वावरहिरे,सातारा- सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि सत्यशोधीका आशा ढोक यांच्या रौप्य महोत्सवी सत्यशोधक विवाह प्रसंगी राजकुमार भुजबळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की महात्मा फुले यांनी एकदम साध्या सोफ्या भाषेमध्ये 18व्या शतकात विवाह पद्धत सांगितली असून कर्मकांड, अंधश्रद्धा पासून दूर राहून सत्यशोधक पद्धतीने विवाह करावे असे आवाहन केले , विवाहात अक्षता म्हणून जे तांदूळ वापरले जाते ते बंद करून त्या जागी फुले वापरावीत म्हणजे लोकांना चांगला रोजगार मिळेल.पुढे ते म्हणाले की आम्ही दोघेही चांगल्या घरातील शासकीय पदावर काम करीत असताना देखील सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलेचे माहिती देऊन नाहक खर्च होणारे पैसे वाचविलेचे सांगून आपल्या मुलांनाचे विवाह सत्यशोधक पद्धतीने सामुदायिक करा आणि रघुनाथ ढोक यांच्या कार्याला सहकार्य करा असे देखील प्रतिपादन केले.
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक रघुनाथ श्रीरंग ढोक व सत्यशोधिका सौ आशा रघुनाथ ढोक यांचा सत्यशोधक रौप्य महोत्सवी सत्यशोधक विवाह वर्धपान सोहळा सावतानागर ,वावरहिरे येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात रविवारी दि 19 मे 2019 रोजी सायंकाळी 6.30वाजता सामाजिक बांधिलकी जपत सम्पन्न झाला.हा या केंद्रातील दुसरा सत्यशोधक विवाह होता.
या प्रसंगी पाहुण्यांचे हस्ते अपंग मोना शिंदे आणि मोहन भोसले यांना तीन चाकी सायकल व अपंग मुलींना कपडे वाटप केले ,धर्मपुरीतील जेष्ठ नागरिक जगन्नाथ सावंत यांना दोन चाकी सायकल पेपर विक्री करून रोजगार मिळविण्यासाठी भेट दिली ते रघुनाथ ढोक लहानपणी चंद्रपुरी पाठशाळेत 7वी पर्यंत शिकले त्या शाळेचे ते शिपाई होते.पुणे येथे ढोक यांनी देखील पेपर टाकून शिक्षण पूर्ण केले होते. यावेळी या सावतानगर मधील प्रवीण कापसे mpsc परीक्षा पास होऊन पोलीस निरीक्षक पदी निवड आणि या भागात पहिला सत्यशोधक विवाह केला म्हणून गणेश कापसे व ज्योती कापसे यांचा देखील सत्कार केला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते चे सह्ययक पोलीस निरीक्षक मा.राजकुमार भुजबळसाहेब,बारामती शारदा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजाराम ढोक ,डेप्युटी कमिशनर आनंदराव जगताप माजी बीडीओ दहिवडी ,इरेगेशन विभाग इंदापूर च्या सौ.निशा भुजबळ,देशमुख वाडीचे सरपंच विष्णूपंत बनसोडे, महादेव भोसले गुरुजी,बाळासाहेब खिलारे,दत्तात्रय ढोपे उपस्थित होते.
यावेळी डॉ.राजाराम ढोक यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य व प्रकाशन समिती चे सदस्य रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक पद्धतीने पुन्हा विवाह करून का आणि कसे करावे यांचे जिवंत उदाहरण देऊन माहिती दिली.तर
कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज,सामाजिक क्रांति चे जनक महात्मा जोतीराव फुले,भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.सर्व मान्यवरांचे सत्कार फुले उपरणे आणि फुले शाहु आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले या पुतळ्याची एकत्रित असलेली प्रतिमा व रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले 131 ग्रंथ नुकतेच 131 वा महात्मा दिन साजरा झाला म्हणून मुली व महिलांना भेट दिले.
या वेळी सत्यशोधक रोहिदास तोडकर आणि मुलगा आकाश ढोक यांनी सत्यशोधक पद्धतीने रघुनाथ ढोक आणि आशा ढोक यांचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे वेषभूषेत 25 वर्षानंतर पुन्हा एकदा विवाह लावला तर बाजीराव वाघ आणि सुदाम धाडगे यांनी फुले रचित मंगळाष्टक म्हंटल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णू लडकत तर आभार प्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले.या प्रसंगी सोनटक्के आणि ढोक परिवार त्यांचे नातेवाईक तसेच पुण्यातून व परिसरातुन मोठे सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठया संख्येने रौप्य महोत्सवी वर्धपान सत्यशोधक विवाह सोहळा पाहणे साठी जमले होते.खास करून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव वरून नवदाम्पत्य सौ.अक्षता अजिंक्य आणि त्यांचे पूर्ण कुटूंब उपस्थित होते.या विवाह सोहळ्याने आदर्श विवाह ,सामाजिक बांधिलकी आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह का करावा याचे जिवंत दर्शन घडल्याने मोठया चर्चेचा विषय ठरला.