बाप्पू पठारे भाजपात : टिंगरेच्या पुढे मोठे आव्हान – मुळीक सुसाट..

Date:

पुणे :  वडगांव शेेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा  कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश केला  आहे

भाजपा आमदार जगदिश मुळीक आणि बापूसाहेब पठारे मुंबईत मुख्यमंत्र्यांना रात्री  भेटायला गेले .आणि  तिथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा  प्रवेश झाला.

वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीने सुनील टिंगरे याना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि सुनिल टिंगरे यांच्यात या मतदार संघात लढत होणार आहे. आता बाप्पू पठारे यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात बोलताना पठारे म्हणाले की, मी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली होती. मी माजी आमदार झाल्यापासून मला पक्षाने विचारले नाही. पाच वर्षात एका ही बैठकीला बोलवले नाही.

माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे मी भाजप मध्ये जात आहे. पवार कुटुबांचा मला नेहमी आदर आहे. आता वडगाव शेरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी माझ्या सह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

पठारे हे प्रथम काॅंग्रेसमध्ये होते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. 2009 मध्ये ते आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुळीक यांच्याकडून पराभव झाला.

खराडी-चंदननगरमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्याऐवजी नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारातही पठारे उतरले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अखेरीस घेतला. त्यांच्या पत्नी संजिला पठारे आणि पुतणे महेंद्र पठारे हे राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत.

पठारे यांचा प्रवेश भाजपसाठी वडगाव शेरीत `मास्टर स्ट्रोक` ठरला आहे. भाजपची आणखी ताकद वाढली आहे, अशी प्रतिक्रिया मुळीक यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे पठारे यांनी सांगितले. माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. भाजपमध्ये योग्य सन्मान देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. माझ्या भागाच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.