जळगाव– ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,’ अशा शब्दांत खडसेंनी टीका केली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल आज लागले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, ‘या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. एखादा व्यक्तू पक्षातून बाहेर पडल्यावर काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटलांना कळेल. निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी’, असा घणाघात खडसेंनी केला.