Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नेताजी विमान अपघातात वारले? …अनुज धर यांचे व्याख्यान

Date:

पुणे: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला यावर अजुनही बहुसंख्य भारतीयांचा विश्वास नाही. कारण त्या विमान कथित अपघाताच्या ज्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत त्याच संशयाचे धुके निर्माण करतात. नेताजी त्या विमान अपघातात मरण पावले नसून ते सुरक्षितपणे सटकून अन्यत्र कोठेतरी गेले असावेत हे गृहित धरून त्या दिशेने अनेक संशोधकांनी शोधमोहिम राबवली आहे. त्यात मिशन नेताजीचे अनुज धर हे विख्यात पत्रकार व लेखक आघाडीवर आहेत. त्यांचे पुण्यामधे नेताजींच्या मृत्युच्या रहस्यावर शनिवार दि. २३ सप्टेंबर १७ रोजी सकाळी दहा वाजता रेंजहिल येथील सिम्बॉयोसिस इंस्टिट्युटच्या सभागृहात मिशन नेताजी तर्फे श्री. लोकनाथ राव यांनी व्याख्यान आयोजित केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या या रहस्यमयी मृत्युबाबत श्री. धर यांचे संशोधन ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची पुणेकरांसाठी ही मोठी संधी आहे.

अनुज धर यांनी या विषयाला वाहिलेले अनेक पुस्तकेही लिहिली असून त्यावर वादळी चर्चा होत असते. नेताजींबद्दलच्या गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे काम सरकारने सुरु केले त्यात अनुज धर यांचा मोठा वाटा होता. फैजाबाद येथे १९८५ साली मरण पावलेले गुमनामी बाबा भगवानजी म्हणजेच नेताजी असून १४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर १९४५ या काळात मात्सुयामा विमानतळावर कोणताही विमान अपघात झाला नसल्याचे माहिती तैवान सरकारने श्री. धर यांना दिली होती. यामुले त्यांच्या दाव्यांना बळ मिळते. या व्याख्यानाद्वारे यामागील सर्व रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे या व्याख्यानाचे आयोजक लोकनाथ राव यांनी सांगितले. या अभ्यासपुर्ण व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक पुणेकरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...