विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचा शिवसेना खासदार संजय राउत यांना सल्ला.
मुंबई, दि.२५ एप्रिल – खासदार संजय राउत यांनी सामना या त्यांच्या मुखपत्रामध्ये मोदींच्या देशात एक रूझवेल्ट हवा या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखातील अपुरी माहिती समाजमाध्यमांसमोर ठेवण्याच्या हेतूने आज विधानपरिषद विरोधीपक्षनेते श्री. प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राउत यांनी आपल्या आर्थिक ज्ञानाची उजळणी करावी! असा मार्मिक टोला लगावत, श्री. दरेकर यांनी त्यांना माहित नसलेली वा लेखात जाणूनबुजून न दिलेली! माहिती यावेळी त्यांनी मध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवली.
“मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था जेवढी गतिमान होती, त्याहून दीड पट जास्त गतिमान मोदिजींच्या नेतृत्वात भाजपा सरकारने त्यांच्या पाच वर्षांच्या कळत केली. याचे भान लेखक संजय राउत यांना बहुदा नसावे” असे श्री. दरेकर म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले “कोरोनाच्या काळात सारे जग आर्थिक संकटाशी लढत असताना देखील अर्थव्यवस्थेची ग्रोथ -८.० च्या खाली न येऊ देणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची कसरत आहे. याचे देखील भान संजय राउत यांना बहुदा नसावे. भारतातील जनतेसाठी २० लख कोटींचे पॅकेज केंद्र सरकारने मोदिजींच्या नेतृत्वाखाली जाहीर केले. ही माहिती देखील राउत यांच्याकडे नसावी कदाचित.”
कार्यालयात बसून लेख लिहिणे किंवा ‘मी म्हणजे सर्वज्ञानी’ अशा आवेगात माध्यमांशी बोलणे. यासोबतच राउत यांनी कोरोना काळात जरा जमिनीवर येऊन जनतेसाठी काम करावे. आपल्या सरकारबद्दल जनता काय विचार करते. जनतेच्या मनात आपल्या सरकारबद्दल किती विश्वासार्हता आहे हे पाहावे. आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि केंद्र सरकारवर भाष्य करावे. असा मोलाचा सल्ला यावेळी बोलताना श्री. दरेकर यांनी राउत यांना दिला.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेत्या प्रियांका वडरा माध्यमांसमोर स्वतः तज्ञ असल्यासारखं बोलत होत्या. आज कॉंग्रेस चे ‘माजी’ अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, ‘देशाला मनमोहन सिंग यांची अर्थव्यवस्था हवी’. श्री. दरेकर यांनी संजय राउत यांना विनंती केली की, “या दोन्ही तज्ञ मंडळींची जे महा विकास आघाडीचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्या अभ्यासाचा फायदा महाराष्ट्रात करून घ्यावा. फक्त राजकीय अभिनिवेशातून आरोप करीत बसू नये.”
माजुरांबाद्द्ल, बेरोजगारी बद्दल बोलताना आपल सरकार काय रहित आहे याचा विचार करावा. कोकणवासियांनी शिवसेनेला उभं केलं मात्र त्यांच्या जमिनींचा विषय आजूनही सोडवण सरकारला जमलेलं नाही. याचा विचार करावा! रुग्णालयांच्या बाबतीत केंद्रसरकार कडे बोट दाखविण्य आधी प्रथम महाराष्ट्रात, मुंबईत काय परिस्थिती आहे याकडे पाहावे. देशपातळीवरील नेते झाले म्हणून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करू नये!” असा सूचक टोला श्री. दरेकर यांनी संजय राउत यांना लगावला.
‘कोरोन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी वारंवार संवाद साधत होते. जनतेला धीर देत होते.’ लेखामध्ये राउत साहेब लिहितात, ‘राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ मोठ्या आर्थिक उलाढाली केल्या.’ इथेही अर्धवट माहिती. माॅनेटरेल पिरेड, लोन रीष्ट्रक्चर, व्याज परतावणी. या साऱ्या गोष्टी मोदिजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केल्या आहेत तुमच्या राज्य सरकारने नाही. कोरोना काळात सर्वात जास्त मदत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला केली आहे. दीड हजार मेट्रिक टन ऑक्सिजन, ऑक्सिजन ची रेल व हवाई वाहतुत, लसीची उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धतता. पेट्रोलीअम मंत्री धर्मेंद्र प्रधान जी यांनी देखील भारत पेट्रोलीअम रिफायनरीच्या जागांवर जम्बो कोविड सेंटर उभारून हजारोंच्या संखेने ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गोष्टी केंद्राने केलेल्या आहेत याची आठवण करून देत श्री. दरेकर यांनी संजय राउत यांच्या माहितीत भर घातली.