येक बालकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. वाढत्या वयामध्ये मुलांच्या मनामध्ये सकारात्मक व रचनात्मक असे, तसेच व्यक्तीच्या जीवनावर व एकंदर समाजावर परिणाम करतील असे विचार रुजवणे गरजेचे आहे. जीआयआयएसमध्ये आम्ही अष्टपैलू, भविष्यात नेतृत्व करण्यास सक्षम व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करतो. नव्या महात्मा गांधी सेंटर ऑफ युनिव्हर्सल व्हॅल्यूजमुळे हे साध्य केले जाऊ शकते.”
एमजीसीयूव्हीच्या उद्घाटन समारंभानंतर जीआयआयएसमध्ये जीआयआयएस अॅप्रसिएशन अँड अॅवॉर्ड्स 2019चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना को-स्कॉलस्टिक व अभ्यासाव्यतिरिक्तच्या उपक्रमांसाठी गौरवण्यात आले. तसेच, त्यांना 2018-19 शैक्षणिक सत्रातील उल्लेखनीय यशासाठी प्रमुख पाहुण्यांकडून गौरवण्यात आले. जीआयआयएस बालेवाडी स्कूलचे शिक्षक व पालक यांनी, ज्या विद्यार्थ्यांचा वर्षभरातील कामासाठी सन्मान करण्यात आला, त्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.