त्रिशूळ, उगवता सूर्य अन् धगधगती मशाल-उद्धव ठाकरेंनी मागितली तात्पुरती ३ चिन्हे – पक्षाला दिली तात्पुरती ३ नावे ;शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे
आता निवडणूक आयोगाकडे लक्ष
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने आदेश देताच मी तीन चिन्हे ठरवली आहे. एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही नावे दिले आहेत.
चाळीस डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण गोठवला. त्यानंतर वरुन हेच म्हणतात की, बघा आम्ही करून दाखवले. काय मिळवले त्यांनी शिवसेना फोडून? ज्या शिवसेनेने मराठी अस्मिता जपली ती फोडायला तुम्ही निघाला. धनुष्यबाणच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची हिंंमत तुम्ही गोठवली. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. वडीलांनी ती वाढवली आता या नावाशी तुमचा संबंध काय? तुम्ही या नावाचा आणि शिवसेनेचा घात केला असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यानंतर ठाकरे आता राज्यातील जनता आणि शिवसैनिका्ंशी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत.ठाकरे म्हणाले, जेव्हा मी कोरोनाच्या संकटकाळात फेसबुक लाईव्हद्वारेच मी सूचना करीत होतो. आपण कोरोनावर मात केली. अनेक जण त्यावेळी मला अनेकदा सांगत होते की, तुम्ही आम्हाला कुटुंबातील वाटतात. म्हणूनच मी कुटुंबाजवळ मन मोकळे करीत आहोत.ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या मुलाला मुख्यमंत्रीपदी नको पद मलाच हवे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. तत्पूर्वी मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते त्यांना ते मिळाले. जे नाराज होते ते गेले. पण आपण सहन केले. आता मात्र, अती होत आहे.ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. इंदीरा गांधींच्या सरकारमध्येही शिवसेनेला एवढा त्रास झाला नाही. जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करीत आहात मग पापी कोण तुम्हीच ना. ज्या शिवसेनेने मोठे केले त्या शिवसेनेला छळण्याचे काम करीत आहात.ठाकरे म्हणाले, मी डगमगलो नाही. शिवसैनिकांनी घरादाराची पर्वा न करता अंगावर केसेस घेतल्या त्या शिवसैनिकांना छळत आहात. त्यांना शिंदे गटात या म्हणून केसेस करण्याची धमकी दिली जात आहे. पण आमच्यात ठासून आत्मविश्वास आहे. शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत.ठाकरे म्हणाले, उलट्या काळजाच्या माणसाने शिवसेनेचे पक्ष नाव आणि चिन्ह गोठवले. बुद्धी गोठलेली नसेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. बाळासाहेब हवे पण बाळासाहेब ठाकरे हवे आहेत पण त्यांचा मुलगा नको. शिवसेना आणि ठाकरे वगळून जे राहील ते तुम्हाला गो-शाळेत बांधायचे आहे.ठाकरे म्हणाले, काही काळासाठी आमचे चिन्ह गोठवले हा आपल्यावरील अन्याय आहे. सोळा जणाच्या अपात्रतेचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल लागायला नको होता. पण हा गोंधळ झाला तो निस्तारणार कसा हा कायद्याचा विषय आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. नक्की आम्हाला न्याय मिळेल.
शेषन यांनी मस्ती चालू दिली नाही-ठाकरे म्हणाले, टी. एन. शेषन हे माजी निवडणूक आयुक्त होते पण त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचीही मस्ती त्यांनी चालू दिली नाही. त्यांनी निपक्षःपाती काम केले. तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि पक्ष द्याठाकरे म्हणाले, जनता जनार्धन सर्वोच्च आहेत. त्यांच्या दरबारात आम्हाला जायचे आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. त्याचे महत्व हेच की, दिवस आणि रात्र वैऱ्यांची आहे. जागे राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला लढाई जिंकायची आहे. आजपर्यंत जनतेचे आशिर्वाद आणि प्रेमाच्या बळावरच आम्ही सामोरे गेलो आहे. हेच प्रेम जनतेने द्यावे.