पुणे-धरणे वारंवार भरताहेत ,नदीत पाणी सोडले जातेय ,ऑक्टोबर मध्येही पाऊस थांबायचे नाव घेईना , धरणात पाणी मावेना पण ते पुणेकरांना देता येईना .. असा गलथान कारभार पुणे महापालिका प्रशासनाचा सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अर्बन सेल चे अध्यक्ष नितीन कदम यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले,प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही ,मनमानी कारभार सुरु आहे,आज पाणी येणार नाही याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्यती खबरदारी पुणे मनपाने घेतली नसल्यामुळे पुणेकरांना कोणतीच पूर्वतयारी करता आली नाही.त्यामुळे आज पाणी नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आली..याबाबत पुणे मनपा नेहमीच्या पद्धतीने प्रेस नोट काढून वृत्तपत्राद्वारे आधीच नागरिकांना कल्पना देते.दुर्दैवाने “दैनिक सकाळ”(बंदच्याआदल्या दिवशी 5 ऑक्टोबरला) व्यतिरिक्त कोणत्याच वृत्तपत्रांनी ही बातमी दिली नसल्यामुळे आजचा पाणीपुरवठा बंद हा नागरिकांसाठी “गुपित” च राहिला. त्यात ज्या भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे ती माहिती सुद्धा अर्धवटच छापण्यात आली होती.
धरणात एवढे पाणी असताना पुणेकरांना पाण्यासाठी वण-वण का! हाच प्रश्न नागरिकांना कडून विचारला जात आहे..पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या या गचाळ कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आलेली आहे. याबाबत आपण त्वरित चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर मागणी करीत आहे.असे नितीन कदम यांनी सांगितले .