पुणे- उरुळी देवाची व फुरसुंगीकरांच्या महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेला जाणीवपूर्वक निधी देत नाही असा आरोप करत आज नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका मुख्य सभेत आंदोलन करत निषेध व्यक्त केला .
या वेळी ते म्हणाले ,’ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे मार्फत फुरसुंगी उरुळी देवाची ग्रामीण भागासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.. या योजनेचे काम निधीअभावी बंद आहे.. सध्या ही दोन गावे फुरसुंगी व उरुळी देवाची पुणे मनपा मध्ये समाविष्ट झाल्यामुळे शहराचा भाग आहेत.सदर योजनेत पाण्याची लाईन टाकल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याचा खर्च वाढलेला आहे..सदर खर्च एकदाच महापालिकेने केल्या मुळे या दोन गावातील २.५ ते ३ लाख लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे..परंतु वारंवार २ ते ३ वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा पुणे मनपा सदर योजनेचे पैसे एमजेपी कडे वर्ग करत नाही..तसेच दरवर्षी ७ ते ८ कोटी रुपये वार्षिक पाण्याचे टॅंकर साठी खर्च करते.. आम्हा उरुळी देवाची व फुरसुंगीकर नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते