महाबळेश्वरचा पाउस जास्त थ्रील देणारा मानला जातो , कोकणातल्या जोरदार पावसाने नद्यां,नाले ,रस्ते पुराखाली जातात, वळणाचे रस्ते, जोरदार पाऊस,आणि अथांग समुद्र यांचे अनोखे संगम असलेल्या कोकणाहून महाबळेश्वरच्या पावसाची मात्र झलक काही औरच असते असे म्हणतात . जणू आभाळच महाबळेश्वरच्या भुइवरती उतरते आणि सर्वत्र धुक्याची थंडगार रजई महाबळेश्वरा ला लपेटून घेते . या नभाने या भुईला असे आलिंगन दिल्याने बेभान होऊन वारा हि जणू सुसाट सुटतो आणि जलधारा देखील महाबळेश्वराच्या भुईवर येऊन जोरदारपणे आदळू लागतात . निसर्गाच्या या प्रेमावताराला पावसाळ्यात महाबळेश्वरात उधाण येते . ते जेवढे पाहणे , अनुभवणे आनंदाचे तेवढेच …धोकादायी देखील असू शकते .. अशाच यंदाच्या पावसाळ्यात १३ जुलैला जीवनातील अवघ्या तास २ तासाचा अवधी जेव्हा या महाबळेश्वरातून घेऊन जातो तेव्हा …