आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे”
मुंबई-मविआ सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी , मी उद्या दुपारी चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात ED समोर हजर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे . मी ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका मांडेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी हे सगळे दबाव सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या याच दबावामुळे आमच्या पक्षातील काहीजण पळून गेले. पण मी उद्या दुपारपर्यंत ईडीसमोर चौकशीसाठी हजर होईन. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईन, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्यात लोकांनी खंजीर खुपसला. ठाकरेंना कधीच सत्तेची लालसा नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची विनंती केली, त्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारले. आज शिवसेनेतील बंडखोर हे महाविकास आघाडी आणि शरद पवार यांना दोष देत आहेत. पण या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात चांगली खाती मिळाली होती. तेव्हा यापैकी कोणीही विरोध केला नव्हता. महाविकास आघाडी सरकार हा राज्यातील वेगळा प्रयोग आहे, अशी प्रतिक्रिया या सर्वांनी तेव्हा व्यक्त केली होती. हा प्रयोग महाराष्ट्रात पुढील २५ वर्ष चालायला हवा, अशी वक्तव्य या नेत्यांकडून केली जात होती. मात्र आता पाठीत खंजीर खुपसण्यासाठी कारणे शोधली जात आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला आहे
आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे”
दरम्यान, काल रात्री संजय राऊतांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले.. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ”, असं या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत.