मुंबई-आपल्याला शेजारच्या राष्ट्रासारखे बनवले जातेय, सीमेपार लोकशाही नाही, तुम्ही ठरवा देशाला कुठे न्यायचेय असा गंभीर सवाल आणि चिंतन प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात ते बोलत होते.
जावेद अख्तर म्हणाले, आपल्या शेजारील देशात जशी स्थिती आहे, तसे आपल्याला बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण विचार हाच करावा लागणार की, आपल्याला या देशाला जायचे कुठे आहे. जिथे आपल्याला हजारो वर्षांची परंपरा बोलावतेय तिकडे की, जिथे आम्हीच बरोबर आणि दुसरे चूक आहेत तिकडे याचा निर्णय स्वःतलाच घ्यायचाय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात ते बोलत होतेजावेद अख्तर म्हणाले, मी डाॅक्टर असलो तरी पेशंटच जास्त आहे. एक दोन विद्यापीठ आहेत, ज्यांनी मला डाॅक्टरेट दिली आहे, पण त्यांना गंभीर घेऊन माझ्या नावात डाॅक्टर घालू नका, मला फक्त जावेद अख्तरच म्हणा.
जावेद अख्तर म्हणाले, मी येथे बसलो तेव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. मी ती शेअर करू इच्छितो. देशात लोकशाही आहे. कमीत कमी अजून तरी आहे. पण आपण जेव्हा देशाच्या सीमेपर्यंत जातो त्यापुढे आपल्याला लोकशाही दिसत नाही. असे काय गुण आपल्यात आहे, की आपल्याकडे लोकशाही जमीनीत खोलपर्यंत गेली की, जे लोकशाहीला धोका पोहचवणारे आहेत ते धक्काही लावू शकले नाहीत.
जावेद अख्तर म्हणाले, आपल्या देशात आपण हजारो वर्षांपासून लोकशाहीसाठी पोषक बनत आलो आहोत. विचारधारा, संस्कृतीचे बाळकडू आपल्याला मिळत गेले. एकमेकांची विचारधारा आपण समजत आलो आणि सन्मान करीत आलो. त्यामुळेच जगातही लोकशाही जिवंत राहते. मी सांगतो तेच खरे, आम्ही सांगतो तेच योग्य, आम्ही जे सांगत नाही ते खरे नाही अशी विचारधारा जेथे आहे तेथे लोकशाही नांदत नाही.
जावेद अख्तर म्हणाले, आज येथे अनेक पक्षांचे लोक एकत्र बसले आहेत. का बसले आहेत, त्यांच्यात नम्रता आहे, ते एकमेकांचे विचारांचा आदर करतात. विचारधारांचा आदर करतात हाच भारत आहे. परंतु, आज आपण पाहतो आहोत की, विविधतेतील एकतेला नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत
जावेद अख्तर म्हणाले, आपल्या शेजारील देशात जशी स्थिती आहे, तसे आपल्याला बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण विचार हाच करावा लागणार की, आपल्याला या देशाला जायचे कुठे आहे. जिथे आपल्याला हजारो वर्षांची परंपरा बोलावतेय तिकडे की, जिथे आम्हीच बरोबर आणि दुसरे चूक आहेत तिकडे याचा निर्णय स्वःतलाच घ्यायचाय.