गायीचे धर्मापलीकडचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवा : डॉ .​कठिरिया

Date:

‘संयुक्त राष्ट्रसंघाची  शाश्वत विकासाची उद्दिष्टे  पूर्ण करताना गोपालन उपयुक्त’

पुणे :गो -संगोपनाचे महत्व भारतीय कृषी आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने ,घरोघरी गोसेवा व्हावी ,गायीचे धर्मापलीकडचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे ‘असे आवाहन रविवारी ‘राष्ट्रीय कामधेनू आयोग ‘ चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री   डॉ . वल्लभभाई कठिरिया यांनी पुण्यात केले .

गो -सेवा ,गो -संगोपन आणि कृषी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था ,संघ परिवारातील स्वयंसेवक कार्यकर्त्यांची अनौपचारिक  बैठक रविवारी सकाळी ‘कौशिकाश्रम ‘ (मित्रमंडळ ,पर्वती) येथे झाली . यावेळी सर्वांशी अनौपचारिक संवाद साधताना डॉ.कठिरिया यांनी हे आवाहन केले .

गो सेवा समिती आणि आरोग्यभारती या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता .

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर हे होते . डॉ . शरद खरे यांनी प्रास्ताविक केले . बैठकीला राजेंद्र लुंकड ,प्रदीप फासे ,डॉ . सुहास गटणे यांच्यासहित   ४० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .

डॉ कठिरिया म्हणाले ,’गो सेवा ,गो -संगोपनाबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत . गोसेवा हा विषय धार्मिक नाही तर कृषीविषयक,शास्त्रीय  आणि आर्थिक आहे . भावना ,आस्था ,श्रद्धेच्या पलीकडे समाजात गो सेवा पोहोचवली पाहिजे .त्यामुळे  पर्यावरण ,शेती ,शेतकऱ्यांना मदत होईल .

संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जी उद्दिष्टे सर्वांसमोर ठेवली आहेत ,ती पूर्ण करताना गोपालन उपयुक्त ठरणार आहे . शहरातही विकास आराखड्यात गोपालनासाठी राखीव भूखंड ठेवले पाहिजेत,असेही डॉ . कठिरिया यांनी सांगितले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...