पुणे :
‘संदीप खरे,स्पृहा जोशी यांच्या काव्यात हळुवार भावनांचा स्पर्श असल्याने ते मनाला भावते . तरुणाईला संवेदनशील काव्य आणि कवितेची भुरळ पाडण्याचे काम यशस्वीपणे या दोघांनी केले आहे .त्यामुळे त्यांचा एकत्रित सत्कार करण्याचा योग कोथरुडकरांसाठी संस्मरणीय क्षण आहे ‘ अशा भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सौ . जयश्री मारणे यांनी शनिवारी व्यक्त केल्या .
निमित्त होते संदीप खरे,स्पृहा जोशी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे .
कोथरूड मध्ये प्रभाग क्रमांक १० येथील नगरसेविका सौ . जयश्री मारणे यांच्या हस्ते कवी संदीप खरे ,अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा सत्कार करण्यात आला . ‘दमलेल्या बाबाची कहाणी ‘साठी प्रसिद्ध असलेल्या संदीप खरे यांनी यावेळी ‘संदीप खरे लाईव्ह ‘ हा कार्यक्रम स्पृहा जोशी यांच्या समवेत सादर केला आणि काव्यप्रेमींना रिझवले
.या कार्यक्रमात चेतन कुलकर्णी,सई टेंभेकर,मिलिंद कुलकर्णी ,नितीन कानेटकर यांचा सहभाग होता .
स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान(भुसारी कॉलोनी ) येथे हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी झाला . नगरसेविका जयश्री मारणे यांच्या प्रभागातील विकास कामांचा स्लाईड शो दाखविण्यात आला . ‘खेळाची मैदाने ,रस्ते ,कंटेनरमुक्त प्रभाग ,अंडर ग्राउंड वायरिंग अशा विविधांगी कामांचा आढावा सौ .मारणे यांनी सादर केला .
‘संदीप खरे,स्पृहा जोशी यांच्या काव्यात हळुवार भावनांचा स्पर्श असल्याने ते मनाला भावते . त्यामुळे त्यांचा एकत्रित सत्कार करण्याचा योग कोथरुडकरांसाठी संस्मरणीय क्षण आहे . तरुणाईला संवेदनशील काव्य आणि कवितेची भुरळ पाडण्याचे काम यशस्वीपणे या दोघांनी केले आहे . मराठी काव्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी नव्या माध्यमातून अजून प्रयत्न करावेत ‘ असे उद्गार सौ . जयश्री मारणे यांनी यावेळी बोलताना काढले
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले .मनसे प्रदेश उपाध्यक्ष एड . गणेश सातपुते , नगरसेवक एड . किशोर शिंदे ,नगरसेविका पुष्पा कनोजिया ,शहराध्यक्ष हेमंत संभूस ,अजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते