पुणे -महापालिका हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट होताच महापालिका आयुक्तांना काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रस्ताव तयार करा यासाठी वारंवार पत्र देऊन केलेल्या मागणी ची आठवण झाली आहे.आबा बागुलांच्या सतात्याच्या आग्रहा मुळे प्रशासनाने हा अहवाल तयार ही करून घेतलेला, तो आता आयुक्त कार्यालयाने मागून घेतला आहे.दरम्यान, या पूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुळशीच्या पाण्याबाबत धरणाची मालकी असलेल्या टाटा कंपनीशी बोलणार असल्याचे अनेकदा सांगितले आहे.आता प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली आहे.
23 गावे आल्याने पालिकेने वाढीव पाणी मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या गावांसह, शहरासाठीची पाण्याची गरज भागविण्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबतचा, प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून त्यानंतर तो शहर सुधारणा समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
राज्यशासनाने महापालिकेसाठी 11.50 टीएमसी पाणीसाठा निश्चित केला आहे. तर, महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या आणि 23 गावांच्या समावेशानंतर लागणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन गावे घेण्यासाठीचा अभिप्राय देताना 18.50 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. सद्यस्थिती महापालिका प्रत्यक्षात 15 टीएमसी पाणी खडकवासला धरणातून घेत आहे.