मुंबई – महाराष्ट्रातील टोल माफियांच्या हाती असल्याचे वक्तव्य आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
ते म्हणाले , टोल बाबत , भारतभरातील आणि जगभरातील स्थितीचा अभ्यास करून आणि अनेकांशी चर्चा करून आम्ही टोल बाबत धोरण ठरविलेले आहे , टोल ला वेगळा पर्याय नाही हे वास्तव आहे , सगळीकडे टोल असताना महाराष्ट्रातच टोल विषयी एवढी का ओरड होते तर , महाराष्ट्रातील टोल हा माफियांच्या हाती गेला आहे , पारदर्शकता ठेवून , करार तपासून अन्यायकारक टोल शोधून ते घोषित करून आम्ही ते बंद करू
मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यावर फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची पदोपदी जाणीव होते आहे ११ कोटी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्तीचे आव्हान पेलायचे आहे याची जाणीव आहे त्यामुळे सर्वप्रथम सेवा हमी कायदा आणला माहिती अधिकाराप्रमाणे सेवा अधिकार हि जनतेचा आहे असेही ते म्हणाले
राज्यातील टोल माफियांच्या हाती – मुख्यमंत्री
Date: