जीवनात काही माणसे खूप मोठ्ठी होतात , ज्यांना कायमची ओळख मिळते, ज्यांचे नाव आणि काम कायम राहते , अशा अजरामर झालेल्या महान हस्तींच्या व्यक्तिगत जीवनात आणि सामान्य माणसाच्या जिवनात काही फरक असतो काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो ,पैसा,प्रतिष्ठा ,सारे काही मिळूनही काहींना खरोखरचे प्रेम लाभते काय ?असे प्रश्न वारंवार निर्माण होत असतात . राजेश खन्ना चा एक काळ होता , असंख्य तरुणी त्याच्यावर फिदा असत ,त्या राजेश खन्नाला आयुष्यात खरे प्रेम लाभले काय ?त्याचा विवाह यशस्वी झाला काय ?या सारख्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हि सामान्य माणसाच्या जिवनात जशी उत्तरे मिळतात त्याहून वेगळी काही नसतात . प्रेम हि एक गोष्ट अशी आहे , कि जी श्रीमंतीवर , प्रसिद्धीवर ,प्रतिष्ठेवर मिळविता येते हा तरुणाईचा वारंवार झालेला भ्रम च होता हे अनेक किस्स्यांमधून वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे .
प्यार माँगा है तुम्हीं से, न इनकार करो
पास बैठो ज़रा आज तो, इक़रार करो
कितनी हसीं है रात, दुल्हन बनी है रात (२)
मचले हुए जज़बात, बात ज़रा होने दो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो
पहले भी तुम्हें देखा, पहले भी तुम्हें चाहा (२)
इतना हसीं न पाया, साथ हसीं होने दो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो
कितना मधुर सफ़र है, तू मेरा हमसफ़र है (२)
बीते हुए वो दिन, ज़रा याद करो
मुझे प्यार करो (२)
प्यार माँगा है तुम्हींसे, न इनकार करो
पास बैठो ज़रा आज तो, इक़रार करो
कॉलेज गर्ल या चित्रपटातील शिव कुमार सरोज यांच्या या गीताला बप्पी लहरींनी संगीत दिले आहे . आणि किशोर कुमार यांनी हे गाणे गायले आहे . प्रेमा वरची , विरहावरची, बेवफाई वरची … अशा असंख्य नानाविध विषयावरची अप्रतिम आणि अजरामर झालेली गाणी ज्या किशोरदांनी गायली त्या किशोरदांचे आयुष्य पाहिले तर स्वतः त्यांनीही प्रेमासाठी बर्याच खस्ता खाल्लेल्या दिसतात .
किशोर कुमार ने स्वतःची चार लग्न केली त्यांची पहिली पत्नी गायक आणि अभिनेत्री रुमा घोष होती. 1950 ते 1958 या काळात किशोरदा नी आपले जीवन रुमा घोष यांच्या बरोबर व्यतीत केले . त्यानंतर किशोरदांचे लग्न अभिनेत्री मधुबाला समवेत झाले . जिच्यासाठी किशोरदांनी धर्मपरिवर्तन देखील केले .पण मधुबालाच्या परिवाराने त्यांना स्वीकारले नाही 1969 मध्ये मधुबाला चे निधन झाल्यानंतर किशोरदांनी प्रख्यात अभिनेत्री योगिता बाली बरोबर लग्न केले . १९७६ ते १९७८ एवढाच काळ हे लग्न टिकले . किशोरकुमार यांचे चौथे लग्न अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या शी १९८० ला झाले . लीना चंदावरकर हि त्यांची शेवटची पत्नी . किशोर कुमार यांची निधन १३ ऑक्टोबर 1987 ला झाले .विशेष म्हणजे याच दिवशी किशोरकुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांचा वाढदिवस होता .
अशा महान लोकांच्या जिवनकथा पाहिल्या तर समजते स्वकर्तुत्वावर सारे काही मिळविणाऱ्यांनाही प्रेम मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागली असावी . तेव्हा प्रेमाची किंमत अनमोल असते , ज्यांचे प्रेम यशस्वी झालेले असते अशा लोकांची संख्या खरोखर खूपच अत्यल्प असावी असाही अंदाज आजच्या स्थितीत लावला जातो .
-अभिषेक अरुण लोणकर , पुणे .