डीपी तील आरक्षणे सरसकट वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करणार !

Date:

पुणे :
पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात शासकीय त्रि -सदस्यीय समितीने सरसकट आरक्षणे वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार आज खासदार वंदना चव्हाण यांनी निमंत्रित केलेल्या पुणेकर नागरिक ,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी ,सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘डीपी मार्गदर्शन ,माहिती अभियान चर्चासत्रात ‘ करण्यात आला
चर्चेसाठी वेळ न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी चा सूर या चर्चासत्रात उमटला
खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या सभागृहात झाले .
अनिता गोखले -बेनिंजर (नगर नियोजन तज्ञ ) ,सुजित पटवर्धन(परिसर ) ,सतीश खोत(नेशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज ) ,सारंग यादवाडकर तसेच ,जुगल राठी ,विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच ),दीपक बिडकर (सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह ), ललित राठी (जनाधार ) इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नी आपली मते या चर्चासत्रात मांडली .
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,’पुण्याच्या विकास आराखड्यातील ९०० पैकी ३८१ आरक्षणे त्रि -सदस्यीय समितीने काढली आहेत आणि निवासी केली आहेत . पुणे पालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या विकास आराखडा मंजूर करण्यासाठी २ दिवस सुद्धा मंजूर न करता हक्क काढून घेणाऱ्या सरकारने त्रि -सदस्यीय समितीला मात्र ३ महिने वाढवून दिले . सरकारने हा आराखडा पालिकेकडून नाही तर पुणेकरांकडून काढून घेतला आहे . त्रि -सदस्यीय समितीने अपेक्षाभंग करीत पुण्यावर अन्याय करणारे कारनामे केले . त्याविरुद्ध आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन आंदोलनाद्वारे जनजागृती करीत आहोत .बिल्डर धार्जिणे धोरण सोडून  सरकारने आरक्षणे पुन्हा प्रस्थापित करावीत . पुणेकर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी घराघरात -सोसायट्यात जाऊन जागृती करावी ,सरकारवर पोस्ट कार्डांचा पाउस पाडावा ‘
      अंकुश काकडे म्हणाले ,’ विकास आराखड्याच्या बाबतीत बौद्धिक दिवाळखोरी दाखवली जात असून त्यातून महापालिका निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जात आहे . ‘
अनिता बेनिंजर म्हणाल्या ,’ त्रि -सदस्यांनी केलेला आराखडा केराच्या टोपलीत टाकण्यासारखा आहे. नगर नियोजनाचे साधे नियम देखील शासकीय समितीने पाळले नाहीत आणि हा आराखडा अमलात आणण्याच्या खर्चाबद्दल काहीच सांगितले जात नाही . पुणेकरांच्या ३ लाख सूचनांचा आदर राखला जाणार नसेल तर इतका खटाटोप का केला  ? हा पुणेकरांचा अपमान आहे .  .
सुजित पटवर्धन म्हणाले  ,’विकास आराखडा अमलात आणणे हे आयुक्ताचे काम असते ,मात्र आतापर्यंत प्रत्येक आयुक्ताने स्वताच्या डोक्यातील नवी योजना आणून नवेच दिवे लावले . आता सर्व विकास आराखडा नव्याने केला पाहिजे ‘
सतीश खोत म्हणाले ,’विकास आराखड्याच्या विरोधात न्यायालयात देखील गेले पाहिजे ‘
सारंग याद्वाडकर म्हणाले ,’स्मार्ट प्लानर नसलेले लोक स्मार्ट सिटीचे नियोजन करीत आहेत . विकास आराखडा ही गॉन केस असून त्याला नव्याने पुनरुज्जीवित केले पाहिजे . ‘
विवेक वेलणकर यांनी स्मार्ट सिटी योजनेचे वाभाडे काढले . विकास आराखड्यात नियोजन भयंकर असून सर्व पक्षांनी एकत्र येवून हा आराखडा रद्द करावा ‘ असे ते म्हणाले
दीपक बिडकर म्हणाले ,’पुणेकरांचा दबाव वाढविण्यासाठी नागरिकांनी रात्री एसेमेस करून मुख्यमंत्र्यांविरुद्ध ‘झोपमोड आंदोलन ‘ करावे . बीडीपी मिळविण्यात सर्वांनी यश मिळवले आता चांगला डीपी मिळविण्यात यश मिळवले पाहिजे ‘
एड . म वि अकोलकर म्हणाले ,’त्रि -सदस्यीय समितीने पुणे शहरावर सामुदायिक अत्याचार केला आहे . त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे ‘
राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या जनजागृतीसाठी  whats अप ,पत्रके वाटणे ,होर्डिंग लावली पाहिजे
यावेळी आराखड्यातील तरतुदींचे सादरीकरण अभिजित बारावकर आणि मनाली भिलारे यांनी संगणकाद्वारे उपस्थितांना दाखवले . हे सादरीकरण पुणे डीपी ‘ पेज वर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली
अशोक राठी यांनी प्रास्ताविक केले . रुपाली चाकणकर यांनी आभार मानले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणे, दि. ८ मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले. एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण). यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...