स्मार्ट सिटीच्या दुसèया टप्प्यातील नागरिकांच्या सहभागाकरिता कशा पध्दतीने कामकाज करावयाचे, जास्तीत जास्त नागरी सहभाग वाढविणेकरिता करावयाचे प्रयत्न यास्तव आज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अरण्येश्वर येथील पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलमधील साहित्य सम्राट विजय तेंडूलकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. सदरच्य प्रशिक्षणाकरिता आझम कॅम्पस विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरवस्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या समुहसंघटिका व अन्य महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना उपायुक्त अनिल पवार यांनी सांगितले की, वाहतूक व दळणवळण, पाणीपुरवठा व मलनिसा:रण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षितता, उर्जा व वीजपुरवठा या विषयांना अनुसरुन नागरिकांना आपले प्राधान्यक्रम/ मतांद्वारे नोंदविता येतील. दुसèया टप्प्यातील आपले मतं केवळ ऑनलाईन पध्दतीने होणार असूर्न www.punesmartcity.in या संकेतस्थळावर नोंद करता येईल. तसेच अधिक माहिती प्राप्त करुन घेता येईल.
वरीलप्रमणे क्षेत्रांचे उद्दीष्ट काय असले पाहिजे यातील उद्दिष्टातून सर्वाेत्तम उद्दिष्ट नागरिकांकडून ऑनलाईनद्वारे मागविण्यात येत आहे. त्यातून सर्वोत्कृष्ट क्षेत्रनिहाय उद्दीष्ट नक्की करुन त्यानंतर त्या त्या विषयातील तज्ञ अधिकारी, तांत्रिक अधिकारी, विशेषज्ञ, सल्लागार व मनपा अधिकारी यांच्या माध्यमातून यावरील उपाय निश्चित केले जातील व त्यानंतर प्रस्ताव तयार करण्यात येऊन राज्यशासनामार्फत केंद्रशासनाकडे पाठविला जाईल.
दुसèया टप्प्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, समुह संघटिका, मनपा कर्मचारी यांच्या सहाय्याने व स्मार्ट फोन व टॅबच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदविला जाईल.
ज्या नागरिकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट सुविधा आहे अशा नागरिकांकरिता मनपा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येते की, स्मार्ट फोन अथवा इंटरनेटद्वार्रे www.punesmartcity.in या संकेतस्थळावर जाऊन वरीलप्रमाणे उद्दिष्टांबाबत योग्य उद्दीष्ट निवड करुन संकेतस्थळावर नोंद करावी, जेणेकरुन पुणे शहराच्या या नागरिक सहभागाच्या अभिनव उपक्रमाचा प्रकल्प अहवाल तयार होईल. सदरचे संकेतस्थळ १२/१०/२०१५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कार्यान्वित राहील. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली मतं १२ ऑक्टोबरपर्यंत नोंदवावी ही विनंती.
मनपा मुख्य भवनात कामानिमित्त आलेल्या नागरिकांकरिता ऑनलाईन मतं नोंदविण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिक या सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.
महापालिका मुख्य भवनामधील मुख्य प्रवेशद्वार (पोर्च) मधील स्वागतकक्षाचे समोरील बाजूस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून कार्यालयीन वेळात नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.