नेताजी विमान अपघातात वारले? …अनुज धर यांचे व्याख्यान

Date:

पुणे: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला यावर अजुनही बहुसंख्य भारतीयांचा विश्वास नाही. कारण त्या विमान कथित अपघाताच्या ज्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत त्याच संशयाचे धुके निर्माण करतात. नेताजी त्या विमान अपघातात मरण पावले नसून ते सुरक्षितपणे सटकून अन्यत्र कोठेतरी गेले असावेत हे गृहित धरून त्या दिशेने अनेक संशोधकांनी शोधमोहिम राबवली आहे. त्यात मिशन नेताजीचे अनुज धर हे विख्यात पत्रकार व लेखक आघाडीवर आहेत. त्यांचे पुण्यामधे नेताजींच्या मृत्युच्या रहस्यावर शनिवार दि. २३ सप्टेंबर १७ रोजी सकाळी दहा वाजता रेंजहिल येथील सिम्बॉयोसिस इंस्टिट्युटच्या सभागृहात मिशन नेताजी तर्फे श्री. लोकनाथ राव यांनी व्याख्यान आयोजित केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या या रहस्यमयी मृत्युबाबत श्री. धर यांचे संशोधन ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची पुणेकरांसाठी ही मोठी संधी आहे.

अनुज धर यांनी या विषयाला वाहिलेले अनेक पुस्तकेही लिहिली असून त्यावर वादळी चर्चा होत असते. नेताजींबद्दलच्या गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे काम सरकारने सुरु केले त्यात अनुज धर यांचा मोठा वाटा होता. फैजाबाद येथे १९८५ साली मरण पावलेले गुमनामी बाबा भगवानजी म्हणजेच नेताजी असून १४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर १९४५ या काळात मात्सुयामा विमानतळावर कोणताही विमान अपघात झाला नसल्याचे माहिती तैवान सरकारने श्री. धर यांना दिली होती. यामुले त्यांच्या दाव्यांना बळ मिळते. या व्याख्यानाद्वारे यामागील सर्व रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे या व्याख्यानाचे आयोजक लोकनाथ राव यांनी सांगितले. या अभ्यासपुर्ण व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक पुणेकरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...