…तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवा सांगूनही आयुक्त ऐकत नाहीत -नेमके दडलंय तरी काय ?
पुणे : विशिष्ट लॉबी हाथी धरून महापालिकेचा कारभार फारच चांगला आहे अशी शोखी मिरवीत काम करणाऱ्या महापालिका आयुक्तांनी पुण्यातील खासदार ,आणि पर्यावरण क्षेत्रातील ,तसेच प्रसार माध्यम क्षेत्रातील अनेकांचा विरोध डावलून त्यांच्या शकांना उत्तरे देण्याऐवजी काही हजार कोटीचा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प रेटण्याचे काम सुरूच ठेवल्याने आयुक्त आणि त्यांच्या भवतालचे मधमोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे महापालिकेतील वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण,नितीन कदम,प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत विविध मुद्दे पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत .
राष्ट्रवादी काॅंगेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना केली. प्रवक्ते प्रदीप देशमुख , नितीन कदम यासंदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले कि,’सदोष असलेला मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप असून प्रकल्प मुळात तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याने व त्यामुळे पुणेकरांवर गंभीर नैसर्गिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प नागरिकांच्या पाठींब्याने होत आहे असे दर्शविण्याचा प्रशासनाचा अट्टहास दिसत आहे.” Pune re” ही मोहीम महानगरपालिकेने ताबडतोब मागे घ्यावी, अशी आमची मागणी आम्ही थेट आयुक्तांपर्यंत पोहोचविली आहे.
चव्हाण यांनी नमूद केले की, पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मुळा मुठा नदी सुधार व सुशोभीकरण योजनेसंदर्भातील त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आपल्या निदर्शनास आणले होते. यासाठी पुणेकर नागरिक व पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तज्ञाकडून प्रकल्पाचे सादरीकरण देखील आयोजित केले होते. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्ही आपणास वारंवार सूचित करत आलो. राज्य शासनाच्या पातळीवर देखील अनेक तज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या व जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे असे ठरले. आता दुर्दैवाने पुणे मनपाच्या वतीने हा प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरु आहे.
चव्हाण यांनी नमूद केले की काही नागरिकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे की पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत योजनेस नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी नागरिकांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. असा प्रयत्न अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे. पुणे शहरातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत व त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही. मात्र आता लहान मुलांना वेठीस धरून बक्षिसांची आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून त्यांचा माध्यमातून त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत असून ते चुकीचे व आक्षेपार्ह आहे.