पुणे-महाराष्ट्रासह देशभरात फोटोपुरते हातात झाडू घेणा-या कथित समाजसेवकांची कमी नाही. पण असे समाजसेवक हे थोबाडीत मारण्याच्या लायकीचे असतात. खरा समाजसेवक हा प्रकाश आमटेंसारखा असतो असे विधान मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार वितरण समारंभात आमटे दाम्पत्याचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीपाल सबनीस यांनी आमटे यांच्या कार्याचे कौतुक केले,ते म्हणाले,सर्वात मोठा पुरस्कार सिनेमातून मिळाला असून आदिवासी समाजाच्या सदीच्छा त्यांच्या पाठिशी आहे. आदिवासी भागात राहणा-या हजारो लोकांचे जीवन आनंदमय करुन त्यांना आरोग्याचे शिक्षण दिले. रोगराईतून मुक्त आणि ज्ञानवंतांची पिढी घडवण्याचे काम या दाम्पत्याने केले .