मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. राज्यांमध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांना मात्र मातोश्री बाहेर निघायला वेळ नाही. प्रशासनावर मुख्यमंत्र्यांची पकड नाही मुख्यमंत्री उद्घाटन करतात मात्र तिथेच सुविधा सोई सुविधा नसतात भाजपकडून अनेकदा कोरोना संकटात अनेक ठिकाणी रूग्णवाहिका ,ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते, मात्र या पत्राची कुठलीही दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही आहे. टीव्ही ९ मराठीच्या पत्रकाराचा ॲम्बुलन्सअभावी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने,या ढिसाळ कारभाराबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घरी पाठवण्याची मागणी खासदार किरीट सौमय्या यांनी केली आहे.याचबरोबर सौमय्या यांनी राज्यसरकार मधील सर्व मंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केलं आहे.
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आज मध्यरात्री दुर्देवी मृत्यू झाला त्यांना आवश्यक वेळी साधी रूग्णवाहिका सुद्धा उपलब्ध होऊ शकली नाही आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मुख्यमंत्री मातोश्री वर बसून राज्याचा कारभार करू पाहत आहेत मात्र मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार करता येत नाही. त्यासाठी बाहेर पडावे लागते, फिरावे लागते. असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.