पुणे, : पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.
पावसाळ्यातील धोके टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच 24 तास उपलब्ध टोल फ्री कॉल सेंटरमध्येच वीजविषयक
तक्रार नोंदविण्याचे आवाहन महावितरण केले आहे.
पावसाळ्यात वादळाने वीजतारांवर, खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.
पूरपरिस्थिती किंवा अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना
करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्यात येत आहेत. पुणे परिमंडल कार्यालय तसेच
रास्तापेठ, गणेशखिंड आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत सर्व विभागस्तरावर 24 तास कार्यरत राहणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष
सुरु आहेत. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा
उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी
महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. यात तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या
कामांसह वीजवाहिन्यांना थेट धोका निर्माण करणार्या झाडांच्या फांद्यांची कटाई करण्यात येते. तथापि
वीजवाहिन्यांपासून दूर अंतरावर असलेल्या आणि खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जमीनीवरील झाडे किंवा मोठ्या
लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन
संभाव्य धोका निर्माण करणार्या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई
करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे
दोन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर
वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात
तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय
उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे कोणतेही तीन मोबाईल
किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. यानंतर रजिस्टर्ड मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून तक्रार
नोंदविण्यासाठी फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. स्थानिक तक्रार निवारण केंद्गे कायमस्वरुपी बंद केल्याने
ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावरच तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.