अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. असे स्पष्ट करत जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नीही आता मैदानात उतरल्या आहेत.
ज्या महिलेने आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. म्हणजेच एका वेगळ्या उद्देशाने, हेतूने आव्हाडांविरोधात महिलेने तक्रार केली आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी केला आहे. तसे ट्विट ऋता यांनी केले आहे.रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.असेही ट्वीट करत ऋता सामंत आता आव्हाडांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत .