मुंबई – मेलबोर्न टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खळबळजनकरीत्या कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. धोनीच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सर्वसाधारणपणे मोठे खेळाडू सांगून सवरून संन्यास घेतात. मात्र धोनीने त्याच्या पत्नीलाही सांगितले नाही. बीबीसीआयचे सचिव संजय पाटील यांना मीडियाला सुचित करण्यास सांगितले. बातमी कळताच खळबळ उडाली. यामुळे टीमच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, असे वेंगसरकर, बिशनसिंह बेदीसह अनेक खेळाडूंनी म्हटले आहे, तर गावस्कर, सचिन आणि गांगुलीने हा धक्कादायक निर्णय असल्याचे म्हटले.
२००८ मध्ये अनिल कुंबळेनेही ऐन कसोटीतच कर्णधारपद सोडले होते. तेव्हा धोनीनेच टीमचे नेतृत्व सांभाळले होते. २०१३ मध्ये गांगुलीच्या ४९ टेस्टमध्ये २१ विजयाचा विक्रम मागे टाकला आणि सर्वात यशस्वी कर्णधार ठरले. मात्र वर्ष संपता-संपता त्याच पद्धतीने धोनीनेही कर्णधारपद सोडले.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडेचा विश्वचषक पटकावला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९१ धावा काढल्या. यासह त्याने शानदार विजय मिळवून देत भारताला विश्वचषक मिळवून दिला. यासह त्याने वनडे करिअरमध्ये सहा हजार धावांचा पल्लाही यशस्वीपणे गाठला.
धोनीने वनडेतील कामगिरीचा कित्ता कसोटीतही यशस्वीपणे गिरवला. त्याने करिअरमधील पाचव्या कसोटीत शानदार शतक झळकावले. त्याने २३ जानेवारी २००६ रोजी फैसलाबादच्या मैदानावर हे यश संपादन केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ही कामगिरी केली. त्याने या कसोटीत १४८ धावा काढून करिअरमधील पहिल्या शतकाची नोंद केली.
धोनीची यशस्वी कारकीर्द
– २००० मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात संघाने कसोटीच्या सिंहासनाकडे आगेकूच
– २००९ मध्ये अव्वल स्थान काबीज. १८ महिन्यांपर्यंतआता सहाव्या स्थानी.
– २००० ते २०१० पर्यंत : ४१ सामने, १२ विजय, १४ पराभव, १५ अनिर्णीत.
– २०११ पासून आतापर्यंत : २३ सामने, २ विजय, १५ पराभव, ६ अनिर्णीत.