‘नागरिकांच्या आरोग्याची चिंता करा…’; मधल्या सीटवर प्रवाशांना बसवण्यावरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

Date:

नवी दिल्ली. परदेशातून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये मधली सीट रिकामी ठेवण्यावरुन सुप्रीम कोर्टाने सोमवारी अर्जंट सुनावनी ठेवली. चीफ जस्टिस एस. ए. बोबडे यांच्या बेंचने याप्रकरणी सरकारला फटाकारले आहे. न्यायालयाचे म्हणने आहे की, “दोन नियम चालणार नाहीत. विमानाबाहेर तुम्ही सहा फुटांचे अंतर ठेवायचे म्हणता आणि विमानात खांद्याला खांदा चिटकून बसण्याची परवानगी देत आहात. सरकारने विमान कंपन्यांऐवजी प्रवाशांच्या आरोग्याची चिंता करावी.”

एअर इंडियाला 6 जूननंतर बॉम्बे हायकोर्टच्या आदेशाचे पालन करावे लागेल

बॉम्बे हायकोर्टने सरकारी एअरलाइन एअर इंडियाला मागच्याच आठवड्यात आदेश दिला होता की, ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत परदेशातून भारतीयांना आणताना विमानातील मधली सीट रिकामी ठेवली जावी. एअर इंडिया आणि सरकारने हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आवाहन दिले. परंतू, सुप्रीम कोर्टाने एअर इंडियाला 6 जूनपर्यंत मधल्या सीटवर प्रवाशांना बसवण्याची परवानगी दिली आहे, पण त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचा अंतिम निर्णयाचे पालन करावे लागेल.’

बॉम्बे हायकोर्टात 2 जूनला पुढील सुनावनी

सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाने म्हटले आहे की, सर्वांचे मत जाणून अंतिम निर्णय देण्यात यावा. यासोबतच विमान कंपनीला सूचना दिली की, आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच, जोपर्यंत प्रकरण कोर्टात पेंडींग आहे, तोपर्यंत नागरी उड्डयन महानिदेशालय (डीजीसीए) कमर्शियल विचाराऐवजी नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत विचार करावा. बॉम्बे हायकोर्टात याप्रकरणाची पुढी सुनावनी 2 जूला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...